शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कचाट्यातून मुक्तता करा!

By admin | Updated: March 7, 2017 00:31 IST

रामीण भागातील महिलांची फसवणूक करीत कमी व्याजदराचे आमीष दाखवून मायक्रोफायनान्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप केले.

जनता दरबार : मोहाडी व करडी परिसरातील महिलांची मागणीकरडी (पालोरा) : ग्रामीण भागातील महिलांची फसवणूक करीत कमी व्याजदराचे आमीष दाखवून मायक्रोफायनान्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जाचे वाटप केले. मात्र, वसुली करताना अधिक व्याजदर घेतला जात आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून वसुलीसाठी रोज धमकावले जात आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कचाट्यातून महिलांची मुक्तता करावी, अशी मागणी मोहाडी व करडी परिसरातील महिलांनी केली आहे. खा.नाना पटोले यांनी जनता दरबारात महिलांनी आपली कैफियत मांडली. मायक्रोफायनान्स कंपन्या महिलांना सुरुवातीला कमी व्याजदराचे प्रलोभन दाखवित आहेत. एकदा त्या फसल्या की त्यांची लुबाडणूक करण्याचे धोरण कंपन्यांकडून अवलंबिले जात आहे. परंतु कर्जाची वसुली करताना २६ ते ३० टक्क्यापर्यंत व्याजदर आकारला जात आहे. तर कर्ज वसुलीसाठी कंपन्यांची दंडुकेशाहीचे धोरण अवलंबिले आहेत. गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांकडून महिलांना धमकाविले जात आहे. वसुलीसाठी कंपन्यांनी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामावर ठेवले आहेत. त्यांचेकडून महिलांना रोज अरेरावीची भाषा वापरली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेने २ डिसेंबर २०११ ला फायनांस कंपन्यांना निर्देश दिले होते की, ग्रामीण महिलांना रोज अरेरावीची भाषा वापरली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेने २ डिसेंबर २०११ ला फायनांस कंपन्यांना निर्देश दिले होते की, ग्रामीण महिलांचे उत्पन्न ६० हजार रुपये तर शहरी भागात १ लाख २० हजारांचे ज्यांचे उत्पन्न आहे त्यांनाच कर्जाचे वितरण कंपन्यांनी करावे. ३५ हजार ते ५० हजार रुपयापेक्षा अधिक कर्ज देवू नये, २४ महिन्यापर्यंत कर्जाची वसुली करायला पाहिजे. कोणत्याही महिलांपासून जबरन वसुलीसाठी दबाव टाकता कामा नये. महिलांना समजेल अशा प्रकारचे करार तयार करणे अनिवार्य आहे. या सर्व बाबींचे निर्देश भारतीय रिझर्व बँकेने दिले आहेत. मात्र मायक्रोफायनान्स कंपन्या धमकी देवून जबरन अधिक व्याज घेऊन वसुल्या करीत आहेत. ग्रामीण भागात वाजवीपेक्षा जास्त व्याजाची वसुली केली जात आहे. हे कंपन्यांचे गैरप्रकार थांबविले जाणे गरजेचे आहे. मागील वेळी परिसरातील महिलांनी व तालुक्यातील महिलांनी अनेकदा कर्जमाफीसाठी मेळावे घेतले. शासन प्रशासनाला निवेदन दिले. कर्जमाफीसाठी आक्रोश व्यक्त केला. परंतु न्याय मिळाला नाही. जिल्ह्यातून मायक्रोफायनान्स कंपन्या हद्दपार करण्याची मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली. या कंपन्यांच्या जाळ्यातून मुक्तता देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनही दिले. यावेळी मोहाडी तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)