शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जिल्ह्यात जलपुनर्भरण अभियानाचा फज्जा !

By admin | Updated: April 15, 2015 00:46 IST

जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला प्रशासकीय कार्यालयांसोबतच नागरिकांनीही जुमानले नाही.

पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली : कृती आराखड्याने काय साध्य होणार?पवनी : जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला प्रशासकीय कार्यालयांसोबतच नागरिकांनीही जुमानले नाही. परिणामी, पावसाळ्यात कोसळणारे पाणी वाहून जात असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात उदभवणाऱ्या पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद आहे. भंडारा जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात प्रकर्षाने जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने १४ फेब्रुवारी २००२ ला छतावरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत साठविण्यासंदर्भात जलपुनर्भरण मोहिमेसंदर्भात आदेश निर्गमित केले आहे.विशेषत: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषद, ग्रामपंचायती यासह इतर प्रशासकीय कार्यालयांना हा उपक्रम राबविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत एकही कार्यालय या उपक्रमाची चोख अंमलबजावणी करताना दिसत नाही. प्रशासकीय कार्यालयांप्रमाणेच जिल्ह्यातील नागरिकांनीही जलपुनर्भरण मोहिमेला दुय्यम स्थान दिले आहे. नव्याने घर उभारताना शेकडो फुट बोअरवेल खोदल्या जात आहेत; पण छतावरून पडणारे पावसाचे पाणी त्यात साठविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळेच पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीवरून वाहून जात आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्याच्या प्रारंभीच अनेकांच्या बोअरवेल, हातपंप, विहिरी कोरड्या पडत आहेत. यावर्षीही पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, पाणीटंचाईवर मात करण्याची ही तात्पुरती सोय ठरते. त्यामुळे पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जलपुनर्भरणाशिवाय गत्यंतर नसल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)जलपुनर्भरणाचे महत्त्वछतावर पडणारे पावसाचे पाणी बोअरवेलजवळ खड्डा खोदून साठविल्यास बारमाही पाण्याकरिता इतर कुठल्याही स्रोतांवर अवलंबून राहावे लागत नाही. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी लागणार्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीची धूप रोखण्यास बहुतांशी मदत मिळते.