शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

शेतकऱ्यांनो, हिरवळीचे खतावर गादी वाफ्यांची धान नर्सरी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

२३ लोक ०४ के करडी (पालोरा) : यावर्षी पहिल्यांदा मृग नक्षत्र दमदारपणे बरसला. शेतकऱ्यांनो, निसर्गाच्या शुभसंकेताचा फायदा उचला. ...

२३ लोक ०४ के

करडी (पालोरा) : यावर्षी पहिल्यांदा मृग नक्षत्र दमदारपणे बरसला. शेतकऱ्यांनो, निसर्गाच्या शुभसंकेताचा फायदा उचला. तातडीने बीज प्रक्रिया करून हिरवळीच्या खतावर गादी वाफ्यांची धान नर्सरी लावा. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी व निंबोळी अर्काचा तर रोपे वाढीसाठी युरीया ब्रिकेटचा वापर करा. रोपांची योग्य वाढ व दमदार पाऊस झाल्यानंतर अधिक उत्पादनासाठी ‘श्री’ व पट्टा पद्धतीने भात पिकाची लागवड करा व उन्नती साधा, असे आवाहन मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी केले आहे.

मोहाडी तालुका कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी २०२१ मोहीम अंतर्गत दि. २१ जून ते १ जुलैपर्यंत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दि. २१ जून रोजी मुंढरी खुर्द येथे सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यानिमित्त प्रत्यक्ष शेतावर जाऊन धान नर्सरीची पाहणी करण्यात आली. तसेच कृषी सप्ताहाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, मंडळ कृषी अधिकारी सी.एस. आकरे, सरपंच रेखा नेरकर, कृषी पर्यवेक्षक जे.पी. राऊत, माजी सरपंच रामभाऊ नेरकर, कृषी सखी सुनंदा बांते व गावातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी सी.एस. आकरे यांनी शेतीची योग्य मशागत करून ३ टक्के मिठाच्या द्रावणात धानाची बीज प्रक्रिया करावी आणि पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करण्याचे महत्त्व पटवून सांगितले. करडीचे कृषी पर्यवेक्षक जे.पी. राऊत यांनी १० टक्के रासायनिक खताची बचत करण्यासाठी सेंद्रिय खताचा, हिरवीच्या खताचा तसेच अझोलाचा शेतीत वापर करण्यास सांगितले. माती परीक्षण करून खताच्या मात्रा निश्चित करण्याचे पटवून सांगितले. सरपंच रेखा नेरकर यांनी शेती क्षेत्रात महिलांचा वाटा अनन्यसाधारण असून कृषीच्या प्रगतीसाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कृषी सखी सुनंदा बांते यांनी महिला बचत गटातील सदस्यांना व शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

रासायनिक खतांमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत आहे. जमिनीचा पोत बिघडल्याने उत्पादन कमालीचे घटले आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर टाळावे. दशपर्णी व निंबोळी अर्काची फवारणी करून निसर्गाच्या जैविक साखळीचे संतुलन राखावे, शेतीच्या खर्चात बचत करून उत्पादन व उत्पन्न वाढवावे, जे विकेल तेच पिकवावे, असे कळकळीचे आवाहन माजी सरपंच रामभाऊ नेरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमासाठी करडीचे कृषी सहाय्यक यादोराव बारापात्रे, कान्हळगावचे कृषी सहाय्यक एस.पी. हट्टेकर, मुंढरी बुजचे कृषी सहाय्यक डी. एम. वाडीभस्मे व शेतकरी मित्रांनी, सखींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार कृषी सहाय्यक डी. एम. वाडीभस्मे यांनी मानले.

===Photopath===

230621\img-20210623-wa0055.jpg~230621\1528-img-20210623-wa0054.jpg

===Caption===

शेतकऱ्यांनो, हिरवळीचे खतावर गादी वाफ्यांची धान नर्सरी लावा~शेतकऱ्यांनो, हिरवळीचे खतावर गादी वाफ्यांची धान नर्सरी लावा