शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:41 IST

चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या साकोली तालुक्यातील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गत काही वर्षांपासून वाढला आहे. तृणभक्षी प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून हिस्त्र प्राण्यांची शेतकऱ्यात कायम भीती असते. या वन्यप्राण्यांचा वनविभाग बंदोबस्त करीत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:हून बंदोबस्त करावा तर वनविभागाच्या कायद्यात अडकण्याची भीती असते.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : साकोली तालुक्यात चारही बाजूला जंगल

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या साकोली तालुक्यातील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गत काही वर्षांपासून वाढला आहे. तृणभक्षी प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून हिस्त्र प्राण्यांची शेतकऱ्यात कायम भीती असते. या वन्यप्राण्यांचा वनविभाग बंदोबस्त करीत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:हून बंदोबस्त करावा तर वनविभागाच्या कायद्यात अडकण्याची भीती असते.साकोली तालुका सर्वबाजूने घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. बहुतांश शेती जंगलालगत आहे. त्यामुळे या शेतशिवारात जंगली प्राण्यांचा धुमाकूळ सुरू असतो. रानडुक्कर, सांबर, निलगाय, हरीण आदी प्राणी बिनधास्त शेतशिवारात शिरतात. धानाच्या शेतातही मोठे नुकसार करतात. परिसरातील अनेक शेतकºयांनी ऊसाची लागवट केली आहे. या ऊसाच्या फडात रानडुक्करे मुक्तपणे संचार करताना दिसतात. अनेकदा हिंसक झालेले रानडुक्कर शेतकºयांवर हल्लेही करतात. सध्या शेतशिवारात भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात उभे आहे. त्यावर तृणभक्षी प्राणी ताव मारताना दिसून येत आहे. यात शेतकºयांचे मोठे नुकसान होते.नवेगाव बांध आणि नागझिरा अभयारण्याशी साकोली तालुका जोडलेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. तालुक्यातील बाम्पेवाडा, उमरझरी, शिवनटोला, जांभळी, खांबा, पिटेझरी, वडेगाव, तुडमापुरी, पाथरी या गावात तर सर्वाधिक वन्यप्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. जंगलातील जलस्त्रोत कमी झाले की, सहज मिळणाºया पाण्याच्या शोधात प्राण्यांचे कळप शेतात शिरतात. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. परंतु त्यालाही वन्यप्राणी जुमानत नाही. अनेक ठिकाणी शेतकºयांनी तार कुंपणात वीज प्रवाह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही ठिकाणी हा अघोरी प्रयत्न शेतकºयांच्या अंगलट आला. त्यामुळे अनेक शेतकरी आता वनविभागाकडे धाव घेत आहे. परंतु वनविभागाचे कर्मचारी या वन्यप्राण्यांना शेतापासून दूर पिटाळण्यासाठी कधीच प्रयत्न करताना दिसत नाही. त्यांचे लक्ष केवळ शिकारी आणि लाकुडतोड्यांवरच असते. परिणामी शेतकºयाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.जंगलात वाढली शिकारसाकोली तालुक्यातील घनदाट जंगलात विविध तृणभक्षी आणि हिस्त्र प्राणी आहेत. यातील तृणभक्षी प्राण्यांची शिकार करण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहे. काही अट्टल शिकारी आपल्या कुत्र्यांच्या मदतीने प्राण्यांची शिकार करतात. कुत्रा या प्राण्यांचा पाठलाग करतो. त्यानंतर प्राणी दमला की शिकारी त्यावर हल्ला चढवितात. तर काही भागात जंगलातून गेलेल्या ३३ केव्ही वीज तारावंर आकोडे टाकून वन्यप्राण्यांना वीज प्रवाहाने मारतात. या प्राण्यांचे मांस गावांगावात विकले जाते.महामार्गामुळे वाढले अपघातसाकोली तालुक्यातील जंगलातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो. या रस्त्यावर अहोरात्र भरधाव वाहने धावत असतात. अनेकदा भरदाव वाहनाखाली येवून वन्यप्राणी चिरडले जातात. अस्वल, बिबट, निलगाय, रानडुक्कर आदी प्राणी अपघातात मृत्युमुखी पडतात. वनविभाग केवळ पंचनामा करून आपली जबाबदारी झटकते.