शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

तुमसर तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:24 IST

पावसाळ्याच्या दिवसात वीज अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पावसाळा सुरू होताच तुमसर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच वीज विभागाचे स्थानिक तांत्रिक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रभर वीज पुरवठा बंद राहत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देआष्टीकर रात्रभर अंधारात : डासांमुळे नागरिक त्रस्त, महावितरणच्या कर्मचाऱ्यांबद्दल गावकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पावसाळ्याच्या दिवसात वीज अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पावसाळा सुरू होताच तुमसर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच वीज विभागाचे स्थानिक तांत्रिक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रभर वीज पुरवठा बंद राहत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील आष्टी परिसरातील नागरिकांतून वीज विभागाच्या कर्मचाºयांविरूद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.वीजपुरवठा त्वरीत सुरळीत न झाल्यास पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पावसाला सरवात होताच हमखास तात्काळ वीज पुरवठा खंडीत होतो. शहरी भागात अभियंते तथा कर्मचारी तात्काळ दुरूस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत करतात ,परंतु ग्रामीण परिसरात मात्र वीज वितरण विभागाचे कर्मचारी याकडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागते. मागील चार दिवसापासून तुमसर तालुक्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा नेहमीच खंडीत होत असून रात्रभर बंद राहतो. रविवार व सोमवारी रात्री वीज पुरवठा खंडीत होता. तुमसर शहराचा भंडारा रोडवरील परिसर व देव्हाडी परिसरात सोमवारी रात्री वीजपुरवठा खंडीत होता. देव्हाडी परिसरात जंप्पर तुटल्याने रात्रभर कमी दाबाचा वीज पुरवठा होता.आष्टी येथील नागरिक संतप्तआष्टी हे तुमसर तालुक्याचे शेवटचे टोक आहे. येथे मागील पंधरा दिवसापासून कायम वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडीत होतो.त्यामुळे रात्रभर गावात वीज पुरवठा बंद राहतो. या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांत प्रचंड चीड निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडेआष्टी परिसरातील वीज वितरण कार्यालयाचे तांत्रिक कर्मचारी नागपूर, भंडारा, तुमसर येथून अप-डावून करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास पावसाळ्यात सरपटणाऱ्या जीव जंतुमुळे नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या संबंधित कर्मचाºयांवर तात्काळ कारवाईची मागणी पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी केली आहे.