शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक

By admin | Updated: June 23, 2016 00:23 IST

तालुक्यात शेतकऱ्यांची कृषी केंद्राद्वारे मोठ्या प्रमाणात लुट केली जात असून चिल्लर खतविक्रीत मोठ्या प्रमाणात लुटमार सुरु आहे.

साकोली : तालुक्यात शेतकऱ्यांची कृषी केंद्राद्वारे मोठ्या प्रमाणात लुट केली जात असून चिल्लर खतविक्रीत मोठ्या प्रमाणात लुटमार सुरु आहे. या प्रकरणाची कृषी विभागाने चौकशी करून कृषी केंद्रावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.शेतीचा हंगाम लागताच शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरु केली. ज्यांच्या शेतात पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे भरली. या पऱ्ह्यासाठी लागणारे खत घेण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर भीड दिसत आहे. शासनाच्या दराप्रमाणे कृषीउद्योग हे खत ८५० रुपये प्रती ५० किलो ला तर युरिया प्रती ५० किलो २९८ रुपये एवढे दर आहेत. मात्र या दराप्रमाणे चिल्लर विक्रीही करताना कृषीउद्योग हे खत प्रती किलो १७ रुपये किलो प्रमाणे न करता २० रुपये प्रती किलो विकतात तर युरिया हे खत प्रती ५ रुपये ९६ पैसे प्रती किलो न करता १० रुपये प्रतीलिो करतात. दोन्ही खतावर शासनाच्या ठराविक दरापेक्षा अधिकचे पैसे घेतले जात आहेत. कृषी केंद्र धारकांना खत व बि-बियाणांच्या विक्रीचा परवाना देतेवेळीस त्यांच्यासाठी असलेल्या नियमाचीही माहिती दिली जाते. मात्र कृषी केंद्र संचालकाकडून यानियमांना धाब्यावर बसवून शेतकऱ्यांची लुट करण्यात येते. प्रत्येक कृषी केंद्रांना खत विकताना शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच खतविक्री करायला पाहिजे. जादा दर घेता येत नाही. या प्रकरणाची नक्कीच चौकशी करू. दोषी आढळल्यास कारवाई करू, अशी प्रतिक्रीया पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निमजे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)