शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

चौरास भागात ‘धरण उशाला, कोरड घशाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:41 IST

अथांग पाणी असलेले गोसे धरण डोळ्याने दिसते. परंतु पाणी मात्र मिळत नाही. सिंचनासाठी विहिरींचाच आधार घ्यावा लागतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींनीही तळ गाठला. अशा परिस्थितीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पवनी, लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासाठी धरण उशाला, कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देविहिरी कोरड्या : शेतकऱ्यांना भोगाव्या लागणार यातना

खेमराज डोये।लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : अथांग पाणी असलेले गोसे धरण डोळ्याने दिसते. परंतु पाणी मात्र मिळत नाही. सिंचनासाठी विहिरींचाच आधार घ्यावा लागतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींनीही तळ गाठला. अशा परिस्थितीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पवनी, लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासाठी धरण उशाला, कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.पवनी-लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी कसदार. विहिरीच्या पाण्यावर सिंचन करून दुभार-तिभार शेती केली जाते. परंतु गोसे प्रकल्पाच्या कालव्याच्या बांधकामाने आणि शेतीसाठी अतिपाण्याच्या उपसामुळे आता जलपातळी खोल गेली आहे. परिसातील ८० टक्के विहिरी कोरड्या पडत आहेत. उन्हाळ्यातही हिरवेगार दिसणारे शेत आता पडीक दिसू लागले आहे. वैनगंगा नदी चौरस भागाच्या जवळून वाहते. गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी प्रकल्प पवनी तालुक्यात आहे. धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम करताना भूमीगत जलप्रवाह रोखण्यात आले. परिणामी विहिरींंचे झरे आटले. तेथू चौरास भागांच्या शेतीला घरघर लागली. बारमाही वाहणारे नदीही कोरडी पडू लागली. रेतीच्या उपशाने त्यात भर पडली. या सर्वांचा परिणाम अप्रत्यक्षपणे सिंचनावर होत आहे.चौरास भागात मोठ्या प्रमाणात जलसाठा होता. त्यामुळे येथील शेतकरी वर्षातून खरीप, रबी अशी भाताची दोन पिके घेत होते. इतर पिकांचीही भर पडत होती. मात्र परिस्थिती बदलत गेली. आता डावा कालवा बांधून आहे. परंतु त्यातून पाणी येत नाही.हजारो हेक्टर शेती पाण्यासाठी तहानली आहे. पाणी नसल्याने मोटारपंपही बंद आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना यातना सहन कराव्या लागते.डावा कालवा ठरला अभिशापगोसे प्रकल्पाचा डावा कालवा चौरास भागातून जातो. १२ किलोमीटरच्या कालव्याचे काम २० वर्षापासून पूर्ण झाले नाही. या ना त्या कारणाने काम रखडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच मिळेनासे झाले. गेल्या पाच वर्षापासून कालव्यावरील लघुवितरिकाही तयार झाल्या नाही. गेट लावले नाही. या सर्वाचा परिणाम सिंचनावर होत आहे. गोसे धरणाचा कालवा चौरास भागासाठी अभिशाप ठरत आहे.