शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

शेतकरी पाल्यांची शहराकडे धाव

By admin | Updated: July 10, 2014 23:27 IST

भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. आज येथील शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाचे चुकीचे धोरण

निसर्ग कोपला : उदरनिर्वाहासाठी धावपळ, शेती झाली बेभरवशाचीबारव्हा : भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. आज येथील शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाचे चुकीचे धोरण आणि निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा नाहक बळी पडावा लागत आहे. शेतकऱ्यांचे होणारे सततचे हाल यामुळे शेतकरीपुत्रांनी शेतीकठे पाठ फिरविली असून कामाच्या शोधात त्यांनी शहराकडे धाव घेतली असल्याचे चित्र सध्या लाखांदूर तालुक्यात दिसून येत आहे.देशाची अर्थव्यवस्था कृषी उत्पादनावर आधारलेली असल्याचे म्हटले जाते. देशाला कृषीप्रधान देश तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले जाते. आज शेती व शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. शेतकरी कर्जाच्याबोज्यात भरडला जात आहे. यात धान उत्पादक शेतकऱ्यांची अधिकच अधोगती झाल्याचे चित्र दिसत आहे. सततच्या नापिकी व वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे धान उत्पादक शेतकरी आत्महत्येला कवटाळत आहे. याला शासनाचे धोरणच कारणीभूत ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.शासन उद्योगक्षेत्राला अधिक प्राधान्य देत असून शेतकऱ्यांची मात्र घोर उपेक्षा केली जात आहे. बजेटमध्ये केवळ कृषीकरिता चार टक्के निधी निर्धारित केली जाते. ही देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. देशात महागाईने कळस गाठला आहे. शेतीउत्पादीत मालाला भाव नाही. मातीमोल भावाने धान्याची विक्री करावी लागते. वाढती शेतमजुरी, रासायनिक खते, किटकनाशके यांच्या भाव वाढीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. उत्पादन खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. सतत अस्मानी आणि सुलतानी संकटांना सामोरे जात हाडाचे काडी व रक्ताचे पाणी करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेण्याची आशा बाळगून शेती करतो. मात्र शेतकऱ्यांचे दुर्भाग्य म्हणावे की काय नियती त्याचा पाठलाग करणे सोडतच नाही. यावर्षी पावसाने तब्बल एक महिन्यापासून दडी मारून बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हे सगळे करूनही पाऊस आला नाही. तलही गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणेच अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात मोठे कोणतेही उद्योग नाहीत. धान हे प्रमुख पिक असून यावरच शेतकऱ्याची उपजिविका आहे. येथे धानावर आधारित उद्योग निर्मितीची गरज आहे. यासाठी जिल्ह्याचे खासदारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोणतेही उद्योग नसल्याने व शेती परवडण्यासारखी नसल्याने शेतकरीपुत्र रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबईसारख्या शहरात जावून रोजगार करण्यासाठी जात आहेत. (वार्ताहर)