शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

शेतकऱ्यांचे संघटन उभारून न्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजवर सरकारने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांना एकत्र आणून संघटन उभारून न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भंडारा ...

ठळक मुद्देपत्रपरिषद : नाना पटोले यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजवर सरकारने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांना एकत्र आणून संघटन उभारून न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान आघाडीच्या अध्यक्षपदावर नाना पटोले यांची निवड केल्यानंतर ते पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते.केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात पटोले म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा सक्तीचा केला. ज्या शेतकºयांची इच्छा नाही अशांना विम्याची रक्कम भरण्यास सांगितली. परंतु, नुकसान भरपाई देताना मात्र सरकार व विमा कंपन्यांनी आपले हात वर केले. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहीले. ही स्थिती संपूर्ण देशातील आहे. कर्जमाफी योजना राबवितानाही सरकारकडून शेतकºयांवर अन्याय करण्यात आला आहे.आता पक्षाने आपल्यावर राष्ट्रीयस्तरावरील जबाबदारी दिली असून ती आपण आनंदाने स्वीकारली आहे. यापुढे देशभरात दौरे करून सर्व शेतकºयांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे संघटन उभारून सरकारविरोधात आंदोलन उभे केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.