शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

तुमसर तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:24 IST

पावसाळ्याच्या दिवसात वीज अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पावसाळा सुरू होताच तुमसर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच वीज विभागाचे स्थानिक तांत्रिक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रभर वीज पुरवठा बंद राहत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देआष्टीकर रात्रभर अंधारात : डासांमुळे नागरिक त्रस्त, महावितरणच्या कर्मचाऱ्यांबद्दल गावकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पावसाळ्याच्या दिवसात वीज अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पावसाळा सुरू होताच तुमसर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच वीज विभागाचे स्थानिक तांत्रिक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रभर वीज पुरवठा बंद राहत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील आष्टी परिसरातील नागरिकांतून वीज विभागाच्या कर्मचाºयांविरूद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.वीजपुरवठा त्वरीत सुरळीत न झाल्यास पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पावसाला सरवात होताच हमखास तात्काळ वीज पुरवठा खंडीत होतो. शहरी भागात अभियंते तथा कर्मचारी तात्काळ दुरूस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत करतात ,परंतु ग्रामीण परिसरात मात्र वीज वितरण विभागाचे कर्मचारी याकडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागते. मागील चार दिवसापासून तुमसर तालुक्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा नेहमीच खंडीत होत असून रात्रभर बंद राहतो. रविवार व सोमवारी रात्री वीज पुरवठा खंडीत होता. तुमसर शहराचा भंडारा रोडवरील परिसर व देव्हाडी परिसरात सोमवारी रात्री वीजपुरवठा खंडीत होता. देव्हाडी परिसरात जंप्पर तुटल्याने रात्रभर कमी दाबाचा वीज पुरवठा होता.आष्टी येथील नागरिक संतप्तआष्टी हे तुमसर तालुक्याचे शेवटचे टोक आहे. येथे मागील पंधरा दिवसापासून कायम वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडीत होतो.त्यामुळे रात्रभर गावात वीज पुरवठा बंद राहतो. या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांत प्रचंड चीड निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडेआष्टी परिसरातील वीज वितरण कार्यालयाचे तांत्रिक कर्मचारी नागपूर, भंडारा, तुमसर येथून अप-डावून करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास पावसाळ्यात सरपटणाऱ्या जीव जंतुमुळे नागरिकांच्या जीवाला धोका वाढला आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या संबंधित कर्मचाºयांवर तात्काळ कारवाईची मागणी पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी केली आहे.