शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

उन्हाळी भातपिकाकरिता उजव्या कालव्याचे पाणी मिळावे

By admin | Updated: October 28, 2016 00:31 IST

तालुक्यातील सावरला जिल्हा परिषद क्षेत्रातील खरीप हंगामातील भातपिकाचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पवनी : तालुक्यातील सावरला जिल्हा परिषद क्षेत्रातील खरीप हंगामातील भातपिकाचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या क्षेत्रातील शेतीला उजव्या कालव्याचे पाण्यामुळे गेली. दोन वर्षे उन्हाळी पिकासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकरी यापुढे नियमित पाणी मिळेल अशा आशेवर होते. मात्र यावर्षी उन्हाळी भातपिकासाठी उजव्या कालव्याचे पाणी मिळणार नाही,असे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीचे पत्र परिसरातील गावात लावण्यात आल्याने शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झालेला आहे.परिसरातील कोदूर्ली, रेवनी, धानोरी, भोजापूर, सिंधी, गुडेगाव, खातखेडा, सेंद्री, सोमनाळा व सावरला गावातील शेतकऱ्यांचे पावसाळी भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांची परिस्थिती सावरण्यासाठी पर्याय म्हणून उन्हाळी भातपिकाची शेती करणे आवश्यक आहे तरी देखिल उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पत्रक काढून उन्हाळी भातपिकाला पाणी मिळणार नाही, असे सुचित केले. शेतकऱ्यांना उन्हाळी फसल घेण्यासाठी उजव्या कालव्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी मुन्ना तिघरे यांचे नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ कार्यकारी अभियंत्यांना भेटले. चर्चा करून निवेदन दिले. त्यात आठ दिवसात निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आलेला आहे. शिष्टमंडळात शिवसेनेचे मुन्ना तिघरे, दिलीप हटवार, मंगेश काटेखाये, राजू जिभकाटे, सुखदेव दोडेवार, हिनराज अंकतवार, अशोक काटेखाये, दशरथ काटेखाये, भाग्यवान भाजीपाले, सुधीर कोरेकर, अशोक वैद्य, आशीष वैद्य, सेवक तिघरे, प्रकाश तिघरे, रमेश तिघरे, शंकर बोकडे, युवराज तिघरे, राजू घुटके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)