शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जलपुनर्भरण अभियानाचा फज्जा !

By admin | Updated: April 15, 2015 00:31 IST

जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला ..

पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली : कृती आराखड्याने काय साध्य होणार?पवनी : जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला प्रशासकीय कार्यालयांसोबतच नागरिकांनीही जुमानले नाही. परिणामी, पावसाळ्यात कोसळणारे पाणी वाहून जात असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात उदभवणाऱ्या पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद आहे. भंडारा जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात प्रकर्षाने जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने १४ फेब्रुवारी २००२ ला छतावरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत साठविण्यासंदर्भात जलपुनर्भरण मोहिमेसंदर्भात आदेश निर्गमित केले आहे.विशेषत: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषद, ग्रामपंचायती यासह इतर प्रशासकीय कार्यालयांना हा उपक्रम राबविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत एकही कार्यालय या उपक्रमाची चोख अंमलबजावणी करताना दिसत नाही. प्रशासकीय कार्यालयांप्रमाणेच जिल्ह्यातील नागरिकांनीही जलपुनर्भरण मोहिमेला दुय्यम स्थान दिले आहे. नव्याने घर उभारताना शेकडो फुट बोअरवेल खोदल्या जात आहेत; पण छतावरून पडणारे पावसाचे पाणी त्यात साठविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळेच पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीवरून वाहून जात आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्याच्या प्रारंभीच अनेकांच्या बोअरवेल, हातपंप, विहिरी कोरड्या पडत आहेत. यावर्षीही पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, पाणीटंचाईवर मात करण्याची ही तात्पुरती सोय ठरते. त्यामुळे पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जलपुनर्भरणाशिवाय गत्यंतर नसल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)जलपुनर्भरणाचे महत्त्वछतावर पडणारे पावसाचे पाणी बोअरवेलजवळ खड्डा खोदून साठविल्यास बारमाही पाण्याकरिता इतर कुठल्याही स्रोतांवर अवलंबून राहावे लागत नाही. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी लागणार्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीची धूप रोखण्यास बहुतांशी मदत मिळते.