शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आता अपघात विम्याचे संरक्षण कवच

By admin | Updated: April 18, 2016 00:32 IST

शेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, ...

कृषी खात्याची योजना : जिल्ह्यात पाच प्रस्ताव दाखलदेवानंद नंदेश्वरभंडाराशेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास आर्थिक लाभ देण्यासाठी कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना २००५-०६ पासून कार्यान्वित केली आहे. सदर योजनेचे नामाभिधान आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच ठरली आहे. या योजनेंतर्गत सद्यस्थितीत पाच प्रस्ताव दाखल झाले आहेत.शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक स्वरुपात दोन लाख रुपये, एक अवयव अपंग झाल्यास एक लाख रुपये, दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये लाभ देण्याची तरतूद या विमा योजनेत आहे. विम्याचा कालावधी १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत ठेवण्यात आला आहे. अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी महसूल कागदपत्रे सात-बारा फेरफार नोंदणीकृत असणे आवश्यक असून वयोमर्यादा १० ते १५ वर्ष ठेवण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर लवकरात-लवकर संबंधित कृषी पर्यवेक्षकांमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणत्याही विधीज्ञ किंवा एजंट नेमण्याची गरज नाही. विमा संरक्षणासाठी रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, वीज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरून पडणे, सर्पदंश, प्राणिदंश, खून, जनावरांचा हल्ला, दंगल अशा प्रकारच्या अपघातांचा समावेश आहे.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी म्हणून त्यांच्या नावाचा समावेश असलेल्या सातबाराचा उतारा, ६ (ड) ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे सातबारावर नाव असणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे ६ (क) शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वारसांची झालेली नोंद वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असणे अनिवार्य आहे. स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र वारसाचे दावा पत्र, शवविच्छेदन अहवाल असल्यास व्हिसेरा रिपोर्ट, अपंगत्व असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र बँकेच्या पासबुकची प्रत असणे आवश्यक आहे. शेतकरी अपघात विमा योजनेचा विमा उतरविण्याची अधिकृत जबाबदारी पुण्याच्या नॅशनल इंन्शोरन्स कंपनीकडे असून विमा सल्लागार कंपनी म्हणून बजाज कॅपिटल इन्शोरन्स ब्रोकिंग लिमिटेड काम पाहत आहे. शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक (कृषी) यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा, यासाठी जनजागृती सुरू आहे. शेतकऱ्यांना या योजनेबाबत आता माहिती झाली आहे. विम्याचा कालावधी १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ असा आहे. आता या योजनेसाठी प्रस्ताव दाखल होऊ शकतात. या योजनेंतर्गत सद्यस्थितीत पाच प्रस्ताव दाखल झाले आहेत. यातील तीन प्रस्ताव विमा कंपनीला पाठविण्यात आले असून दोन प्रस्ताव कागदपत्रांअभावी प्रलंबित आहेत.- डॉ. नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,भंडारा.