शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

शेतकऱ्यांचे संघटन उभारून न्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजवर सरकारने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांना एकत्र आणून संघटन उभारून न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भंडारा ...

ठळक मुद्देपत्रपरिषद : नाना पटोले यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजवर सरकारने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांना एकत्र आणून संघटन उभारून न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान आघाडीच्या अध्यक्षपदावर नाना पटोले यांची निवड केल्यानंतर ते पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते.केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात पटोले म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा सक्तीचा केला. ज्या शेतकºयांची इच्छा नाही अशांना विम्याची रक्कम भरण्यास सांगितली. परंतु, नुकसान भरपाई देताना मात्र सरकार व विमा कंपन्यांनी आपले हात वर केले. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहीले. ही स्थिती संपूर्ण देशातील आहे. कर्जमाफी योजना राबवितानाही सरकारकडून शेतकºयांवर अन्याय करण्यात आला आहे.आता पक्षाने आपल्यावर राष्ट्रीयस्तरावरील जबाबदारी दिली असून ती आपण आनंदाने स्वीकारली आहे. यापुढे देशभरात दौरे करून सर्व शेतकºयांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे संघटन उभारून सरकारविरोधात आंदोलन उभे केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.