शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शेतकरी पाल्यांची शहराकडे धाव

By admin | Updated: July 10, 2014 23:27 IST

भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. आज येथील शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाचे चुकीचे धोरण

निसर्ग कोपला : उदरनिर्वाहासाठी धावपळ, शेती झाली बेभरवशाचीबारव्हा : भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जाते. आज येथील शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शासनाचे चुकीचे धोरण आणि निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा नाहक बळी पडावा लागत आहे. शेतकऱ्यांचे होणारे सततचे हाल यामुळे शेतकरीपुत्रांनी शेतीकठे पाठ फिरविली असून कामाच्या शोधात त्यांनी शहराकडे धाव घेतली असल्याचे चित्र सध्या लाखांदूर तालुक्यात दिसून येत आहे.देशाची अर्थव्यवस्था कृषी उत्पादनावर आधारलेली असल्याचे म्हटले जाते. देशाला कृषीप्रधान देश तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले जाते. आज शेती व शेतकऱ्यांची अधोगती होत आहे. शेतकरी कर्जाच्याबोज्यात भरडला जात आहे. यात धान उत्पादक शेतकऱ्यांची अधिकच अधोगती झाल्याचे चित्र दिसत आहे. सततच्या नापिकी व वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे धान उत्पादक शेतकरी आत्महत्येला कवटाळत आहे. याला शासनाचे धोरणच कारणीभूत ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.शासन उद्योगक्षेत्राला अधिक प्राधान्य देत असून शेतकऱ्यांची मात्र घोर उपेक्षा केली जात आहे. बजेटमध्ये केवळ कृषीकरिता चार टक्के निधी निर्धारित केली जाते. ही देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. देशात महागाईने कळस गाठला आहे. शेतीउत्पादीत मालाला भाव नाही. मातीमोल भावाने धान्याची विक्री करावी लागते. वाढती शेतमजुरी, रासायनिक खते, किटकनाशके यांच्या भाव वाढीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे. उत्पादन खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. सतत अस्मानी आणि सुलतानी संकटांना सामोरे जात हाडाचे काडी व रक्ताचे पाणी करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेण्याची आशा बाळगून शेती करतो. मात्र शेतकऱ्यांचे दुर्भाग्य म्हणावे की काय नियती त्याचा पाठलाग करणे सोडतच नाही. यावर्षी पावसाने तब्बल एक महिन्यापासून दडी मारून बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हे सगळे करूनही पाऊस आला नाही. तलही गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणेच अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्ह्यात मोठे कोणतेही उद्योग नाहीत. धान हे प्रमुख पिक असून यावरच शेतकऱ्याची उपजिविका आहे. येथे धानावर आधारित उद्योग निर्मितीची गरज आहे. यासाठी जिल्ह्याचे खासदारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोणतेही उद्योग नसल्याने व शेती परवडण्यासारखी नसल्याने शेतकरीपुत्र रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबईसारख्या शहरात जावून रोजगार करण्यासाठी जात आहेत. (वार्ताहर)