शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

शुद्ध पाणी द्या, अन्यथा स्वतः कर भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

अड्याळ : ग्रामवासी दरवर्षी पाणीपट्टी कर भरतात; पण ग्रामपंचायत प्रशासनाला गत पंधरा वर्षांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून देता ...

अड्याळ : ग्रामवासी दरवर्षी पाणीपट्टी कर भरतात; पण ग्रामपंचायत प्रशासनाला गत पंधरा वर्षांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून देता आली नाही. आधी शुद्ध पाण्याची व्यवस्था करा, नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी स्वत: भरावी असा आक्रमक पवित्रा अड्याळ ग्रामवासीयांनी घेतला आहे.

दुसरीकडे ज्या नळ योजनेसाठी लाखो रुपये शासनाने खर्च केेले त्याचा अजूनही उपयोग ग्रामस्थांना झालेला नाही.

गावात एकदा सोडून दोन वेळा नळ योजनेची कामे केली गेली; पण त्याचा लाभ ग्रामस्थांना न होता त्या कामात जे होते त्यांनाच मोठ्या प्रमाणात लाभ झाला असल्याचे बोलले जात आहे.

मागील काळात रस्ते, नाली फोडून नळ योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली. त्याआधी काही वर्षे आधीसुध्दा नळ योजनेच्या पाइपलाइनची लाखो रुपयांची कामे करण्यात आली होती खरी. पण शासनाने दिलेल्या लाखो रुपये निधीचा उपयोग ग्रामस्थांना होतो आहे का याचाही विचार जिल्हा प्रशासनाने तथा ग्रामपंचायत प्रशासनाने करायला नको का, असाही सवाल आज उपस्थित केला जात आहे.

शासनाच्या निधीचा ग्रामस्थांच्या हितासाठी उपयोग होत असेल तर कुणीही काही बोलणार नाही; पण त्या निधीचा गैरवापर होत असेल तर मग काय करायचं, कुणाला दोष द्यायचा? अड्याळमध्ये राजकीय दृष्टीने मोठी नेते मंडळी अधिकारी वर्षातून अनेकदा भेट देत असतात, पण गावातील सध्याच्या परिस्थितीत एक ना धड भाराभर चिंध्या पाहायला मिळत आहे, गावातील पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रोश करीत आहेत मात्र यावर कुणीही बोलायला तयार नाही. याचाही विचार आज जिल्हा तथा ग्रामपंचायत प्रशासनाने करणे गरजेचे नाही का? कारण पाणीपट्टी भरूनही घोटभर शुद्ध पाणी प्यायला मिळत नसेल तर यापेक्षा शोकांतिका दुसरी काय?