शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांचा राडा

By admin | Updated: December 3, 2015 00:47 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सेवा सहकारी संस्थेच्या वतीने हमी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र कोठाराची क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी करण्यात आली.

अखेर धान खरेदी केंद्र बंद : टोकणनुसार खरेदी न करण्याचा ठपकापालांदूर : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सेवा सहकारी संस्थेच्या वतीने हमी धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र कोठाराची क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणात धान्याची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांनी त्यांचे धान्य विक्रीसाठी येथे आणले असताना मोठ्या प्रमाणात अनियमिततेचा फटका त्यांना बसला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत वाद घातला. यानंतर वाद विकोपाला गेल्याने शेतकऱ्यांनीच येथील धानाची खरेदी बंद पाडल्याचा प्रकार बुधवारी घडला. पालांदूर येथे हमी धान केंद्रावर पाच हजार पोते धान उघड्यावर पडले आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर असल्याने त्यांच्या धानाची रोज खरेदी होत असतानाच मोजमापाला मात्र विलंब लागत आहे. धानाचे कोठाराची जागा अपुरी पडल्याने तेथील साठा अस्ताव्यस्त पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्याची मोठी गळचेपी होत आहे. धान खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे मोजमाप करण्यात अपयशी ठरत असल्याने टोकन देऊन नंतर मोजणीला बोलाविण्याचा प्रकार सुरु केला आहे.मात्र धान खरेदी केंद्रावरील ग्रेडर चालबाजी करून वशिलेबाजी किंवा अर्थपूर्ण व्यवहारातून टोकनपूर्वीच काही शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी करीत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला. दरम्यान पुरुषोत्तम भुसारी हे मागील काही दिवसांपासून चकरा मारुनही त्यांच्या धानाची मोजणी होत नव्हती. त्यामुळे ग्रेडरच्या या प्रकारामुळे संतप्त होऊन त्यांनी अन्य शेतकऱ्यांच्या सहकाऱ्याने धान खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. वादाचे पर्यवसान शाब्दीक बाचाबाचीत होऊन संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना तंबी देत धानाची खरेदी प्रक्रिया बंद पाडली. सेवा सहकारी संस्थेच्या कोठाराव्यतिरिक्त भाडे तत्वावर घेण्यात येत असलेले दोन कोठार गावात आहेत. मात्र शासनाच्या नवीन धोरणामुळे त्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने मार्केटिंग फेडरेशनची कसोटी लागत आहे.खरेदी केलेले धान भरडाईकरिता पाठविल्यास अन्य शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यास जागा उपलब्ध होईल. मात्र फेडरेशनकडून ढिसाळघाई होत असल्याने त्याचा फटका परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेतकरी पुरता आर्थिक संकटात भरडल्या जात आहे. (वार्ताहर)