शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी उत्पादन व पिकांच्या उत्पादकतेतील दरी कमी करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

तालुक्यातील नवेगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बात पड क्षेत्रांमध्ये कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अनिल बुरडे यांच्या शेतावर आयोजित शेती ...

तालुक्यातील नवेगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बात पड क्षेत्रांमध्ये कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अनिल बुरडे यांच्या शेतावर आयोजित शेती दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे मंडळ कृषी अधिकारी दीपक आहेर, कृषी पर्यवेक्षक विजय हुमणे, उपसरपंच विनोद जगनाडे, पोलीस पाटील प्रकाश तितिरमारे, कृषी सहायक आनंद मोहतुरे, गिरिधारी मालेवार, विकास मुळे, केदार उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणानुसार आधुनिक शेतीचा अवलंब करून शेडनेट, पॉलिहाऊसमध्ये भाजीपाला पिके तसेच अन्य पिकांचे उत्पादन घेण्याची गरज असून विविध योजनांची माहिती देत एकात्मिक शेती राबवण्याचे आवाहन केले.

भंडारा मंडळ कृषी अधिकारी दीपक आहेर यांनी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे योजनांचा एकत्रित लाभ मिळणार असल्याचे सांगितले. यासाठी शेतकऱ्यांनी

शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले. कृषी सहायक आनंद मोहतुरे यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध साधन सामुग्री आणि बदलत्या हवामानानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये कसा गरजेचा बनला आहे त्यानुसार वाढलेला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून शेतीला पूरक जोडधंदा सुरू करण्याचे आवाहन केले. शेतकरी दिनासाठी नवेगाव येथील शेतकरी अनिल बुरडे, मुकुंदा मारवाडे, भास्कर बुरडे,सुनील टांगले, मयूर बुरडे, रोशन चव्हाण, नांगो मारवाडे, फुलचंद बुरडे, शांताराम बाभरे, संजय बोंदरे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. संचालन कृषी सहायक आनंद मोहतुरे यांनी केले तर आभार कृषी सहायक केदार यांनी मानले.

बॉक्स

शेडनेट, पॉलिहाऊस उभारण्याची गरज

वर्षानुवर्ष हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहेत. विविध ऋतूंमध्ये अनेकवेळा वेळी-अवेळी पाऊस पडतो. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण निसर्गाला थांबू शकत नाही. मात्र बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी स्वतः मध्ये बदल करीत नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर, कोल्हापूरसारख्या भागात मोठ्या प्रमाणात उभारलेल्या पॅक हाऊस,शेडनेट, पॉलिहाऊसमध्ये फुलवलेल्या शेतीप्रमाणे आपणही पॉलिहाऊस उभारण्याची गरज असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.