शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

प्रजनन काळात मासेमारीवर बंदी

By admin | Updated: July 29, 2014 23:38 IST

माशांच्या प्रजनन काळात मासेमारीवर बंद आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन असल्याची माहिती आहे. विदर्भातील मासेमार बहुतांश गरीब आहेत. यावर पर्यायी तोडगा काढण्यासंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न सुरु

प्रस्ताव विचाराधीन : वर्षभर मुबलक मासे मिळावे याकरिता प्रयत्नमोहन भोयर - तुमसरमाशांच्या प्रजनन काळात मासेमारीवर बंद आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन असल्याची माहिती आहे. विदर्भातील मासेमार बहुतांश गरीब आहेत. यावर पर्यायी तोडगा काढण्यासंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे सुत्राने सांगितले. जुलै ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत माशांचा प्रजननकाळ सुरु असतो. भरपूर मासे खवय्यांना मिळावे व मासेमारांना मोठ्या प्रमाणात वर्षभर रोजगार प्राप्त व्हावा याकरिता माशांच्या प्रजननकाळात मासेमारीवर सरसकट बंदी आणण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे. मुंबई, कोकणासह समुद्र किनाऱ्यावर प्रजननकाळात मासेमारी बंद असते. देशाच्या इतर काही राज्यात माशांच्या प्रजननकाळात मासेमारीवर बंदी आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी तिथे सुरु होते. प्रजननकाळात मासेमारी केल्याने कोट्यवधी मासे जन्मापूर्वीच मृत्यूमुखी पडतात.सध्या मादी माशांच्या पोटात लक्षावधी अंडी आहेत. मासे जन्माला येण्यापूर्वीच त्यांची हत्या होते. ही बंदी आणली तर पुढील काळात वर्षभर भरपूर प्रमाणात मासे उपलब्ध होतील. यामुळे मासेमारांचे अच्छे दिन येतील असा तर्क शासनस्तरावर सुरु आहे.पूर्व विदर्भ व पश्चिम गोड्या पाण्यात बाराही महिने मासेमारी सुरु असते. येथील मासेमार पोटाची खळगी भरण्याकरिता मासेमारी करतात ही बंदी आणली तर त्याचे कोणते परिणाम होतील. यावर सशक्त पर्यायी तोडगा कोणता असेल यावर शासनस्तरावर खलबते सुरु आहेत. मासेमारी संस्था येथे हजारोंच्या संख्येत आहेत. परंतु असंघटीत मासेमारांची संख्या येथे मोठी आहे. शिक्षणाच्या अभावामुळे ते पारंपारिक व्यवसाय करीत आहेत. खऱ्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे.तोडग्याशिवाय बंदी नाहीमाशांच्या प्रजननकाळात बंदी आणली तर विदर्भातील मासेमारांवर उपासमारीची पाळी येईल. दोन महिन्यांच्या कालावधीत शासनाने सशक्त पर्यायी तोडगा काढण्याची गरज आहे. प्रजनन काळात समुद्रकिनारपट्टीत मासेमारी केली जात नाही. देशाच्या इतर काही राज्यात त्यावर बंदी आहे. परंतु तेथील स्थानिक स्थिती, मासेमारांची आर्थिक स्थिती व विदर्भातील मासेमारांची स्थिती यात मोठी तफावत आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय मत्स्य महामंडळाचे संचालक संजय केवट यांनी दिली.