शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: August 3, 2015 00:32 IST

पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) परिसरात अनेक खत विक्रेत्यांचे दुकाने आहेत.

नियमांना तिलांजली : शेतकरी सापडला आर्थिक कोंडीतपालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील पालोरा (चौ.) परिसरात अनेक खत विक्रेत्यांचे दुकाने आहेत. सध्याला वरुण राजाच्या कृपेने शेतकरी सुखावला आहे. सर्वत्र धानाचे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना मतासाठी पायपीट करावी लागत आहे. खत विक्रेते ग्राहकांकडून वाजवीपेक्षा जास्त पैसे घेत आहेत. बिल देण्यास टाळाटाळ करीत आहेत. बिलाची मागणी केली असता अरेरावी केली जात आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी कोंढा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळख आहे. या भागात सिंचनाची सोय असल्यामुळे बाराही महिने पिक काढले जाते. मात्र मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांवर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कोंढा कोसरा परिसरातून सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे जवळपास दहा खत विक्रेत्यांचे मोठमोठी दुकाने आहेत. प्रशासनाकडून या दुकानदारांना काही नियमावली दिली आहेत. खताच्या पिशवीवर असलेली किमतीतच खत द्यावे, शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावे, वाजवीपेक्षा जास्त पैसे घेऊ नये असे अनेक नियमांचे आदेश देण्यात आले आहे. मात्र हे खत विक्रेते शासकीय नियम धाब्यावर ठेवून शेतकऱ्यांकडून लुटमार करीत आहेत. एका बॅगवर ३० ते ५० रुपये जास्त प्रमाणात घेतले जात आहेत. शेतकऱ्यांनी या संदर्भात हटकले असता स्टॉक नाही, पुढे जा असे बोलल्या जात आहे. साधी कच्च्या पावतीवर नाव लिहून बिल देत आहेत. त्या बिलावर दुकानाचे नाव, परवाना क्रमांक शेतकऱ्यांची लुटमार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन, तक्रारी दिल्यात. मात्र कोणतेही अधिकारी भिरकावून पाहत नाही. कोंढा कोसरा येथे अनेक खताचे डिलर आहेत. त्याची मोठमोठी खत, औषधांची दुकाने आहेत. हे दुकानदार शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आाहेत. एकीकडे शेतकरी कर्जाच्या डोंगरात सापडला आहे तर दुसरीकडे अधिकारी खत दुकानदार मालामाल होत आहेत. हे बोलके चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. बाहेरून आलेला खताचा स्टॉक दुकानात न उतरवता कुणाच्या घरी बाहेरील गोदामात उतरविला जातो. दुकानात स्टॉक नाही म्हणून लिहिले जाते. कोंढा येथील दुकानदाराचे पालोरा परिसरात मोठमोठे गोदाम आहेत. येथेच स्टॉक ठेवला जात आहे. हे सर्व बोलके चित्र शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसते. मात्र अधिकाऱ्यांना दिसत नाही. (वार्ताहर)आतापर्यंत आमच्याकडे तक्रार घेवून आलेला नाही आहो. शेतकऱ्यांनी खत दुकानदारांना बळी पडू नये, कोणत्याही खत विक्रेत्यांनी वाजवी भावापेक्षा जास्त पैसे मागितले किंवा पक्के बिल दिले गेले नाही तर कृषी विभागात येवून तक्रार करावी.- आदेश गजभियेतालुका कृषी अधिकारी, पवनी.