शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: November 24, 2015 00:38 IST

पवनी व लाखांदूर तालुक्यात वलीत व कोरडवाहू प्रकारची जमीन आहे.

पवनी : पवनी व लाखांदूर तालुक्यात वलीत व कोरडवाहू प्रकारची जमीन आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी निजीविडू सिड्स कंपनीचे १२० दिवसात उत्पन्न देणारे हलके धानाचे बियाणे खरेदी केले. परंतू कंपनीच्या चुकीच्या प्रसारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. कोंढा येथील उत्तम टेंभूर्णे, सुरेश बावनकर, पेंढरी येथील श्रीपत शिवणकर, मोतिलाल हुमणे, अमृत शिवणकर, प्रकाश शिवणकर, भागवत शिवणकर तसेच पालेपेंढरी, कोदूर्ली, सोनेगाव, मासळ बेलाटी, पाचगाव, खैरीपट, खैरी मासळ, सोनी या गावातील ३६ शेतकऱ्यांनी निजीविडू सिड्स कंपनीचे सुमा व श्री वाण १२० दिवसात उत्पन्न देणारे असल्याने लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील लक्ष्मी कृषी केंद्रातून धानाचे बियाणे खरेदी केले. यावेळी त्यांना १२० दिवसात उत्पन्न होणारे धानाचे बियाणे असल्याचे सांगण्यात आले तसेच काहींच्या बिलावर तसा उल्लेख केला. परंतू त्या वाणाचे उत्पादन १२० दिवसाऐवजी १४० ते १५० दिवसात झाले. २० ते ३० दिवस अतिरिक्त लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.याची तक्रार जिल्हा कृषी अधिक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेकडे करण्यात आली. बियाण्याचे बैगवर असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. जिल्हाधिकारी शेतकऱ्यांची समस्या समजून घेवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)बोगस बियाणे तयार करणारी टोळीपवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीचे धानाचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे काही बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी चौरास भागातील काही धान्य व्यापाऱ्यांना खरेदी एजंट बनविले आहे. ते व्यापारी एजंटला क्विंटलमागे १,५०० रूपये ते १,८०० भाव देवून शेतकऱ्यांकडून धान खरेदी करीत आहेत. खरेदी केलेले धान कंपन्यांना २,५०० ते ३,००० रूपये भावाने विक्री करीत आहेत. सदर कंपन्या हे धान त्यांच्या लेबल असलेल्या बँगेत प्रक्रिया न करता भरून ४,५०० ते ५,००० रूपयाप्रमाणे बियाणे म्हणून उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे वरचेवर मोठी रक्कम कमविण्याचे नादात शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिले जात आहे. परिणामी पेरलेल्या बियाण्यापासून फारशे उत्पन्न मिळत नाही. उत्पादन खर्चात मात्र दरवर्षीला वाढ होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. बोगस बियाणे निर्मिती थांबविण्यासाठी कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.