शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

पाच सराईत गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:17 IST

तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली दखललोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे. उर्वरित तीन जणांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत) कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे.तुमसर शहर संवेदनशील असून शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे.मागील काही महिन्यात तुमसरात गुन्ह्यात वाढ झाली होती. शहरातील रॉकी वासनिक (२५), छब्ब्या कटकवार (३०), प्रशांत धुर्वेे (३२) यांच्यावर २३ आॅक्टोबर २०१६ मध्ये दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली. तसेच डोडल्या हटवार (२८), आदित्य पांडे (२२) यांच्यावर १ जून २०१७ ला दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्हा हद्दपारची कारवाईचा त्यात समावेश आहे. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाल ेयांनी सदर आदेश काढले. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची पुराव्यानिशी शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या) अंतर्गत तीन जणांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. यात सतिष डहाट, संतोष दहाट तथा आशिष उर्फ छपरी गजभिये यांचा समावेश आहे. त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर गुन्हे तथा आर्म्स अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर कारवाई केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे. तुमसरात मागील काही महिन्यापासून गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्हा वाढीचे कारण पोलीस विभागाने वरिष्ठांना सादर केले. त्यानंतर गुन्हेगारावर संबंधित कारवाई करण्यात आली आहे. तुमसर शहर भंडारा जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. सध्या गुन्ह्यात या शहराने मोठ्या शहरांना मागे टाकल्याची धक्कादायक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीअंती कारवाईचे येथे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, गुन्हेगारांवर जबर बसावी, गुन्हेगारीवृत्तीला आळा बसावा हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. शहर अशांत करणाऱ्या असामाजिक तत्वांना डोके वर काढू न देणे हा प्रमुख उद्देश आहे. टोळी व हिंसात्मक कारवाई समाप्त होण्यास मदत होईल. -विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर.