शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तंत्रशिक्षणातून जीवनात आनंदाची बाग फुलवा

By admin | Updated: January 25, 2015 23:09 IST

तांत्रिक शिक्षणामुळे युवकांच्या जीवनात काय बदल होऊ शकतो आणि त्यातून देशाच्या तांत्रिक विकासाला काय हातभार लागू शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. तांत्रिक शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात

साकोली : तांत्रिक शिक्षणामुळे युवकांच्या जीवनात काय बदल होऊ शकतो आणि त्यातून देशाच्या तांत्रिक विकासाला काय हातभार लागू शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. तांत्रिक शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. खासगी क्षेत्रात अधिक वाव आहे. तांत्रिक शिक्षण घेतलेल्या युवकांची येणाऱ्या काळाची गरज आहे. त्यामुळे तंत्रशिक्षणाची कास धरा, जीवनात आनंदाची बाग फुलवा, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा. आरेकर यांनी केले.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई आणि वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा २०१४-१५ यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील प्राचार्य डॉ. मनीष बिहाडे, तर प्रमुख पाहुणे प्राचार्य मनीष लेंढे उपस्थित होते. दरम्यान, मेळावा परिसरात विविध महाविद्यालयाकडून लावण्यात आलेल्या स्टॉलचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यात नागपूर भंडारा, वरठी, देवरी, उमरेड येथील विविध तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाचा इन्स्टिटयूटचा समावेश होता. मेळाव्यातील मार्गदर्शन ऐकण्यासाठी तालुक्यातील एकोडी, बाम्पेवाडा, किन्ही, जांभळी/सडक, वडेगाव, साकोली, सेंदुरवाफा, उमरी, सातलवाडा, पिंडकेपार, सानगडी, कुंभली येथील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेकडोच्या संख्येत हजेरी लावली.दुपारच्या सत्रात नागपूर येथील आशिष शर्मा यांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य अनिरुध्द अभ्यंकर तर संचालन व आभार प्रा. रजनी गायधनी यांनी केले. कार्यक्रमासाठी एस. सी. तोडासे, एस. सी. ठाकरे, व्ही. पी. बघेले, प्रा. अनिल सार्वे, प्राचार्य पुष्पराज झोडे, राकेश चकोले, प्रा. तृप्ती वासनिक, प्रा. अश्विनी रंगारी, प्रा. रुपाली सोनडवले, प्रा.विशाल परशूरामकर, रवी भोंगाने तसेच वैनगंगा पॉलिटेक्निक साकोली यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)