शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फुलकोबीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:18 IST

भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे.

ठळक मुद्दे१५० ते २०० रूपये पोत्याने विक्री : उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव

मुखरु बागडे।आॅनलाईन लोकमतपालांदूर : भूगर्भाचा विचार करता कमी पाण्यात येणारे पीक म्हणजे फुलकोबी. जिल्ह्यात फुलकोबी काढणीचा हंगाम जोमात असल्याने बाजारात फुलकोबी सर्वच दुकानात दिसत आहे. एकाचवेळी फुलकोबीचा हंगाम फुलल्याने कावडीमोल भावाने फुलकोबी विकत आहे. घाऊक भाव दोन रूपये तर चिल्लर भाव चार ते पाच रूपये प्रतिकिलो ने फुलकोबी विकावे लागण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.शेतकरी अफाट आशेपोटी नव नवे पीक घेत नवे काही करण्याचा प्रयत्न करतो. मात्र पळसाला पान तीनच या म्हणीप्रमाणे शेतकऱ्याच्या नशिबी केवळ दारिद्रच अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारात व भंडारा येथील बीटीबी मंडितही फुलकोबीचे भाव घसरले आहे. यामुळे कोबी उत्पादकांच्या डोळ्यात पाणी तरळते आहे.महागाईच्या चक्रात सर्वांनीच आपापली स्थाने घट्ट केली खरे पण शेतकरीच असा अपवाद आहे की त्याला महागाईचा फटका बसतो, पण लाभ मिळत नाही. फुलकोबी बियाणा १० ग्रॅमला ४०० रूपये मोजावी लागतात. एक महिना रोपात वाढवावा लागतो. त्यानंतर दोन ते अडीच महिने त्याची लागवड करून पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. एवढा खर्च व मेहनत करून बाजारात मागणी कोबीला भाव नसल्याने व विक्रीला अधिकच त्रास वाढल्याने फुलकोबीची शेती नाकीनऊ आणणारी ठरली आहे.ढगाळ हवामानामुळे कोबी काढणीला नियमितपेक्षा लवकरच येते. अळीचा, मावाचा त्रास वाढतो. शेतात वाया जाण्यापेक्षा बाजारात जे मिळतील ते म्हणत शेतकरी अख्या परिवारासह फुलकोबीच्या मळ्यात खपत आहे.जेवढ्या दिवस ढगाळ हवामान राहील तेवढे नुकसान कोबीला होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात वादळवाऱ्यासह गारपीटचा अनुमान वर्तवल्याने शेतकरी घाबरला आहे. मागील चार वर्षापूर्वी २२ फेब्रुवारीला अशाच गारपिटीचा तडाखा सहन करीत पूर्ण शेतचे शेत पिकाचे नष्ट झाले होते, ती आठवण अजूनही शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.अत्यल्प पाण्याचा विचार करता मी फुलकोबीचे उत्पादन घेतले. धान निघाल्यानंतर फुलकोबीचा हंगाम सजविण्याकरिता हात उसणवारी करून बागायती शेती केली. अख्खे कुटुंब श्रम उपसतो. यंदा धानही न पिकल्याने बागायत तरी आधार मिळेल अशी आशा असताना तिही मातीमोल ठरली आहे.-मोहन लांजेवार, फुलकोबी उत्पादक पालांदूर.धान निघाल्यानंतर एकाचवेळी बागायतीचा हंगाम येतो. याचा परिणाम बाजारपेठेवर पडतो. जे विकते ते पिकवा हे सुत्र स्विकारले तर बागायतीत नवी आशा निश्चित मिळू शकते. या वर्षाला भेंडी, मिरचीला अपेक्षित भाव मिळत आहे. पावसाळ्याची बागायती निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे. शेतकºयांनी गटागटाने पीक निश्चित करून उत्पादन घ्यावे. यामुळे मालाला अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता असते.-बंडू बारापात्रे, थोक भाजी व्यापारी बीटीबी.