शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
3
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
4
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
5
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
8
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
9
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
10
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
11
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
12
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
13
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
14
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
15
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
16
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
17
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
18
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
19
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
20
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!

वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:41 IST

चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या साकोली तालुक्यातील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गत काही वर्षांपासून वाढला आहे. तृणभक्षी प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून हिस्त्र प्राण्यांची शेतकऱ्यात कायम भीती असते. या वन्यप्राण्यांचा वनविभाग बंदोबस्त करीत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:हून बंदोबस्त करावा तर वनविभागाच्या कायद्यात अडकण्याची भीती असते.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : साकोली तालुक्यात चारही बाजूला जंगल

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या साकोली तालुक्यातील शेतांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गत काही वर्षांपासून वाढला आहे. तृणभक्षी प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होत असून हिस्त्र प्राण्यांची शेतकऱ्यात कायम भीती असते. या वन्यप्राण्यांचा वनविभाग बंदोबस्त करीत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:हून बंदोबस्त करावा तर वनविभागाच्या कायद्यात अडकण्याची भीती असते.साकोली तालुका सर्वबाजूने घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. बहुतांश शेती जंगलालगत आहे. त्यामुळे या शेतशिवारात जंगली प्राण्यांचा धुमाकूळ सुरू असतो. रानडुक्कर, सांबर, निलगाय, हरीण आदी प्राणी बिनधास्त शेतशिवारात शिरतात. धानाच्या शेतातही मोठे नुकसार करतात. परिसरातील अनेक शेतकºयांनी ऊसाची लागवट केली आहे. या ऊसाच्या फडात रानडुक्करे मुक्तपणे संचार करताना दिसतात. अनेकदा हिंसक झालेले रानडुक्कर शेतकºयांवर हल्लेही करतात. सध्या शेतशिवारात भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात उभे आहे. त्यावर तृणभक्षी प्राणी ताव मारताना दिसून येत आहे. यात शेतकºयांचे मोठे नुकसान होते.नवेगाव बांध आणि नागझिरा अभयारण्याशी साकोली तालुका जोडलेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. तालुक्यातील बाम्पेवाडा, उमरझरी, शिवनटोला, जांभळी, खांबा, पिटेझरी, वडेगाव, तुडमापुरी, पाथरी या गावात तर सर्वाधिक वन्यप्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. जंगलातील जलस्त्रोत कमी झाले की, सहज मिळणाºया पाण्याच्या शोधात प्राण्यांचे कळप शेतात शिरतात. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. परंतु त्यालाही वन्यप्राणी जुमानत नाही. अनेक ठिकाणी शेतकºयांनी तार कुंपणात वीज प्रवाह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही ठिकाणी हा अघोरी प्रयत्न शेतकºयांच्या अंगलट आला. त्यामुळे अनेक शेतकरी आता वनविभागाकडे धाव घेत आहे. परंतु वनविभागाचे कर्मचारी या वन्यप्राण्यांना शेतापासून दूर पिटाळण्यासाठी कधीच प्रयत्न करताना दिसत नाही. त्यांचे लक्ष केवळ शिकारी आणि लाकुडतोड्यांवरच असते. परिणामी शेतकºयाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.जंगलात वाढली शिकारसाकोली तालुक्यातील घनदाट जंगलात विविध तृणभक्षी आणि हिस्त्र प्राणी आहेत. यातील तृणभक्षी प्राण्यांची शिकार करण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहे. काही अट्टल शिकारी आपल्या कुत्र्यांच्या मदतीने प्राण्यांची शिकार करतात. कुत्रा या प्राण्यांचा पाठलाग करतो. त्यानंतर प्राणी दमला की शिकारी त्यावर हल्ला चढवितात. तर काही भागात जंगलातून गेलेल्या ३३ केव्ही वीज तारावंर आकोडे टाकून वन्यप्राण्यांना वीज प्रवाहाने मारतात. या प्राण्यांचे मांस गावांगावात विकले जाते.महामार्गामुळे वाढले अपघातसाकोली तालुक्यातील जंगलातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जातो. या रस्त्यावर अहोरात्र भरधाव वाहने धावत असतात. अनेकदा भरदाव वाहनाखाली येवून वन्यप्राणी चिरडले जातात. अस्वल, बिबट, निलगाय, रानडुक्कर आदी प्राणी अपघातात मृत्युमुखी पडतात. वनविभाग केवळ पंचनामा करून आपली जबाबदारी झटकते.