शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

एफडीसीएमकडे जंगल हस्तांतरणाला समितींचा विरोध

By admin | Updated: July 14, 2014 23:47 IST

राखीव वन महाराष्ट्र वन विकास महामंडळाने मागणी केल्याने शासनाने नवीन परिपत्रक काढून नागपूर वनवृत्तांतर्गत लाखांदूर तालुक्यातील १५५६.३२० हेक्टर वन एफडीसीएमला करण्याचा निर्णय

लाखांदूर : राखीव वन महाराष्ट्र वन विकास महामंडळाने मागणी केल्याने शासनाने नवीन परिपत्रक काढून नागपूर वनवृत्तांतर्गत लाखांदूर तालुक्यातील १५५६.३२० हेक्टर वन एफडीसीएमला करण्याचा निर्णय घेतल्याने आदिवासी व वनावर उपजिविका करणाऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. हा अन्यायग्रस्त निर्णय मागे घ्या अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा संयुक्त वन व्यवस्थापन समिती दहेगावचे अध्यक्ष गोसू कुंभरे यांनी दिला आहे.लाखांदूर वनपरिक्षेत्राची फाळणी झाल्यानंतरही तालुक्यात मोठा अन्याय करण्यात आला. केवळ चार राखीव कक्षाचा भंडारा वनविभागातील लाखांदूर वनपरिक्षेत्राला ताबा देण्यात आला होता. त्याशिवाय सदर वनपरिक्षेत्रात राखीव वनाचा संपूर्ण ताबा न देता गोंदिया वनविभागाला वर्ग करण्यात आला होता. यात कक्ष क्रमांक २६६-५०३.४३० हेक्टर, २६७-५०३.३००, २६७-४०३.०७०, २६९-३८८.९००, २७४-४८०.७००, २७५-४५८.१०० असे एकूण २७३७.३०० हेक्टर राखीव वनाचा ताबा गोंदिया वनविभागाला देण्यात आला होता. भंडारा जिल्ह्यात तर वन गोंदिया जिल्ह्यात असल्याने वनालगत गावातील नागरिकांना शासकीय कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत असे, ही मागणी मागील २००७ पासून रेटून धरल्याने न्याय मिळाला नाही उलट १६ जून २०१४ चा महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाचा निर्णय धोक्याचा ठरला.महाराष्ट्र वन विकास महामंडळाने मागणी केलेल्या ६१,८१२ हेक्टर वनापैकी सध्यास्थितीत कोल्हापूर वनवृत्तातील ३,१३२.५५ हेक्टर, नागपूर वनवृत्तातील २०,०२१.०१९ हेक्टर तर गडचिरोली वनवृत्तातील १,१९५.३८० हेक्टर व यवतमाळ वनवृत्तातील ३,२६६.९९० हेक्टर वनक्षेत्र असे एकूण ३८,९७७.९३९ हेक्टर वनक्षेत्र महाराष्ट्र वनविकास महामंडळास हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. लाखांदूर तालुक्यातील कक्ष क्रमांक २७९-६२०.७९० हेक्टर, २७१-४६५.७९०, २७२-४६९.८४० असे एकूण १५५७.३२० हेक्टर हस्तांतरीत केले तालुक्यातील दहेगाव, मानेगाव, मुरमाडी, कोच्छी, दांडेगाव, पुयार, मंडेशर, इंदोरा, कन्हाळगाव, पिंपळगाव, मुर्झा या गावात आदिवासी समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. ही सर्व गावे वनालगत आहेत. त्यांची उपजीविका वनावर असल्याने शासनाचा हा निर्णय त्याचे संसार उध्वस्त करणारा आहे. एफडीसीएमला हस्तांतरीत झाल्यास वृक्ष विडीला प्राधान्य देण्यात येऊन गुरे चारण्याचा व जलावू कालडांचा प्रश्न डोकेवर काढणार, नाईलाजास्तव गुरे विकण्याची पाळी येईल यासाठी शासनाचा तो निर्णय लवकर मागे घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा संयुक्त वनव्यवस्थापन समिती दहेगावचे गोसू कुंभरे, चिचोली विहवान नैताम, दांडेगाव कोच्छी यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)