शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

आधी तुझं माझं जमेना अन् आता तुझ्यावाचून करमेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST

भंडारा : क्षुल्लक कारणावरून दाम्पत्य जीवनात खटके उडत असतात. त्यावरूनच काही वाद विकोपालाही जातात. अशावेळी सुखरूप सुरू असलेल्या संसारवेलीला ...

भंडारा : क्षुल्लक कारणावरून दाम्पत्य जीवनात खटके उडत असतात. त्यावरूनच काही वाद विकोपालाही जातात. अशावेळी सुखरूप सुरू असलेल्या संसारवेलीला वेगळेच वळण मिळत असते. मात्र, गोडी गुलाबीने अनेक दिवस सोबत घालवलेल्या दाम्पत्याला समुपदेशनाची फार मोठी गरज असते. कधी संभ्रमता, तर कधी कुणाच्या सांगण्यावरून आलेला मनातील दुरावाही दूर होत असतो. त्यामुळेच आता तुझं माझं जमेना, आता तुझ्यावाचून करमेना, अशी स्थिती समोर येत आहे.

कौटुंबिक वादाच्या प्रकरणात जिल्हा पोलीस मुख्यालयात असलेल्या भरोसा सेलच्या मार्फत अशाच जवळपास १९४ दाम्पत्यांमध्ये समेट घडवून आणण्यात यश आले आहे. या दाम्पत्याचे पुन्हा मनोमिलन झाले आहे. कोरोनाकाळात पती-पत्नीमध्ये होत असलेली चिडचिड, पैशांची आर्थिक चणचण, पत्नीवर किंवा पतीवर संशय, घरातील मंडळींशी नीट न बोलणे, मोबाईलचा अधिक वापर, आधुनिक राहणीमान या कारणावरून दाम्पत्यांमध्ये तक्रारी वाढत आहेत. अशा संबंधित तक्रारी भरोसा सेलकडे तक्रार प्राप्त होताच दोघांमध्ये समुपदेशन केले जात असते. संसार टिकवण्यासाठी पुढाकार घेत त्यांच्या कुटुंबांच्या मानसिकतेचा अभ्यासही केला जात असतो.

बॉक्स

भांडणाचे लहान-सहान प्रकार

पती-पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होताना दिसून येतात. याशिवाय संशयी वृत्तीने पाहणे, मोबाईलचा वापर, घरातील कामे न करणे, इतरांशी न बोलणे, वारंवार माहेरी जाणे, विनाकारण भांडण करणे, सतत खरेदी करणे आदी क्षुल्लक कारणांवरून दाम्पत्यामध्ये भांडणे होतात.

बॉक्स

भंडारा मुख्यालयात भरोसा सेल

जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात भरोसा सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या सेलमार्फत पती-पत्नीमध्ये झालेला वाद सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो.

कोट बॉक्स

भरोसा सेलकडे घरगुती वादातून अनेक दाम्पत्य अर्ज करतात. त्यानंतर त्यांच्या कुटुंबांच्या मानसिकतेचा व दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन भरोसा सेलकडून त्यांचे समुपदेशन केले जाते. लहान-सहान बाबींमुळे संसार मोडू नये, याची दक्षताही या प्रसंगी घेतली जाते. त्यामुळे भरोसा सेलला समेट घडवून आणण्यात यश मिळत आहे.

-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.