शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
4
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
5
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
6
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
7
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
8
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
9
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
10
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
11
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
12
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
13
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
14
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
15
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
16
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
17
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
18
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
19
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
20
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थ उघड्यावर आरोग्याची ‘ऐसीतैसी’

By admin | Updated: September 10, 2014 23:27 IST

गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही पर्वा

भंडारा : गरमागरम भजी, पाणीपुरी, भेळ, नुडल्स, मंचुरीअन यांच्यावर घोंघावत असलेल्या माशा. त्यांच्यावर ताव मारणारे खव्वय्ये, हे दृश्य आजघडीला सर्वत्र दिसून येत आहे. तरीसुद्धा त्याची कोणतीही पर्वा न करता पोटपुजा करताना दिसतात. पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे नानाविध आजारांना आमंत्रण मिळत असते. असे असतानाही खाण्याचा मोह आवरता येत नाही. आजारांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे.वैद्यकीय सुत्रानुसार ७० टक्के पोटाचे आजार हे उघड्यावरील अन्न खाल्लयाने हात असतात. यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. दुसरीकडे उघड्यावर खाद्यान्न विकणाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने हा प्रकार सर्रास सुरू आहे. बदलत्या जिवनशैलीमुळे खाण्याच्या पद्धतीही बदलल्या. आज ठिकठिकाणी खानावळी, हॉटेल्स, रेस्टॉरेंट थाटण्यात आलेली आहेत. पाश्चात्य देशांमध्ये प्रसिद्ध असलेले विविध पदार्थही मेजवाणीसाठी तयार असतात. चिभेची चव बदलण्यासाठी प्रत्येक कुटूंब या पदार्थांचा आस्वाद घेत असतात. परंतु, आपण जे खात आहोत ते कितपत योग्य आहे, याची माहिती कुणालाही नसते. जिल्ह्यात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी अन्न सुरक्षा मानक कायद्यातील निकषांचा विचार करावयास पाहिजे. परंतु, जिल्ह्यात या कायद्याचा कुणीही विचार करीत नाही. हे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. मागीलवर्षी अन्न व औषधी विभागाच्या नागपूर येथील चमूने जिल्ह्याचा दौरा करुन हॉटेल्स, खानावळी, रेस्टॉरेंटमधील पाहणी केली होती. त्यातील अनेक जणांकडे व्यवसाय करण्याचा परवाना नव्हता. तेव्हा त्यांच्याकडून परवाना तसेच दंड आकारण्यात आला होता. त्यानंतर ही मोहिम राबविण्यात आली नाही. जिल्ह्यात मुख्य रस्त्यावर तसेच गर्दीच्या ठिकाणी खाद्यांनांचे दुकाने थाटण्यात आली आहेत. त्या दुकानांना परवाने आहेत किंवा नाही याची तसदी अन्न व औषधी विभागाने कधी घेतली नाही. शिवाय या दुकानांमध्ये वापरण्यात येणारे अन्न पदार्थ, पाणी यांची गुणवत्ता काय, याचाही विचार करण्यात आलेला नाही. या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी नोंदणी व परवाने तयार करण्यावरच अधिक भर देत आहे. नियमाप्रमाणे अन्न पदार्थ व विक्र ीचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्याठिकाणी वापरण्यात येणारे पिण्याचे पाण्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेतून तपासून घेण्यात यावे, ज्याठिकाणी खाद्यपदार्थांची विक्र ी असते त्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी ठेवावे आदी निकष आहेत. परंतु, यापैकी एकाही निकषांची पुर्तता केली जात नाही. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. याकडे नागरीकांनी लक्ष द्यायला हवे, तरच जागृती निर्माण होईल. (प्रतिनिधी)