शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या शेतजमीन मोजणीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 00:34 IST

भावड येथील शेतजमिनीची मोजणी उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय, पवनी येथील भूमापक पी. जी. गोस्वामी यांनी केली.

शेतकऱ्याला न्यायाची अपेक्षा : भूमिअभिलेख कार्यालय पवनी येथे अनेकदा हेलपाटेकोंढा (कोसरा) : भावड येथील शेतजमिनीची मोजणी उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय, पवनी येथील भूमापक पी. जी. गोस्वामी यांनी केली. त्यांनी दुसऱ्या मोजणीत गट क्र. ८८५ मध्ये गट क्र. ८८५ च्या मालकाची जागा दाखविल्याने शेतकऱ्यामध्ये भांडणे लावली. सध्या भूमापक पी. जी. गोस्वामी मृत्यू पावले. त्यामुळे अन्याय झालेल्या महिला शेतकरी राजश्री रामकृष्ण हेमणे यांनी वरिष्ठांना अनेकदा तक्रार करुन देखील न्याय मिळाला नसल्याची तक्रार केली आहे.उपअधिक्षक, भूमिअभिलेख कार्यालय, पवनी हे शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोजमाप, पोटहिस्सा मोजणी तसेच इतर कामे करण्यासाठी शासनाचे कार्यालय आहे. पण येथे कुणाचे नियंत्रण नाही. कर्मचारी केव्हाही येतात जातात असे दृष्य पहावयास मिळते. उपअधिक्षक सय्यद यांचेकडे पवनी व्यतिरिक्त लाखांदूर कार्यालयाचा चार्ज असल्याने ते देखील कार्यालयात अत्यल्प दिसतात. शेतकऱ्यांची तक्रार ऐकूण घेणारे कुणी अधिकारी नाही. सहाय्यक शिंदे यांच्यावर सध्या कार्यालय चालू आहे.भावड येथील शेतकरी राजश्री रामकृष्ण हेमणे यांच्यामार्फत त्यांचे पती रामकृष्ण हेमणे अनेकदा या कार्यालयात आपली कैफीयत मांडण्यासाठी गेले. पण त्यांना खाली हाताने निराश होऊन चार, पाचदा परत यावे लागले आहे. त्यांची शेतजमीन भावड येथे आहे. कोंढा बेलाटी रोडलगत त्यांच्या शेजारी असलेले शेतकरी भास्कर मारोती अनकर यांनी त्यांची जमिन भु.क्र. ८८६ हेक्टर आर. ०.६ ची मोजणी १० डिसेंबर २०१३ ला केली. भूमापक पी. जी. गोस्वामी यांनी मोजणी केली व हद्द कायम केली. परंतु भास्कर मारोती अनकर रा. भावड यांनी पुन्हा मोजणीचे पैसे भरुन १८ जुलै २०१४ ला दुसऱ्यांचा पी. जी. गोस्वामी यांचेकडून मोजणी केली. या मोजणीमध्ये भूमापकांनी भास्कर मारोती अनकर यांची जमिन गट क्र. ८८६ मध्ये दाखवून शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावली आणि राजश्री रामकृष्ण हेमणे यांच्या जमिनीच्या गटात दाखवून हद्द कायम केली. आम्ही त्याचा विरोध केला तरी भुमापकाने कोणाचेही न ऐकता भास्कर अनकर यांना माझ्या जमिनीचा काही भाग ताब्यात घेण्यास सांगितले आणि शेतकऱ्यामध्ये भांडणे लावली.भुमापक पी. जी. गोस्वामी यांनी एकच जमिनीची दोनदा मोजणी करुन वेगवेगळी हद्द कायम केली दुसऱ्या मोजणीच्या वेळी लगतच्या शेतकऱ्याच्या सह्या त्यांनी मोजणी योग्य न वाटल्याने केल्या नाही. तरी हद्द कायम केली. याची तक्रार भूमिअभिलेख भंडारा यांना केली. उपअधिक्षक, भूमिअभिलेख कार्यालय पवनी यांना ६ जानेवारी २०१५ ला पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्यास सांगितले. कार्यालयास वकिलाकडून नोटीस देखील दिले. पण याचा काही उपयोग झाला नसून त्यांना उपअधिक्षक कार्यालयाकडून कार्यवाही सुरु आहे असे मोगम उत्तर कर्मचारी देत आहेत. मालकीच्या गटात जमीन आहे असे दाखवून भास्कर अनकर यांनी जबरदस्तीने शेतजमीनीचा काही भाग कब्जामध्ये घेतला हे कोणत्या न्यायात बसते असा प्रश्न राजश्री हेमने यांचे पती सेवानिवृत्त शिक्षक रामकृष्ण हेमने यांनी केले आहे. सध्या उपअधिक्षक कार्यालयाच्या अनेक हेलपाट्या मारल्या पण कोणीही समाधानकारक उत्तरे दिले नाही.उपअधिक्षक सय्यद हे तर कधीच भेटले नाही. सध्या दोनदा जमिनीची मोजणी भेटले नाही. सध्या दोनदा जमिनीची मोजणी करणारे भुमापक मृत्यू पावले. त्यामुळे या प्रकरणाची दुसऱ्या नि:पक्ष भूमापकाकडे हे प्रकरण देऊन याची योग्य चौकशी करुन मला माझी शेतजमीन परत मिळवून देण्याची मागणी राजश्री हेमणे व त्याचे पती रामकृष्ण हेमणे यांनी केले आहे. यासंबंधात सदर प्रतिनिधीने उपअधीक्षक, सय्यद यांची पवनी येथे जाऊन दोनदा भेट घेण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही. (वार्ताहर)