शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

महिला सरपंच नामधारी, नवरेच खरे सत्ताधारी

By admin | Updated: July 12, 2014 23:29 IST

राजकीय क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने ५० टक्के वाटा देऊन त्यांच्यासाठी प्रगतीची दारे उघडी केली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत महिलांची संख्या वाढली आहे.

बारव्हा : राजकीय क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने ५० टक्के वाटा देऊन त्यांच्यासाठी प्रगतीची दारे उघडी केली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत महिलांची संख्या वाढली आहे. मात्र महत्वाच्या पदावर महिला आरुढ असताना सुद्धा पतीदेवच कारभारी असल्याचे दिसून येते. महिला सरपंच पदावर असल्याने त्यांचे पतीदेव अर्थपूर्ण काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.लाखांदूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २१ आॅक्टोबर २०१२ मध्ये झाल्या. संबंध तालुक्यात ५१ सरपंच पदापैकी थेट २७ महिला सरपंच विविध प्रवर्गांतर्गत राखीव करण्यात आले. त्यामध्ये नामाप्र (महिलासाठी) ०८, अनु. जाती साठी (महिला) ०६, सर्वसाधारण (महिला) १२ व अनु. जमाती महिला १ अशी २७ सरपंचाची पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. महिलांचा सामाजिक राजकीय आणि सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने मागील काही वर्षापासून महिलांसाठी विविध योजनांची आखणी शासनाने केली आहे. महिला सक्षमीकरणाचे मुद्दे असो की त्यांचे बचत गट असो. महिलांना पुरुषांच् या बरोबरीने आणण्यासाठी शासन सातत्याने पुढाकार घेत आहे.महिलांनी राजकीय क्षेत्रातील सत्तेची चावी आपल्या हातात घेतली पाहिजे. परंतु महिलांच्या अज्ञानामुळे किंवा जोखीम न स्वीकारण्याच्या संकुचित प्रवृत्तीमुळे अनेक महिला नवऱ्यांच्याच हाती सत्तेची चावी देतात आणि स्वत:ला पूर्ण अधिकार असूनही अगदी कठपुतळीप्रमाणे त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात. नाही तर त्यांना शिविगाळ करून मारहाण केल्याचेही किस्से ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे नवरा म्हणेल तेच महिला सरपंचाला करावे लागत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रकार उजेडात आले. अशा अशिक्षित महिला सरपंचांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. कारण जिथे आयुष्यभर चुल आणि मुल हे सूत्र स्वीकारून संसार केला त्या बाईला राजकारण काय कळणार? याचा अर्थ असा होतो की ती केवळ नामधारी सरपंच राहते. ग्रामपंचायतचा कारभार करणारे खरे कारभारी हे दुसरेच असतात. म्हणजे इथेही पुरुषप्रधान संस्कृतीच अप्रत्यक्षपणे सत्ता भोगत असते, हे नाकारता येत नाही. त्यामुळे राजकारणात महिलांना संधी देऊनही त्यांचे पतीच कारभार हाकत असतील तर महिलांना स्वातंत्र्य मिळाले काय?