शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

शेतकऱ्यांचे संघटन उभारून न्याय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजवर सरकारने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांना एकत्र आणून संघटन उभारून न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भंडारा ...

ठळक मुद्देपत्रपरिषद : नाना पटोले यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजवर सरकारने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांना एकत्र आणून संघटन उभारून न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही काँग्रेस किसान आघाडीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय किसान आघाडीच्या अध्यक्षपदावर नाना पटोले यांची निवड केल्यानंतर ते पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते.केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात पटोले म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा सक्तीचा केला. ज्या शेतकºयांची इच्छा नाही अशांना विम्याची रक्कम भरण्यास सांगितली. परंतु, नुकसान भरपाई देताना मात्र सरकार व विमा कंपन्यांनी आपले हात वर केले. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहीले. ही स्थिती संपूर्ण देशातील आहे. कर्जमाफी योजना राबवितानाही सरकारकडून शेतकºयांवर अन्याय करण्यात आला आहे.आता पक्षाने आपल्यावर राष्ट्रीयस्तरावरील जबाबदारी दिली असून ती आपण आनंदाने स्वीकारली आहे. यापुढे देशभरात दौरे करून सर्व शेतकºयांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे मोठे संघटन उभारून सरकारविरोधात आंदोलन उभे केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.