शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शेतकरी सुखावला! दहा दिवसांनंतर वरुणराजा प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

भंडारा : तब्बल दहा दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ...

भंडारा : तब्बल दहा दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, धानपिकाला जीवदान मिळाले आहे. आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे.

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी धानाच्या नर्सरीत पेरणी केली होती. पऱ्हे रोवणी योग्य झाले होते; परंतु दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. नर्सरीच्या जमिनीला तडे जात होते. नर्सरीतील कोवळे पऱ्हे पिवळे पडू लागले होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. अशातच बुधवारी सायंकाळपासून पावसाळी वातावरण तयार झाले. रात्री जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून दमदार पावसाला प्रारंभ झाला. भंडारा शहरात पहाटेपासून पाऊस बरसत होता. दुपारी १.३० वाजेपर्यंत पाऊस कोसळला. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला.

तुमसर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी रिमझिम पाऊस बरसला होता. गुरुवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील पवनारा, चिचोली, बघेडा, नाकाडोंगरी परिसरात मुसळधार पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. मोहाडीत विजेच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे धानपऱ्ह्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

ढगाळ वातावरणामुळे मोहाडीत अंधार पसरल्यासारखे दिसत होते. वीज पुरवठाही खंडित झाला होता. उसर्रा येथेही दमदार पावसाने हजेरी लावली. वरठी परिसरात पावसाने हजेरी लावताच विद्युत पुरवठा खंडित झाला. आंधळगाव परिसरात पहाटे ४ वाजतापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळी जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. आर्द्रा नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. जांब, लोहारा परिसरात सकाळपासूनच रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी सुखावले होते.

साकोली तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. लाखनी येथे सकाळी ८ वाजेपासून पाऊस कोसळत होता. राष्ट्रीय महामार्गावर आणि सर्व सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. साकोली तालुक्यातील एकोडी परिसरात दमदार पावसाने रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरात सकाळी ७ वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. वीज पुरवठा खंडित झाला होता. ठाणा जवाहरनगर मार्गावर शुकशुकाट दिसत होता. पहेला परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांवरील संकट टळले. पवनी तालुक्यातही सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. दमदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आसगाव (चौ.) परिसरात धानाच्या बांध्या पावसाने पूर्णत: भरल्या होत्या. पवनी-आसगाव मार्गावरील माती वाहून गेल्याने दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागला. अड्याळ येथे सकाळी ७ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे आता पऱ्ह्यांना जीवदान मिळाले. शहापूर परिसरात पिवळे पडत असलेल्या पऱ्ह्यांना जीवदान मिळाले. करडी परिसरात पहाटे २.३० वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. पाऊस बरसताच शेतकऱ्यांनी सकाळपासूनच रोवणीला सुरुवात केली.

बाॅक्स

लाखांदूरमध्ये अनेक घरांत शिरले पाणी

लाखांदूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. या पावसाने अनेकांच्या घरांत पाणी शिरले. सखल भागातील घरांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तालुक्यात आतापर्यंत ३ हजार २८१ हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कडधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिकांचा समावेश आहे.

बाॅक्स

पारडी येथे वीज कोसळून दोन म्हशी ठार

मोहाडी तालुक्यातील पारडी येथे गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वीज कोसळून दोन म्हशी ठार झाल्या. मोहाडी तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळला. शेतात चरत असलेल्या दोन म्हशींवर अचानक वीज कोसळल्याने दोन्ही म्हशी जागीच ठार झाल्या. शेतकऱ्याचे यामुळे मोठे नुकसान झाले.

बाॅक्स

जिल्ह्यात आतापर्यंत ३१९ मिमी पाऊस

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३१९.६ मिमी पावसाची नोंद झाली, तर गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत १५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दहा दिवसांपासून पावसाने खंड दिला असला तरी जिल्ह्यात १ जून ते ८ जुलै यादरम्यान कोसळणाऱ्या पावसाच्या सरासरी १०३ टक्के पाऊस झाला आहे. गत २४ तासांत भंडारा ४.९ मिमी, मोहाडी ४९.४ मिमी, तुमसर १३.२ मिमी, पवनी १.६ मिमी, साकोली २७.६ मिमी, लाखांदूर ७.१ मिमी आणि लाखनी तालुक्यात २.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बाॅक्स

रोवणीच्या कामाला वेग

जिल्ह्यात दहा दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने रोवणीचे काम खोळंबले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून बरसलेल्या दमदार पावसाने आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. जिल्ह्यात २ लाख ५ हजार ८३२ हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात धानाचे क्षेत्र १ लाख ८३ हजार २५ हेक्टर आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने केवळ २ हजार हेक्टरवरच रोवणी झाली होती. आता पाऊस कोसळल्याने या रोवणीला वेग येणार आहे.

बाॅक्स

बांध्या भरल्या तुडुंब

बुधवारपर्यंत पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुरुवारी वरुणराजाने मोठा दिलासा दिला. सुकलेल्या बांध्या पावसाने तुडुंब भरल्या. जिल्ह्यात शेतशिवारातील बांध्या पाण्याने तुडुंब भरल्याचे चित्र सर्वत्र होते. अनेक शेतकऱ्यांनी बांध्या फोडून अतिरिक्त पाणी बाहेर काढले. या दमदार पावसाने अनेक ठिकाणच्या नर्सरीतील पऱ्ह्यांनाही फटका बसला.