शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावर पेरणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

मोहाडी : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी भाताची नर्सरी २५ जूनपर्यंत गादी वाफ्यावर करावी, असे आवाहन कृषी विभाग मोहाडीतर्फे करण्यात आले ...

मोहाडी : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी भाताची नर्सरी २५ जूनपर्यंत गादी वाफ्यावर करावी, असे आवाहन कृषी विभाग मोहाडीतर्फे करण्यात आले आहे.

मोहाडी येथील शेतकरी राहुल हटवार, सखाराम मारबदे यांच्या शेतावर तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, मंडळ कृषी अधिकारी चंद्रप्रकाश आकरे, पर्यवेक्षक ओमकार भट, सहायक जी. व्ही. रेहपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गादी वाफ्यावर पऱ्याची पेरणी करण्यात आली. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, शेती खर्चात वाढ होत आहे. खर्चात बचत करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी घरातीलच बियाणे बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करावी. तसेच पेरणी ही गादी वाफ्यावर करावी. यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल व कोवळी रोपे सडण्याचे प्रमाण कमी राहील. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी १० टक्के रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी मातीपरीक्षण करून पर्यायी उपाययोजना म्हणून हिरवळीचे खत, अझोला कल्चर, युरिया ब्रिकेट, निंबोळी अर्क यांचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मोफत कृषिक अप डाऊनलोड हवामान अंदाज, कृषी व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ज्ञांचे लेख, कृषी गणकयंत्र व इतर कृषीविषयक उपयुक्त माहिती शेतकऱ्यांनी मिळवावी, असे आवाहन कृषी सहायक जी. व्ही. रेहपाडे यांनी केले आहे.

उत्पन्न खर्च कमी करण्यासाठी कृषी विभाग तत्परतेने शेतकऱ्यांच्या सेवेत मे महिन्यापासून रुजू आहे. कापणी ते बांधणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन शेतकऱ्यांना थेट शेतात जाऊन करीत आहेत. खताच्या मात्रेत दहा टक्के बचत करून जमिनीचा पोत सुधारण्याच्या दिशेने शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. यासाठी कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे.