शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडाची जनमानसात धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे घडलेल्या घटनेची धग अद्यापही कायम आहे. जनमानसात याच ...

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे घडलेल्या घटनेची धग अद्यापही कायम आहे. जनमानसात याच घटनेची चर्चा सुरू आहे. घटनेला जबाबदार कोण आणि कारवाई कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महिलांच्या चर्चेचा हाच विषय असून त्या चिमुकल्यांप्रति हळहळ व्यक्त होत आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे अग्नितांडव झाले. यात १० निरागस चिमुकल्यांचा बळी गेला. ही घटना समाजमन सुन्न करून गेली. तीन दिवस झाले तरी भंडारा जिल्ह्यात याच घटनेची चर्चा आहे. प्रत्येक ठिकाणी नेमकी कशी घटना घडली असेल यावरून चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही या घटनेवरून हळहळ व्यक्त करण्यासोबत संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेला दोषी असणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे, असे सोशल मीडियावरून सांगितले जात आहे. महिला तर या घटनेने अधिकच हळव्या झालेल्या दिसतात. सोशल मीडियासह माध्यमातील बातम्या वाचून प्रत्येकाच्या काळजात चर्र होऊन जाते. या घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्येक घटकाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात मंत्र्यांचे आगमन सुरूच होते. रुग्णालयाच्या पाहणीसोबतच अग्निकांडात दगावलेल्या चिमुकल्यांच्या परिवारांच्या भेटी घेऊन सांत्वन केले जात होते. प्रशासनही त्यांच्या मागे धावताना दिसत आहे.

चिमुकल्यांच्या आठवणींनी मातांचा आक्रोश

शनिवारी पहाटे नियतीने काळजाचा तुकडा हिरावलेल्या मातांचा चिमुकल्यांच्या आठवणीने तिसऱ्या दिवशीही आक्रोश सुरू होता. मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील सुकेशिनी आगरे बाळाची आठवण काढून शोकाकुल दिसत होत्या. नातेवाईकांची घरी गर्दी वाढत आहे. प्रत्येक जण घटना कशी घडली हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. टाकला येथील दुर्गा रहांगडाले या मातेचीही अवस्था अशीच आहे. मानसिक धक्क्यातून त्या अद्यापही सावरल्या नाहीत. केवळ आपल्या चिमुकल्यांच्या आठवणींना उजाळा देत अश्रू ढाळत आहेत. मोहाडी तालुक्यातील जांब येथील प्रियंका बसेशंकर, भंडारा लगतच्या भोजापूर येथील गीता बेहरे यांच्या घरी तिसऱ्या दिवशीही बाळांच्या आठवणीने हुंदके ऐकायला येत आहेत. तीन दिवस झाले तरी कुणाच्याही डोळ्यासमोरून त्या निष्पाप बाळांचे चेहरे हलायला तयार नाहीत. येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्यांमुळे पुन्हा-पुन्हा आठवणींना उजाळा मिळून अश्रूंना वाट मोकळी करून दिली जात आहे. नेते घरी येऊन सांत्वनेचे दोन शब्द बोलून जात आहेत. नऊही मातांच्या घरी तोच आक्रोश आजही दिसून येत आहे.