शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नदीपात्रात मासेमारीला बंदी

By admin | Updated: January 25, 2015 23:08 IST

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदी पात्रातील धरणनजिक मासेमारी करण्यास बंदी घालण्यास आली आहे. यामुळे मांडवी गावातील ३५ ढिवर समाज बांधवाचे कुटूंब अडचणीत आलेली आहेत.

रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा)धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदी पात्रातील धरणनजिक मासेमारी करण्यास बंदी घालण्यास आली आहे. यामुळे मांडवी गावातील ३५ ढिवर समाज बांधवाचे कुटूंब अडचणीत आलेली आहेत. यात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची ओरड गावात सुरू झाली आहे.तिरोडा तालुक्यातील अदानी विज प्रकल्प आणि धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदीवर ४५० कोटी खर्चून धरण बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाची पाणी संचय पातळी २६०.०० मिटर आहे. यंदा ६.५० मिटर धरणात पाणी साठवणूक करण्यात येत आहे. यामुळे नदी पात्रात १८ कि़मी. पर्यंत पाणी विस्तारलेले आहे. नदी काठावरील गावे आणि शेत शिवारात पाणी शिरत असल्याने धरणाचे गेट उघडण्यात येत आहेत. यामुळे पाण्याचा प्रवाह दाब उर्ध्व भागात वाढत आहे. या धरण बांधकामाच्या पुढे मांडवी गावाचे वास्तव्य आहे. यामुळे धरण लगत या गावातील ढिवर समाजातील बांधव मासेमारी करीत आहेत. मासेमारी त्यांचे उपजिविकेचे साधन आहे. या व्यवसायावर ३५ कुटूंबियांचा उदरनिर्वाह आहे. परंतु बॅरेजनजीक गेल्या काही वर्षात अपघात झालेली असून यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे धरण नजीक प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. या परिसरात प्रवेश बंदी असणारे सुचना फलक लावण्यात आलेली आहे. दरम्यान धरण पासून ५०० मीटरपर्यंत नदी पात्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आल्याने ढिवर समाज बांधवावर रोजगारांची कुऱ्हाड कोसळली आहे. या समाजातील नागरिकांकडे शेती नाही. मासेमारी करणे हा एकमेव रोजगार आहे. या व्यवसायावर बंदी घालण्यात आल्याने उपासमारीचे संकट ओढावले आहे.या परिसरात मासेमारी करीत असताना पोलीस तथा प्रशासनाची दडपशाही वाढली आहे. बॅरेजच्या उर्ध्व भागात प्रवेश बंदी असली तरी मासेमारी करण्यास मंजुरी देण्याची ओरड गावात आहे. दरम्यान ५०० मीटर अंतरच्या पुढे नदी पात्रात मासेमारी करण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु या पात्रात पाणीच राहत नसल्याने मासेमारी अडचणींची ठरत आहे. या पात्रात मासोड्या सापडत नाहीत, असे गाऱ्हाणे ढिवर समाज बांधव मांडव आहेत. मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येणारे पत्र मांडवी ग्रामपंचायत आणि सिहोरा पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहे. गोसीखुर्द डावा कालवा उपविभाग क्रमांक ५ तिरोडा या यंत्रणेने हा पत्रव्यवहार केला आहे.बंदी उठविण्यासाठी भंडाराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावे या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. शिष्टमंडळात सरपंच सहादेव ढबाले, रमेश नागपुरे, मनोज शेंडे, विनोद शेंडे, राधेश्याम नागपुरे, हरिचंद नागपुरे, राजु शेंडे, ईश्वर शेंडे, सुभाष मेश्राम, मानिक शेंडे, शालिक शेंडे, डिगांबर मेश्राम, भारत शेंडे, आशिक शेंडे, चुन्नीलाल नागपुरे, ताराचंद नागपुरे, रूपचंद मेश्राम यांचा समावेश होता.