शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांचा राडा

By admin | Updated: December 3, 2015 00:47 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सेवा सहकारी संस्थेच्या वतीने हमी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र कोठाराची क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी करण्यात आली.

अखेर धान खरेदी केंद्र बंद : टोकणनुसार खरेदी न करण्याचा ठपकापालांदूर : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सेवा सहकारी संस्थेच्या वतीने हमी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र कोठाराची क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांनी त्यांचे धान्य विक्रीसाठी येथे आणले असताना मोठ्या प्रमाणात अनियमिततेचा फटका त्यांना बसला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत वाद घातला. यानंतर वाद विकोपाला गेल्याने शेतकऱ्यांनीच येथील धानाची खरेदी बंद पाडल्याचा प्रकार बुधवारी घडला. पालांदूर येथे हमी धान केंद्रावर पाच हजार पोते धान उघड्यावर पडले आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर असल्याने त्यांच्या धानाची रोज खरेदी होत असतानाच मोजमापाला मात्र विलंब लागत आहे. धानाचे कोठाराची जागा अपुरी पडल्याने तेथील साठा अस्ताव्यस्त पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्याची मोठी गळचेपी होत आहे. धान खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे मोजमाप करण्यात अपयशी ठरत असल्याने टोकन देऊन नंतर मोजणीला बोलाविण्याचा प्रकार सुरु केला आहे.मात्र धान खरेदी केंद्रावरील ग्रेडर चालबाजी करून वशिलेबाजी किंवा अर्थपूर्ण व्यवहारातून टोकनपूर्वीच काही शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी करीत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला. दरम्यान पुरुषोत्तम भुसारी हे मागील काही दिवसांपासून चकरा मारुनही त्यांच्या धानाची मोजणी होत नव्हती. त्यामुळे ग्रेडरच्या या प्रकारामुळे संतप्त होऊन त्यांनी अन्य शेतकऱ्यांच्या सहकाऱ्याने धान खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. वादाचे पर्यवसान शाब्दीक बाचाबाचीत होऊन संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना तंबी देत धानाची खरेदी प्रक्रिया बंद पाडली. सेवा सहकारी संस्थेच्या कोठाराव्यतिरिक्त भाडे तत्वावर घेण्यात येत असलेले दोन कोठार गावात आहेत. मात्र शासनाच्या नवीन धोरणामुळे त्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने मार्केटिंग फेडरेशनची कसोटी लागत आहे.खरेदी केलेले धान भरडाईकरिता पाठविल्यास अन्य शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यास जागा उपलब्ध होईल. मात्र फेडरेशनकडून ढिसाळघाई होत असल्याने त्याचा फटका परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेतकरी पुरता आर्थिक संकटात भरडल्या जात आहे. (वार्ताहर)