शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

बँक आणि तहसीलच्या दुर्लक्षित कारभाराने पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:31 IST

सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप चिखली येथील मंगल हटवार, होमदास गायधने, रामदास हटवार, नारायण गायधने, संगीता फदे, जीवन ...

सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप चिखली येथील मंगल हटवार, होमदास गायधने, रामदास हटवार, नारायण गायधने, संगीता फदे, जीवन हटवार, रामदास हटवार, दसाराम वाघमारे, खरबी येथील विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिल बोरकर हे पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. ही मदत मिळवण्यासाठी भंडारा तहसील कार्यालयात चिखली येथील शेतकरी तथा भंडारा तालुका भाजपा ग्रामीणचे महामंत्री विष्णुदास हटवार यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर २१ जानेवारीला भंडारा तहसीलदारांनी बँक ऑफ इंडियाला १५१ पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी व धनादेश बँकेला पाठवला. यानंतर बँकेकडून राष्ट्रीयीकृत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्वरित जमाही झाले. मात्र, यातील शहापूर येथे को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र आजपर्यंतही मदत जमा झालेली नाही. बँकेकडून ४ फेब्रुवारीला भंडारा तहसीलदारांना पुन्हा यादी परत पाठवण्याची माहिती बँकेने दिली. त्यामुळे भंडारा तहसील कार्यालयात शेतकरी विचारपूस करायला गेले असता, तहसीलचे कर्मचारी बँकेकडे बोट दाखवतात, तर बँक पुन्हा तहसील कार्यालयाकडे बोट दाखवते. यामध्ये नाहक बळीराजाला पायपीट करावी लागत आहे. आधीच तोकडी मिळणारी मदत आणि खरिपातील अतोनात पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यात प्रशासनाच्या उदासीनतेचा फटकाही सहन करावा लागत आहे. भंडारा तहसील कार्यालयाने पुढाकार घेऊन मदत त्वरित जमा करावी, अशी मागणी भंडारा तालुका ग्रामीणचे भाजपा महामंत्री विष्णुदास हटवार, खरबी येथील विकास सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अनिल बोरकर, मंगल हटवार, विनोद वाघमारे, नारायण गायधने, रामदास गायधने, संगीता फदे, जीवन हटवार, रामदास हटवार यांनी भंडाराचे तहसीलदार अक्षय पोयाम यांच्याकडे केली आहे.

कोट

पूरग्रस्त यादीत नाव आहे, पण अजूनही पैसे जमा झाले नाहीत. यासाठी भंडारा तहसील कार्यालय आणि बँकेत अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, अद्याप माझ्या मुलाच्या खात्यात एक रुपयाही मदत जमा झाली नाही. आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात प्रशासनाचा निष्काळजीपणा, त्यात आणखी भर घालत आहेत. तहसीलदारांनी याकडे लक्ष देऊन त्वरित मदत जमा करण्याची गरज आहे.

विष्णुदास हटवार, शेतकरी चिखली तथा भाजपा तालुका महामंत्री, भंडारा

कोट

राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये बळीराजाला मदत दिली. आज सहा महिने गेले तरी ती मदत मिळाली नाही. प्रशासनाने बाकीची कामे सोडून शेतकऱ्यांचे काम पहिल्यांदा केले पाहिजे. मदत मिळाली नाही तर यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत.

अनिल बोरकर, विकास सेवा सोसायटी, अध्यक्ष, खरबीनाका

बॉक्स

अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीन, धान, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली. यासाठी तलाठी, कृषी सहायकांनी पिकांचे पंचनामेही केले. मात्र, अनेक दिवसांनंतरही आज बँक आणि तहसील प्रशासनाच्या समन्वयाअभावी अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. भंडारा तालुक्यातील चिखली, खरबी येथील को-ऑपरेटिव्ह बँकेचे खाते असलेल्यांना अद्याप नुकसानभरपाईची मदत जमा झालेली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आठवडाभरात पैसे जमा न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बँक आणि तहसील प्रशासनाच्या समन्वयाअभावी नाहक शेतकऱ्यांना अनेकदा विचारपूस करण्यासाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.