शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पाच सराईत गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:17 IST

तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली दखललोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे. उर्वरित तीन जणांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत) कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे.तुमसर शहर संवेदनशील असून शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे.मागील काही महिन्यात तुमसरात गुन्ह्यात वाढ झाली होती. शहरातील रॉकी वासनिक (२५), छब्ब्या कटकवार (३०), प्रशांत धुर्वेे (३२) यांच्यावर २३ आॅक्टोबर २०१६ मध्ये दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली. तसेच डोडल्या हटवार (२८), आदित्य पांडे (२२) यांच्यावर १ जून २०१७ ला दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्हा हद्दपारची कारवाईचा त्यात समावेश आहे. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाल ेयांनी सदर आदेश काढले. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची पुराव्यानिशी शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या) अंतर्गत तीन जणांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. यात सतिष डहाट, संतोष दहाट तथा आशिष उर्फ छपरी गजभिये यांचा समावेश आहे. त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर गुन्हे तथा आर्म्स अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर कारवाई केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे. तुमसरात मागील काही महिन्यापासून गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्हा वाढीचे कारण पोलीस विभागाने वरिष्ठांना सादर केले. त्यानंतर गुन्हेगारावर संबंधित कारवाई करण्यात आली आहे. तुमसर शहर भंडारा जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. सध्या गुन्ह्यात या शहराने मोठ्या शहरांना मागे टाकल्याची धक्कादायक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीअंती कारवाईचे येथे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, गुन्हेगारांवर जबर बसावी, गुन्हेगारीवृत्तीला आळा बसावा हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. शहर अशांत करणाऱ्या असामाजिक तत्वांना डोके वर काढू न देणे हा प्रमुख उद्देश आहे. टोळी व हिंसात्मक कारवाई समाप्त होण्यास मदत होईल. -विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर.