शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

शिक्षकांचा अशैक्षणिक फेरफटक्यावर कुंपण

By admin | Updated: September 22, 2014 23:15 IST

कोणतेही शासकीय काम नसतानाही अनधिकृतपणे अनेकवेळा काही शिक्षक जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये किंवा इतरत्र अध्यापनाच्या वेळेत भटकतात. रजा न घेता सदर शिक्षक आपले वैयक्तिक

शिक्षकांची नेतागिरी अडचणीत : अध्यापन सोडून भटकणे बंदसाईनाथ कुचनकार - चंद्रपूर कोणतेही शासकीय काम नसतानाही अनधिकृतपणे अनेकवेळा काही शिक्षक जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये किंवा इतरत्र अध्यापनाच्या वेळेत भटकतात. रजा न घेता सदर शिक्षक आपले वैयक्तिक काम करीत असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यात बहुतांश संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा जास्त प्रमाणात समावेश असतो. आता मात्र अध्यापनाचे काम सोडून शाळेच्या वेळेत भटकणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी एक अल्टिमेटमच जारी केला असून कोणत्याही कामासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यायचे असेल तर रजा काढूनच यावे, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ‘नेतागिरी’ करणाऱ्या शिक्षकांवर चांगलाच आळा बसणार आहे.जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे बहुतांश पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करताना विचार करतात. विशेष म्हणजे, काही शिक्षकांनाच स्वत:च्या शाळेविषयी ‘भरोसा’ नाही. यात काही शाळा आणि शिक्षक अपवाद आहे. ढासळलेली विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्ववत आणण्यासाठी शासकीय स्तरापासून तर, प्रशासकीय यंत्रणेपर्यंत सर्व जण कामाला लागले आहे. मात्र आजही काही शिक्षक पाहिजे तसे सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नाही. शाळेमधून सुटी न घेताच शैक्षणिक काम असल्याचा आव दाखवून शाळा सुरु असलेल्या वेळेत वैयक्तिक कामावर शिक्षक भर देतात. अनेकवेळा इतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती किंवा गावात इतरत्र फिरतात. शिक्षक सुटीवर असल्याने विद्यार्थीही वाट्टेल तिथे फिरतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त यावी यासाठी प्रथम बुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविकांत देशपांडे यांनी अलिकडेच शिक्षकांना शाळेच्या वेळत रजा न घेता फिरताना दिसल्यास कारवाई करण्याच्या आदेश दिला आहे. एवढेच नाही तर, त्यांनी शिक्षकांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी पत्राद्वारे कळवावे. शाळा सुरु होण्यापूर्वी किंवा बंद झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना भेटावे, असेही सांगितले आहे. शिक्षकांना आपल्या वैयक्तिक कामासाठी शाळेच्या वेळेत येता येणार नाही. यायचे असेल तर रजा काढूनच यावे असेही म्हटले आहे. यामुळे काही शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र त्यांच्या या आदेशाचे बहुतांश शिक्षक संघटनांनी अभिनंदन केले आहे.