शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

जिल्ह्यात जलपुनर्भरण अभियानाचा फज्जा !

By admin | Updated: April 15, 2015 00:46 IST

जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला प्रशासकीय कार्यालयांसोबतच नागरिकांनीही जुमानले नाही.

पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली : कृती आराखड्याने काय साध्य होणार?पवनी : जिल्ह्यात जलपुनर्भरण मोहिमेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाला प्रशासकीय कार्यालयांसोबतच नागरिकांनीही जुमानले नाही. परिणामी, पावसाळ्यात कोसळणारे पाणी वाहून जात असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात उदभवणाऱ्या पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद आहे. भंडारा जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये कमीअधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे.दरवर्षीच्या उन्हाळ्यात प्रकर्षाने जाणवणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने १४ फेब्रुवारी २००२ ला छतावरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत साठविण्यासंदर्भात जलपुनर्भरण मोहिमेसंदर्भात आदेश निर्गमित केले आहे.विशेषत: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषद, ग्रामपंचायती यासह इतर प्रशासकीय कार्यालयांना हा उपक्रम राबविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत एकही कार्यालय या उपक्रमाची चोख अंमलबजावणी करताना दिसत नाही. प्रशासकीय कार्यालयांप्रमाणेच जिल्ह्यातील नागरिकांनीही जलपुनर्भरण मोहिमेला दुय्यम स्थान दिले आहे. नव्याने घर उभारताना शेकडो फुट बोअरवेल खोदल्या जात आहेत; पण छतावरून पडणारे पावसाचे पाणी त्यात साठविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळेच पावसाळ्यात पडणारे पाणी जमिनीवरून वाहून जात आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्याच्या प्रारंभीच अनेकांच्या बोअरवेल, हातपंप, विहिरी कोरड्या पडत आहेत. यावर्षीही पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, पाणीटंचाईवर मात करण्याची ही तात्पुरती सोय ठरते. त्यामुळे पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जलपुनर्भरणाशिवाय गत्यंतर नसल्याचे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)जलपुनर्भरणाचे महत्त्वछतावर पडणारे पावसाचे पाणी बोअरवेलजवळ खड्डा खोदून साठविल्यास बारमाही पाण्याकरिता इतर कुठल्याही स्रोतांवर अवलंबून राहावे लागत नाही. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी लागणार्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीची धूप रोखण्यास बहुतांशी मदत मिळते.