शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: November 24, 2015 00:38 IST

पवनी व लाखांदूर तालुक्यात वलीत व कोरडवाहू प्रकारची जमीन आहे.

पवनी : पवनी व लाखांदूर तालुक्यात वलीत व कोरडवाहू प्रकारची जमीन आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी निजीविडू सिड्स कंपनीचे १२० दिवसात उत्पन्न देणारे हलके धानाचे बियाणे खरेदी केले. परंतू कंपनीच्या चुकीच्या प्रसारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. कोंढा येथील उत्तम टेंभूर्णे, सुरेश बावनकर, पेंढरी येथील श्रीपत शिवणकर, मोतिलाल हुमणे, अमृत शिवणकर, प्रकाश शिवणकर, भागवत शिवणकर तसेच पालेपेंढरी, कोदूर्ली, सोनेगाव, मासळ बेलाटी, पाचगाव, खैरीपट, खैरी मासळ, सोनी या गावातील ३६ शेतकऱ्यांनी निजीविडू सिड्स कंपनीचे सुमा व श्री वाण १२० दिवसात उत्पन्न देणारे असल्याने लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील लक्ष्मी कृषी केंद्रातून धानाचे बियाणे खरेदी केले. यावेळी त्यांना १२० दिवसात उत्पन्न होणारे धानाचे बियाणे असल्याचे सांगण्यात आले तसेच काहींच्या बिलावर तसा उल्लेख केला. परंतू त्या वाणाचे उत्पादन १२० दिवसाऐवजी १४० ते १५० दिवसात झाले. २० ते ३० दिवस अतिरिक्त लागल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.याची तक्रार जिल्हा कृषी अधिक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेकडे करण्यात आली. बियाण्याचे बैगवर असलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. जिल्हाधिकारी शेतकऱ्यांची समस्या समजून घेवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)बोगस बियाणे तयार करणारी टोळीपवनी व लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीचे धानाचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे काही बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी चौरास भागातील काही धान्य व्यापाऱ्यांना खरेदी एजंट बनविले आहे. ते व्यापारी एजंटला क्विंटलमागे १,५०० रूपये ते १,८०० भाव देवून शेतकऱ्यांकडून धान खरेदी करीत आहेत. खरेदी केलेले धान कंपन्यांना २,५०० ते ३,००० रूपये भावाने विक्री करीत आहेत. सदर कंपन्या हे धान त्यांच्या लेबल असलेल्या बँगेत प्रक्रिया न करता भरून ४,५०० ते ५,००० रूपयाप्रमाणे बियाणे म्हणून उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे वरचेवर मोठी रक्कम कमविण्याचे नादात शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिले जात आहे. परिणामी पेरलेल्या बियाण्यापासून फारशे उत्पन्न मिळत नाही. उत्पादन खर्चात मात्र दरवर्षीला वाढ होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. बोगस बियाणे निर्मिती थांबविण्यासाठी कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.