शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

शेतकऱ्यांनी उत्पादन व पिकांच्या उत्पादकतेतील दरी कमी करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

तालुक्यातील नवेगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बात पड क्षेत्रांमध्ये कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अनिल बुरडे यांच्या शेतावर आयोजित शेती ...

तालुक्यातील नवेगाव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बात पड क्षेत्रांमध्ये कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अनिल बुरडे यांच्या शेतावर आयोजित शेती दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे मंडळ कृषी अधिकारी दीपक आहेर, कृषी पर्यवेक्षक विजय हुमणे, उपसरपंच विनोद जगनाडे, पोलीस पाटील प्रकाश तितिरमारे, कृषी सहायक आनंद मोहतुरे, गिरिधारी मालेवार, विकास मुळे, केदार उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणानुसार आधुनिक शेतीचा अवलंब करून शेडनेट, पॉलिहाऊसमध्ये भाजीपाला पिके तसेच अन्य पिकांचे उत्पादन घेण्याची गरज असून विविध योजनांची माहिती देत एकात्मिक शेती राबवण्याचे आवाहन केले.

भंडारा मंडळ कृषी अधिकारी दीपक आहेर यांनी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे योजनांचा एकत्रित लाभ मिळणार असल्याचे सांगितले. यासाठी शेतकऱ्यांनी

शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले. कृषी सहायक आनंद मोहतुरे यांनी शेतकऱ्यांना उपलब्ध साधन सामुग्री आणि बदलत्या हवामानानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये कसा गरजेचा बनला आहे त्यानुसार वाढलेला उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून शेतीला पूरक जोडधंदा सुरू करण्याचे आवाहन केले. शेतकरी दिनासाठी नवेगाव येथील शेतकरी अनिल बुरडे, मुकुंदा मारवाडे, भास्कर बुरडे,सुनील टांगले, मयूर बुरडे, रोशन चव्हाण, नांगो मारवाडे, फुलचंद बुरडे, शांताराम बाभरे, संजय बोंदरे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. संचालन कृषी सहायक आनंद मोहतुरे यांनी केले तर आभार कृषी सहायक केदार यांनी मानले.

बॉक्स

शेडनेट, पॉलिहाऊस उभारण्याची गरज

वर्षानुवर्ष हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहेत. विविध ऋतूंमध्ये अनेकवेळा वेळी-अवेळी पाऊस पडतो. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण निसर्गाला थांबू शकत नाही. मात्र बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी स्वतः मध्ये बदल करीत नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर, कोल्हापूरसारख्या भागात मोठ्या प्रमाणात उभारलेल्या पॅक हाऊस,शेडनेट, पॉलिहाऊसमध्ये फुलवलेल्या शेतीप्रमाणे आपणही पॉलिहाऊस उभारण्याची गरज असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.