शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

फुलकोबीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:18 IST

भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे.

ठळक मुद्दे१५० ते २०० रूपये पोत्याने विक्री : उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव

मुखरु बागडे।आॅनलाईन लोकमतपालांदूर : भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे. एकाचवेळी फुलकोबीचा हंगाम फुलल्याने कावडीमोल भावाने फुलकोबी विकत आहे. घाऊक भाव दोन रूपये तर चिल्लर भाव चार ते पाच रूपये प्रतिकिलो ने फुलकोबी विकावे लागण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.शेतकरी अफाट आशेपोटी नव नवे पीक घेत नवे काही करण्याचा प्रयत्न करतो. मात्र पळसाला पान तीनच या म्हणीप्रमाणे शेतकऱ्याच्या नशिबी केवळ दारिद्रच अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारात व भंडारा येथील बीटीबी मंडितही फुलकोबीचे भाव घसरले आहे. यामुळे कोबी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी तरळते आहे.महागाईच्या चक्रात सर्वांनीच आपापली स्थाने घट्ट केली खरे पण शेतकरीच असा अपवाद आहे की त्याला महागाईचा फटका बसतो, पण लाभ मिळत नाही. फुलकोबी बियाणा १० ग्रॅमला ४०० रूपये मोजावी लागतात. एक महिना रोपात वाढवावा लागतो. त्यानंतर दोन ते अडीच महिने त्याची लागवड करून पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. एवढा खर्च व मेहनत करून बाजारात मागणी कोबीला भाव नसल्याने व विक्रीला अधिकच त्रास वाढल्याने फुलकोबीची शेती नाकीनऊ आणणारी ठरली आहे.ढगाळ हवामानामुळे कोबी काढणीला नियमितपेक्षा लवकरच येते. अळीचा, मावाचा त्रास वाढतो. शेतात वाया जाण्यापेक्षा बाजारात जे मिळतील ते म्हणत शेतकरी अख्या परिवारासह फुलकोबीच्या मळ्यात खपत आहे.जेवढ्या दिवस ढगाळ हवामान राहील तेवढे नुकसान कोबीला होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात वादळवाऱ्यासह गारपीटचा अनुमान वर्तवल्याने शेतकरी घाबरला आहे. मागील चार वर्षापूर्वी २२ फेब्रुवारीला अशाच गारपिटीचा तडाखा सहन करीत पूर्ण शेतचे शेत पिकाचे नष्ट झाले होते, ती आठवण अजूनही शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.अत्यल्प पाण्याचा विचार करता मी फुलकोबीचे उत्पादन घेतले. धान निघाल्यानंतर फुलकोबीचा हंगाम सजविण्याकरिता हात उसणवारी करून बागायती शेती केली. अख्खे कुटुंब श्रम उपसतो. यंदा धानही न पिकल्याने बागायत तरी आधार मिळेल अशी आशा असताना तिही मातीमोल ठरली आहे.-मोहन लांजेवार, फुलकोबी उत्पादक पालांदूर.धान निघाल्यानंतर एकाचवेळी बागायतीचा हंगाम येतो. याचा परिणाम बाजारपेठेवर पडतो. जे विकते ते पिकवा हे सुत्र स्विकारले तर बागायतीत नवी आशा निश्चित मिळू शकते. या वर्षाला भेंडी, मिरचीला अपेक्षित भाव मिळत आहे. पावसाळ्याची बागायती निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे. शेतकºयांनी गटागटाने पीक निश्चित करून उत्पादन घ्यावे. यामुळे मालाला अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता असते.-बंडू बारापात्रे, थोक भाजी व्यापारी बीटीबी.