शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

चौरास भागात ‘धरण उशाला, कोरड घशाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:41 IST

अथांग पाणी असलेले गोसे धरण डोळ्याने दिसते. परंतु पाणी मात्र मिळत नाही. सिंचनासाठी विहिरींचाच आधार घ्यावा लागतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींनीही तळ गाठला. अशा परिस्थितीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पवनी, लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासाठी धरण उशाला, कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देविहिरी कोरड्या : शेतकऱ्यांना भोगाव्या लागणार यातना

खेमराज डोये।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : अथांग पाणी असलेले गोसे धरण डोळ्याने दिसते. परंतु पाणी मात्र मिळत नाही. सिंचनासाठी विहिरींचाच आधार घ्यावा लागतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींनीही तळ गाठला. अशा परिस्थितीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पवनी, लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासाठी धरण उशाला, कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.पवनी-लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी कसदार. विहिरीच्या पाण्यावर सिंचन करून दुभार-तिभार शेती केली जाते. परंतु गोसे प्रकल्पाच्या कालव्याच्या बांधकामाने आणि शेतीसाठी अतिपाण्याच्या उपसामुळे आता जलपातळी खोल गेली आहे. परिसातील ८० टक्के विहिरी कोरड्या पडत आहेत. उन्हाळ्यातही हिरवेगार दिसणारे शेत आता पडीक दिसू लागले आहे. वैनगंगा नदी चौरस भागाच्या जवळून वाहते. गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी प्रकल्प पवनी तालुक्यात आहे. धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम करताना भूमीगत जलप्रवाह रोखण्यात आले. परिणामी विहिरींंचे झरे आटले. तेथू चौरास भागांच्या शेतीला घरघर लागली. बारमाही वाहणारे नदीही कोरडी पडू लागली. रेतीच्या उपशाने त्यात भर पडली. या सर्वांचा परिणाम अप्रत्यक्षपणे सिंचनावर होत आहे.चौरास भागात मोठ्या प्रमाणात जलसाठा होता. त्यामुळे येथील शेतकरी वर्षातून खरीप, रबी अशी भाताची दोन पिके घेत होते. इतर पिकांचीही भर पडत होती. मात्र परिस्थिती बदलत गेली. आता डावा कालवा बांधून आहे. परंतु त्यातून पाणी येत नाही.हजारो हेक्टर शेती पाण्यासाठी तहानली आहे. पाणी नसल्याने मोटारपंपही बंद आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना यातना सहन कराव्या लागते.डावा कालवा ठरला अभिशापगोसे प्रकल्पाचा डावा कालवा चौरास भागातून जातो. १२ किलोमीटरच्या कालव्याचे काम २० वर्षापासून पूर्ण झाले नाही. या ना त्या कारणाने काम रखडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच मिळेनासे झाले. गेल्या पाच वर्षापासून कालव्यावरील लघुवितरिकाही तयार झाल्या नाही. गेट लावले नाही. या सर्वाचा परिणाम सिंचनावर होत आहे. गोसे धरणाचा कालवा चौरास भागासाठी अभिशाप ठरत आहे.