शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST

भंडारा : सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजाच्या ...

भंडारा : सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीला खीळ बसणार आहे. त्याचे परिणाम ओबीसी समाजावर होणार आहे. राज्य शासनाने आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी आमदार डाॅ.परिणय फुके यांनी केली आहे. या बाबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना निवेदन दिले आहे.

ओबीसी आरक्षणाचा हा विषय सर्वोच्च न्यायालयात सुरु असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १३ महिन्यांच्या काळात न्यायालयीन सुनावणी तब्बल सात वेळा वेळ मागितली. परंतु ओबीसी आरक्षण टिकविता आले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात एक मसुदा पारित केला होता. विद्यमान महाविकास आघाडी सरकारला त्याचे कायद्यात रुपांतर करायचे होते. परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण कायदा तातडीने मंजूर करावा, राज्य सरकारने ओबीसी आयोग तयार करुन जिल्हा व गावनिहाय माहिती अद्ययावत करुन राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी आमदार डाॅ.परिणय फुके यांनी केली आहे.