शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांचे दस्तऐवज असुरक्षित

By admin | Updated: December 1, 2015 05:10 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन योजनेला राज्याच्या महसूल विभागाने हरताळ फासला आहे. खतरा, धोकाच्या श्रेणीत ही

रंजित चिंचखेडे ल्ल चुल्हाड (सिहोरा)केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन योजनेला राज्याच्या महसूल विभागाने हरताळ फासला आहे. खतरा, धोकाच्या श्रेणीत ही शासकीय तलाठी कार्यालय आली आहे. सुरक्षित इमारत नसल्याने सिहोरा परिसरात शेतकऱ्यांचे दस्तऐवज असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव्य निदर्शनास आले आहे.सिहोरा परिसरात स्वतंत्र मंडळ अधिकारी कार्यालय असून सिहोरा, देवसर्रा, बिनाखी, चुल्हाड, टेमनी, रनेरा, वाहनी, हरदोली, सिंदपुरी या गावात तलाठी कार्यालय आहेत. तलाठी कार्यालयाचा प्रशासकीय कारभार जिर्ण इमारत मधून होत आहे. या कार्यालयांचे स्वतंत्र प्रशासकीय इमारती नाही. देवसर्रा येथील तलाठी कार्यालय शासनाच्या बिपीएल यादीत बांधकाम करण्यात आलेल्या घरकुलात आहे. बिनाखी गावात असणारा तलाठी कार्यालय वरखाली होत आहे. सिंदपुरी येथील तलाठी कार्यालय चक्क गुरांच्या गोठ्यात आहे. चुल्हाडच्या तलाठी कार्यालयात सुविधांचा अभाव आहे. रनेरा, हरदोली गावातील तलाठी कार्यालयाची अशीच अवस्था आहे. या तलाठी कार्यालयात बैठकीची व्यवस्था नाही. पिण्याचे पाणी, वीज तथा अन्य सुविधा नाही. साधे शौचालयाचे बांधकाम नाही. शासनाच्या धोरणानुसार धोक्याच्या श्रेणीत ही तलाठी कार्यालय आलेली आहेत. इमारतीवर या आशयाचे स्ट्रीगर लावले जाणार आहेत. महिला तलाठी असणाऱ्या कार्यालयात डोकेदुखी वाढणारी आहे. तलाठी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकाम संदर्भात खुद्द शासन गंभीर होत नाही. या तलाठी व अधिनस्थ कर्मचाऱ्यांना मुख्यालयात सुविधा उपलब्ध केले जात नाही. सध्या तलाठी कार्यालयात कुलूपबंद असल्याचे चित्र आहे. नद्यांचे रेतीघाट लिलाव झाले नसल्याने अवैध रेतीची वाहतूक थांबविण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा नदीकाठावर दिसून येत आहे.घरकुलांचे बांधकाम अडले४शासनाने रेती घाटांचे लिलाव केले नाही. यामुळे रेती प्राप्त होत नाही. तालुक्यात गरीबांना १,२७३ घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या घरकुलांचे बांधकाम रेती अभावी अडली आहे. अवैध रेती उत्खननात वाढीव दंड तथा फौजदारी कारवाईचे निर्देश असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात आलेला आहे. यामुळे सामान्य तथा गरीबांचे रोष निर्माण झाले आहेत. लोकप्रतिनिधींना ग्रामीण भागात जाब विचारण्यात येत आहेत.तलाठी कार्यालयात सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. नियम आणि निर्देशांची अंमलबजावणी सामान्य जनतेच्या दिल्या जाणाऱ्या त्रासातून होत असल्याने शेतसाराच बंद केला पाहिजे.- मोतीलाल ठवकरजिल्हाध्यक्ष, भारतीय किसान संघ,