शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

महिला सरपंच नामधारी, नवरेच खरे सत्ताधारी

By admin | Updated: July 12, 2014 23:29 IST

राजकीय क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने ५० टक्के वाटा देऊन त्यांच्यासाठी प्रगतीची दारे उघडी केली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत महिलांची संख्या वाढली आहे.

बारव्हा : राजकीय क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने ५० टक्के वाटा देऊन त्यांच्यासाठी प्रगतीची दारे उघडी केली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत महिलांची संख्या वाढली आहे. मात्र महत्वाच्या पदावर महिला आरुढ असताना सुद्धा पतीदेवच कारभारी असल्याचे दिसून येते. महिला सरपंच पदावर असल्याने त्यांचे पतीदेव अर्थपूर्ण काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.लाखांदूर तालुक्यात ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २१ आॅक्टोबर २०१२ मध्ये झाल्या. संबंध तालुक्यात ५१ सरपंच पदापैकी थेट २७ महिला सरपंच विविध प्रवर्गांतर्गत राखीव करण्यात आले. त्यामध्ये नामाप्र (महिलासाठी) ०८, अनु. जाती साठी (महिला) ०६, सर्वसाधारण (महिला) १२ व अनु. जमाती महिला १ अशी २७ सरपंचाची पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. महिलांचा सामाजिक राजकीय आणि सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने मागील काही वर्षापासून महिलांसाठी विविध योजनांची आखणी शासनाने केली आहे. महिला सक्षमीकरणाचे मुद्दे असो की त्यांचे बचत गट असो. महिलांना पुरुषांच् या बरोबरीने आणण्यासाठी शासन सातत्याने पुढाकार घेत आहे.महिलांनी राजकीय क्षेत्रातील सत्तेची चावी आपल्या हातात घेतली पाहिजे. परंतु महिलांच्या अज्ञानामुळे किंवा जोखीम न स्वीकारण्याच्या संकुचित प्रवृत्तीमुळे अनेक महिला नवऱ्यांच्याच हाती सत्तेची चावी देतात आणि स्वत:ला पूर्ण अधिकार असूनही अगदी कठपुतळीप्रमाणे त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात. नाही तर त्यांना शिविगाळ करून मारहाण केल्याचेही किस्से ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे नवरा म्हणेल तेच महिला सरपंचाला करावे लागत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे प्रकार उजेडात आले. अशा अशिक्षित महिला सरपंचांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे. कारण जिथे आयुष्यभर चुल आणि मुल हे सूत्र स्वीकारून संसार केला त्या बाईला राजकारण काय कळणार? याचा अर्थ असा होतो की ती केवळ नामधारी सरपंच राहते. ग्रामपंचायतचा कारभार करणारे खरे कारभारी हे दुसरेच असतात. म्हणजे इथेही पुरुषप्रधान संस्कृतीच अप्रत्यक्षपणे सत्ता भोगत असते, हे नाकारता येत नाही. त्यामुळे राजकारणात महिलांना संधी देऊनही त्यांचे पतीच कारभार हाकत असतील तर महिलांना स्वातंत्र्य मिळाले काय?