शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

शुद्ध पाणी द्या, अन्यथा स्वतः कर भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

अड्याळ : ग्रामवासी दरवर्षी पाणीपट्टी कर भरतात; पण ग्रामपंचायत प्रशासनाला गत पंधरा वर्षांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून देता ...

अड्याळ : ग्रामवासी दरवर्षी पाणीपट्टी कर भरतात; पण ग्रामपंचायत प्रशासनाला गत पंधरा वर्षांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून देता आली नाही. आधी शुद्ध पाण्याची व्यवस्था करा, नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी स्वत: भरावी असा आक्रमक पवित्रा अड्याळ ग्रामवासीयांनी घेतला आहे.

दुसरीकडे ज्या नळ योजनेसाठी लाखो रुपये शासनाने खर्च केेले त्याचा अजूनही उपयोग ग्रामस्थांना झालेला नाही.

गावात एकदा सोडून दोन वेळा नळ योजनेची कामे केली गेली; पण त्याचा लाभ ग्रामस्थांना न होता त्या कामात जे होते त्यांनाच मोठ्या प्रमाणात लाभ झाला असल्याचे बोलले जात आहे.

मागील काळात रस्ते, नाली फोडून नळ योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली. त्याआधी काही वर्षे आधीसुध्दा नळ योजनेच्या पाइपलाइनची लाखो रुपयांची कामे करण्यात आली होती खरी. पण शासनाने दिलेल्या लाखो रुपये निधीचा उपयोग ग्रामस्थांना होतो आहे का याचाही विचार जिल्हा प्रशासनाने तथा ग्रामपंचायत प्रशासनाने करायला नको का, असाही सवाल आज उपस्थित केला जात आहे.

शासनाच्या निधीचा ग्रामस्थांच्या हितासाठी उपयोग होत असेल तर कुणीही काही बोलणार नाही; पण त्या निधीचा गैरवापर होत असेल तर मग काय करायचं, कुणाला दोष द्यायचा? अड्याळमध्ये राजकीय दृष्टीने मोठी नेते मंडळी अधिकारी वर्षातून अनेकदा भेट देत असतात, पण गावातील सध्याच्या परिस्थितीत एक ना धड भाराभर चिंध्या पाहायला मिळत आहे, गावातील पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रोश करीत आहेत मात्र यावर कुणीही बोलायला तयार नाही. याचाही विचार आज जिल्हा तथा ग्रामपंचायत प्रशासनाने करणे गरजेचे नाही का? कारण पाणीपट्टी भरूनही घोटभर शुद्ध पाणी प्यायला मिळत नसेल तर यापेक्षा शोकांतिका दुसरी काय?