शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

पाच सराईत गुन्हेगार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:17 IST

तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली दखललोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसरातील पाच सराईत गुन्हेगारांवर तडिपारची कारवाई करण्यात आली. या कारवाईत भंडारा जिल्हा हद्दपारचा समावेश आहे. उर्वरित तीन जणांवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत) कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे.तुमसर शहर संवेदनशील असून शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे.मागील काही महिन्यात तुमसरात गुन्ह्यात वाढ झाली होती. शहरातील रॉकी वासनिक (२५), छब्ब्या कटकवार (३०), प्रशांत धुर्वेे (३२) यांच्यावर २३ आॅक्टोबर २०१६ मध्ये दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली. तसेच डोडल्या हटवार (२८), आदित्य पांडे (२२) यांच्यावर १ जून २०१७ ला दोन वर्षाकरिता तडीपारची कारवाई करण्यात आली. भंडारा जिल्हा हद्दपारची कारवाईचा त्यात समावेश आहे. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाल ेयांनी सदर आदेश काढले. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची पुराव्यानिशी शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधात्मक कायद्या) अंतर्गत तीन जणांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. यात सतिष डहाट, संतोष दहाट तथा आशिष उर्फ छपरी गजभिये यांचा समावेश आहे. त्यांच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर गुन्हे तथा आर्म्स अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर कारवाई केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव कारवाई आहे. तुमसरात मागील काही महिन्यापासून गुन्ह्यात वाढ झाली आहे. गुन्हा वाढीचे कारण पोलीस विभागाने वरिष्ठांना सादर केले. त्यानंतर गुन्हेगारावर संबंधित कारवाई करण्यात आली आहे. तुमसर शहर भंडारा जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. सध्या गुन्ह्यात या शहराने मोठ्या शहरांना मागे टाकल्याची धक्कादायक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीअंती कारवाईचे येथे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, गुन्हेगारांवर जबर बसावी, गुन्हेगारीवृत्तीला आळा बसावा हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. शहर अशांत करणाऱ्या असामाजिक तत्वांना डोके वर काढू न देणे हा प्रमुख उद्देश आहे. टोळी व हिंसात्मक कारवाई समाप्त होण्यास मदत होईल. -विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर.