शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

अखेर पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST

थकीत वीज बिलामुळे जिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली होती. सणासुदीच्या दिवसात वीज खंडित केल्याने रोष निर्माण ...

थकीत वीज बिलामुळे जिल्ह्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली होती. सणासुदीच्या दिवसात वीज खंडित केल्याने रोष निर्माण झाला होता. थकीत वीजबिल भरायचे कुणी, हा तिढा कायम होता. सरपंच संघटना बिल भरण्यास तयार नव्हते, तर महावितरण बिल भरल्याशिवाय जोडणी करणार नाही, असे सांगत होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती.

लाखनी व साकोली तालुका सरपंच संघटनेने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घालून वीज समस्या सोडविण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. वीज वितरणचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्याशी चर्चा केली. जिल्हा परिषदेमार्फत वीजबिल भरण्याचे सुचविले. जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला बिल भरण्याचा शब्द दिला. त्यावरून पथदिव्यांची वीज सोमवारी दुपारीच सुरळीत करण्यात आली. पोळ्याच्या पर्वात खंडित वीज सुरळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला. पालांदूर परिसरातील ३१ गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती पालांदूर महावितरणचे साहाय्यक अभियंता मयंक सिंग यांनी सांगितले.

कोट

जिल्हाधिकाऱ्यांनी थकीत वीज बिलाची रक्कम भरण्याचा शब्द दिला. त्यामुळे खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. येत्या दोन ते तीन दिवसांत वीजबिलाची रक्कम भरणा न झाल्यास पुन्हा वीज खंडित केली जाईल.

-स्मिता पारखी,

कार्यकारी अभियंता, महावितरण, साकोली