शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST

सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने धोरण आखले आहे. परंतु, जवाहरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा नळधारकांना केला जात आहे.

जवाहरनगर : सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने धोरण आखले आहे. परंतु, जवाहरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा नळधारकांना केला जात आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून जलस्त्रोत बदलवावे, अशी मागणी होत आहे.जिल्हा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत बेला, भोजापूर, उमरी, फुलमोंगरा, अशोकनगर, गोपीवाडा, शहापूर, ठाणा पेट्रोलपंप, परसोडी या गावातील १२०० नळधारकांना शुद्ध पेयजल पुरवठा केला जातो. तीन दिवसापुर्वी शुद्ध पाणी दिले गेले. मात्र आजघडीला काळसर पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याचे मुख्य स्रोत कोरंभी वैनगंगा तीरावर जलसाठा आहे. नदीपात्रात साचलेले पाणी थेट बेला जलकुंभात पोहचविले जाते. या नदीत नागनदीचे पाणी मिळत असल्याने शुद्ध पाण्यावर परिणाम होत आहे. या गंभीर समस्येकडे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. हेच पाणी नळधारक पिण्यासाठी वापर करीत आहे. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. परिणामी जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी महिलांनी शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)