शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

शेतकऱ्यांनी पावसाचा प्रत्येक थेंब अडवावा

By admin | Updated: January 29, 2015 23:02 IST

आभाळातून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेवून अडविल्यास जमिनीतील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढुन महाराष्ट्रातील टंचाईसदृश परिस्थितीवर मात करता येईल.

बाळा काशीवार यांचे प्रतिपादन साकोली : आभाळातून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेवून अडविल्यास जमिनीतील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढुन महाराष्ट्रातील टंचाईसदृश परिस्थितीवर मात करता येईल. आतापर्यंत सर्व विभाग जलसंधारणाची कामे विस्कळीत स्वरूपात राबवीत होती. कामामध्ये समन्वय नसल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नव्हता. परंतु महाराष्ट्र शासनाने ५ डिसेंबर २०१४ रोजी टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने जलसंधारणाची कामे हाती घेऊन वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त अडवावे, जेणे करून भूगर्भातील पाणीसाठी वाढवण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी केले. बरडकीन्ही येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेततळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष म्हणून सभापती नारायण वरठे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती श्रावण बोरकर, पंचायत समिती सदस्य मंदा कापगते, सरपंच जितेंद्र झोडे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.के. सांगळे, खंडविकास अधिकारी व्ही.टी. बोरकर, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, कृषी अधिकारी के.एम. बोरकर उपस्थित होते. साकोली तालुक्यातून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१४-१५ या वर्षासाठी दहा गावांची निवड करण्यात आली असून बरडकिन्ही हे यातील एक गाव या सर्व दहाही गावाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम यांनी केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक राधेश्याम खोब्रागडे, जी.बी. साठवणे, अनिल काडगाये, गोपीचंद कानेकर, मंगेश गायकवाड, भोजराज बनकर, रायभान सोनवाने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)