शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: June 18, 2015 00:35 IST

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची ...

पेरणीला वेग : उच्च प्रतीकडे कलभंडारा : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचा कल उच्च प्रतीच्या बियाण्यांकडे असल्याचे कृषी केंद्रावर होत असलेल्या गर्दीवरुन दिसते.धानाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात मृग नक्षत्राला सुरुवात होताच शेतकरी मशागतीच्या कामाला प्रारंभ करतो. धानाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उच्च प्रतीच्या धानाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येते. उच्च प्रतीच्या बियाणांमध्ये खजाना वाय एस आर, सुपर सोना, केशर, श्री १००८ चा समावेश आहे. त्याची किंमत क्रमश: ५८० रुपये (१० किलो), याचप्रमाणे सुपर सोना ६३० रुपये (१० किलो), केशर ६५० रुपये (१० किलो) आणि श्री १००८ -६३० रुपये (१० किलो) सांगण्यात आली. याचबरोबर अन्य बियाण्यांमध्ये पी के वी (एचएमटी) ७५० रुपये (२५ किलो), सुवर्णा ७३० रुपये (२५ किलो), एम टी यू १०१० -६८० रुपये (२५ किलो), श्रीराम ५०० रुपये (१०किलो), जे जी एम १७९८- ७५० रुपये (२५ किलो), सिडम श्री १०१-४०० रुपये (६ किलो), पद्मा ३६० रुपये (६ किलो), सोना राजा ५८० रुपये (१० किलो), जय श्रीराम ५८० रुपये(१० किलो) आणि अक्षत ६३० रुपये (१० किलो) विक्री करण्यात येत आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्यांच्या खरेदीत घट झाली असल्याचे कृषी केंद्र संचालक सांगतात. भंडारा जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यासह सोयाबीन ५ हजार क्विंटल मागणीपैकी ७०० क्विंटल सोयाबिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तुर ४५० क्विंटल मागणीपैकी ३०५ क्विंटल उपलब्ध करून देण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)१,५८१ कृषी केंद्र शेतकऱ्यांना लागवडीसाठी आवश्यक बियाणे, कीटकनाशक आणि खते उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात एकूण १५८१ कृषी केंद्र कार्यरत आहेत. यात ४४८ बियाणे केंद्र, ४४८ कीटकनाशक केंद्र आणि ६८५ खतांच्या केंद्रांचा समावेश आहे.