शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

शेतकऱ्यांना आता अपघात विम्याचे संरक्षण कवच

By admin | Updated: April 18, 2016 00:32 IST

शेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, ...

कृषी खात्याची योजना : जिल्ह्यात पाच प्रस्ताव दाखलदेवानंद नंदेश्वरभंडाराशेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास आर्थिक लाभ देण्यासाठी कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना २००५-०६ पासून कार्यान्वित केली आहे. सदर योजनेचे नामाभिधान आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच ठरली आहे. या योजनेंतर्गत सद्यस्थितीत पाच प्रस्ताव दाखल झाले आहेत.शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक स्वरुपात दोन लाख रुपये, एक अवयव अपंग झाल्यास एक लाख रुपये, दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये लाभ देण्याची तरतूद या विमा योजनेत आहे. विम्याचा कालावधी १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत ठेवण्यात आला आहे. अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी महसूल कागदपत्रे सात-बारा फेरफार नोंदणीकृत असणे आवश्यक असून वयोमर्यादा १० ते १५ वर्ष ठेवण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर लवकरात-लवकर संबंधित कृषी पर्यवेक्षकांमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणत्याही विधीज्ञ किंवा एजंट नेमण्याची गरज नाही. विमा संरक्षणासाठी रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, वीज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरून पडणे, सर्पदंश, प्राणिदंश, खून, जनावरांचा हल्ला, दंगल अशा प्रकारच्या अपघातांचा समावेश आहे.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी म्हणून त्यांच्या नावाचा समावेश असलेल्या सातबाराचा उतारा, ६ (ड) ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे सातबारावर नाव असणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे ६ (क) शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वारसांची झालेली नोंद वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असणे अनिवार्य आहे. स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र वारसाचे दावा पत्र, शवविच्छेदन अहवाल असल्यास व्हिसेरा रिपोर्ट, अपंगत्व असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र बँकेच्या पासबुकची प्रत असणे आवश्यक आहे. शेतकरी अपघात विमा योजनेचा विमा उतरविण्याची अधिकृत जबाबदारी पुण्याच्या नॅशनल इंन्शोरन्स कंपनीकडे असून विमा सल्लागार कंपनी म्हणून बजाज कॅपिटल इन्शोरन्स ब्रोकिंग लिमिटेड काम पाहत आहे. शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक (कृषी) यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा, यासाठी जनजागृती सुरू आहे. शेतकऱ्यांना या योजनेबाबत आता माहिती झाली आहे. विम्याचा कालावधी १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ असा आहे. आता या योजनेसाठी प्रस्ताव दाखल होऊ शकतात. या योजनेंतर्गत सद्यस्थितीत पाच प्रस्ताव दाखल झाले आहेत. यातील तीन प्रस्ताव विमा कंपनीला पाठविण्यात आले असून दोन प्रस्ताव कागदपत्रांअभावी प्रलंबित आहेत.- डॉ. नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,भंडारा.