शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

फुलकोबीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:18 IST

भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे.

ठळक मुद्दे१५० ते २०० रूपये पोत्याने विक्री : उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव

मुखरु बागडे।आॅनलाईन लोकमतपालांदूर : भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे. एकाचवेळी फुलकोबीचा हंगाम फुलल्याने कावडीमोल भावाने फुलकोबी विकत आहे. घाऊक भाव दोन रूपये तर चिल्लर भाव चार ते पाच रूपये प्रतिकिलो ने फुलकोबी विकावे लागण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.शेतकरी अफाट आशेपोटी नव नवे पीक घेत नवे काही करण्याचा प्रयत्न करतो. मात्र पळसाला पान तीनच या म्हणीप्रमाणे शेतकऱ्याच्या नशिबी केवळ दारिद्रच अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारात व भंडारा येथील बीटीबी मंडितही फुलकोबीचे भाव घसरले आहे. यामुळे कोबी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी तरळते आहे.महागाईच्या चक्रात सर्वांनीच आपापली स्थाने घट्ट केली खरे पण शेतकरीच असा अपवाद आहे की त्याला महागाईचा फटका बसतो, पण लाभ मिळत नाही. फुलकोबी बियाणा १० ग्रॅमला ४०० रूपये मोजावी लागतात. एक महिना रोपात वाढवावा लागतो. त्यानंतर दोन ते अडीच महिने त्याची लागवड करून पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. एवढा खर्च व मेहनत करून बाजारात मागणी कोबीला भाव नसल्याने व विक्रीला अधिकच त्रास वाढल्याने फुलकोबीची शेती नाकीनऊ आणणारी ठरली आहे.ढगाळ हवामानामुळे कोबी काढणीला नियमितपेक्षा लवकरच येते. अळीचा, मावाचा त्रास वाढतो. शेतात वाया जाण्यापेक्षा बाजारात जे मिळतील ते म्हणत शेतकरी अख्या परिवारासह फुलकोबीच्या मळ्यात खपत आहे.जेवढ्या दिवस ढगाळ हवामान राहील तेवढे नुकसान कोबीला होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात वादळवाऱ्यासह गारपीटचा अनुमान वर्तवल्याने शेतकरी घाबरला आहे. मागील चार वर्षापूर्वी २२ फेब्रुवारीला अशाच गारपिटीचा तडाखा सहन करीत पूर्ण शेतचे शेत पिकाचे नष्ट झाले होते, ती आठवण अजूनही शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.अत्यल्प पाण्याचा विचार करता मी फुलकोबीचे उत्पादन घेतले. धान निघाल्यानंतर फुलकोबीचा हंगाम सजविण्याकरिता हात उसणवारी करून बागायती शेती केली. अख्खे कुटुंब श्रम उपसतो. यंदा धानही न पिकल्याने बागायत तरी आधार मिळेल अशी आशा असताना तिही मातीमोल ठरली आहे.-मोहन लांजेवार, फुलकोबी उत्पादक पालांदूर.धान निघाल्यानंतर एकाचवेळी बागायतीचा हंगाम येतो. याचा परिणाम बाजारपेठेवर पडतो. जे विकते ते पिकवा हे सुत्र स्विकारले तर बागायतीत नवी आशा निश्चित मिळू शकते. या वर्षाला भेंडी, मिरचीला अपेक्षित भाव मिळत आहे. पावसाळ्याची बागायती निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे. शेतकºयांनी गटागटाने पीक निश्चित करून उत्पादन घ्यावे. यामुळे मालाला अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता असते.-बंडू बारापात्रे, थोक भाजी व्यापारी बीटीबी.