शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

ओसाड शिवारात फुलणार शेती

By admin | Updated: March 23, 2015 00:47 IST

शिवारातील पाणी शिवारातच जिरवून भूगर्भातील पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

प्रशांत देसाई  भंडाराशिवारातील पाणी शिवारातच जिरवून भूगर्भातील पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी मदतीचा हात पुढे केल्यास रूक्ष व ओसाड शिवारात हिरव्या स्वप्नांची बाग रूजवण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे ओसाड शिवार कात टाकणार असून तिथे पुढील काही वर्षात शेती फुलणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घसरत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. परंतू प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या या विधायक कामासाठी शासनासोबत जनसमुदायाच्या मदतीची गरज आहे.यातून पाण्याचे पून:र्भरण होऊन गावातील पाणीप्रश्न भविष्यात सुटण्यास मदत होणार आहे. यासोबतच गाळ उपसल्याने सिंचन क्षमता वाढणार असून मच्छिमारीला फायदा होणार आहे. शिंगाळा व्यावसायीकाला याचा मोठा फायदा होणार आहे. तलावांमधील गाळ उपसल्या जाणार असल्याने पर्यायाने विहिर व बोअरवेलच्या पाण्याची पातळीही वाढणार आहे. शासन सर्वतोपरी सहाय्य करीत असले, तरी लोकसहभाग मिळाल्यास या कामाला गती येऊन भविष्यातील अनेक पिढ्यांना जल सुरक्षा मिळू शकणार आहे. नैसर्गिक पाणीसाठे निर्माण करण्यासाठी ग्राम प्रशासनासह गावकऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग दिल्यास गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. पुढील पाच वर्षे राबवण्यात येणाऱ्या या अभियानात अडचणी निर्माण न करता त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून शिवार गावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे.लाखमोलाचा गाळ होणार उपलब्धया अभियानामुळे लाखमोलाचा वाहून जाणारा गाळ वाचविण्यासाठी मदत होणार आहे. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकून जमिनीचा पोत सुधारता येणार आहे. सिंचनाला मिळणारे पाणी बंधारा, पाझर तलाव, तलाव खोलीकरण आदींच्या माध्यमातून शिवारातील एका पाण्याने वाया जाणारे पीक शेतकऱ्यांना वाचवता येणे शक्य आहे.१० दिवस यंत्रे द्यावीगावपातळीवर उपलब्ध असलेले ट्रॅक्टर, जेसीबी आदी आवश्यक यंत्रसामुग्री गावकऱ्यांनी आपल्याच गावात होत असलेल्या सुधारणांसाठी द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी लागणारा चालक व डिझेलचा खर्च प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक गावागावातील नागरिकांनी या अभियानासाठी पुढाकार घेतल्यास निश्चितच पाण्याअभावी हातचे जाणारे पीक शेतकऱ्यांना वाचवता येतील. तलावांचे होणार पुनरूज्जीवनसुमारे दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या तलावांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यांचा गाळ उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे तलावांच्या क्षमतेत कमालीची घट झाली आहे. यातील गाळ काढण्यात येणार आहे. यामुळे ८६ गावांमधील तलावांचे पुनरूज्जीवन होणार आहे.