शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

ओसाड शिवारात फुलणार शेती

By admin | Updated: March 23, 2015 00:47 IST

शिवारातील पाणी शिवारातच जिरवून भूगर्भातील पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

प्रशांत देसाई  भंडाराशिवारातील पाणी शिवारातच जिरवून भूगर्भातील पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी मदतीचा हात पुढे केल्यास रूक्ष व ओसाड शिवारात हिरव्या स्वप्नांची बाग रूजवण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे ओसाड शिवार कात टाकणार असून तिथे पुढील काही वर्षात शेती फुलणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घसरत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. यावर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. परंतू प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या या विधायक कामासाठी शासनासोबत जनसमुदायाच्या मदतीची गरज आहे.यातून पाण्याचे पून:र्भरण होऊन गावातील पाणीप्रश्न भविष्यात सुटण्यास मदत होणार आहे. यासोबतच गाळ उपसल्याने सिंचन क्षमता वाढणार असून मच्छिमारीला फायदा होणार आहे. शिंगाळा व्यावसायीकाला याचा मोठा फायदा होणार आहे. तलावांमधील गाळ उपसल्या जाणार असल्याने पर्यायाने विहिर व बोअरवेलच्या पाण्याची पातळीही वाढणार आहे. शासन सर्वतोपरी सहाय्य करीत असले, तरी लोकसहभाग मिळाल्यास या कामाला गती येऊन भविष्यातील अनेक पिढ्यांना जल सुरक्षा मिळू शकणार आहे. नैसर्गिक पाणीसाठे निर्माण करण्यासाठी ग्राम प्रशासनासह गावकऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग दिल्यास गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. पुढील पाच वर्षे राबवण्यात येणाऱ्या या अभियानात अडचणी निर्माण न करता त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून शिवार गावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे.लाखमोलाचा गाळ होणार उपलब्धया अभियानामुळे लाखमोलाचा वाहून जाणारा गाळ वाचविण्यासाठी मदत होणार आहे. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकून जमिनीचा पोत सुधारता येणार आहे. सिंचनाला मिळणारे पाणी बंधारा, पाझर तलाव, तलाव खोलीकरण आदींच्या माध्यमातून शिवारातील एका पाण्याने वाया जाणारे पीक शेतकऱ्यांना वाचवता येणे शक्य आहे.१० दिवस यंत्रे द्यावीगावपातळीवर उपलब्ध असलेले ट्रॅक्टर, जेसीबी आदी आवश्यक यंत्रसामुग्री गावकऱ्यांनी आपल्याच गावात होत असलेल्या सुधारणांसाठी द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी लागणारा चालक व डिझेलचा खर्च प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक गावागावातील नागरिकांनी या अभियानासाठी पुढाकार घेतल्यास निश्चितच पाण्याअभावी हातचे जाणारे पीक शेतकऱ्यांना वाचवता येतील. तलावांचे होणार पुनरूज्जीवनसुमारे दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या तलावांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यांचा गाळ उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे तलावांच्या क्षमतेत कमालीची घट झाली आहे. यातील गाळ काढण्यात येणार आहे. यामुळे ८६ गावांमधील तलावांचे पुनरूज्जीवन होणार आहे.