शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

शुद्ध पाणी द्या, अन्यथा स्वतः कर भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

अड्याळ : ग्रामवासी दरवर्षी पाणीपट्टी कर भरतात; पण ग्रामपंचायत प्रशासनाला गत पंधरा वर्षांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून देता ...

अड्याळ : ग्रामवासी दरवर्षी पाणीपट्टी कर भरतात; पण ग्रामपंचायत प्रशासनाला गत पंधरा वर्षांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून देता आली नाही. आधी शुद्ध पाण्याची व्यवस्था करा, नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपट्टी स्वत: भरावी असा आक्रमक पवित्रा अड्याळ ग्रामवासीयांनी घेतला आहे.

दुसरीकडे ज्या नळ योजनेसाठी लाखो रुपये शासनाने खर्च केेले त्याचा अजूनही उपयोग ग्रामस्थांना झालेला नाही.

गावात एकदा सोडून दोन वेळा नळ योजनेची कामे केली गेली; पण त्याचा लाभ ग्रामस्थांना न होता त्या कामात जे होते त्यांनाच मोठ्या प्रमाणात लाभ झाला असल्याचे बोलले जात आहे.

मागील काळात रस्ते, नाली फोडून नळ योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली. त्याआधी काही वर्षे आधीसुध्दा नळ योजनेच्या पाइपलाइनची लाखो रुपयांची कामे करण्यात आली होती खरी. पण शासनाने दिलेल्या लाखो रुपये निधीचा उपयोग ग्रामस्थांना होतो आहे का याचाही विचार जिल्हा प्रशासनाने तथा ग्रामपंचायत प्रशासनाने करायला नको का, असाही सवाल आज उपस्थित केला जात आहे.

शासनाच्या निधीचा ग्रामस्थांच्या हितासाठी उपयोग होत असेल तर कुणीही काही बोलणार नाही; पण त्या निधीचा गैरवापर होत असेल तर मग काय करायचं, कुणाला दोष द्यायचा? अड्याळमध्ये राजकीय दृष्टीने मोठी नेते मंडळी अधिकारी वर्षातून अनेकदा भेट देत असतात, पण गावातील सध्याच्या परिस्थितीत एक ना धड भाराभर चिंध्या पाहायला मिळत आहे, गावातील पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रोश करीत आहेत मात्र यावर कुणीही बोलायला तयार नाही. याचाही विचार आज जिल्हा तथा ग्रामपंचायत प्रशासनाने करणे गरजेचे नाही का? कारण पाणीपट्टी भरूनही घोटभर शुद्ध पाणी प्यायला मिळत नसेल तर यापेक्षा शोकांतिका दुसरी काय?