शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
5
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
6
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

भंडारा : पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढत चाललेले अनुकरण व आधुनिकीकरणामुळे अनेक मुली स्वतःच्या लग्नाचा निर्णय आता स्वतः घेऊ लागल्या ...

भंडारा : पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढत चाललेले अनुकरण व आधुनिकीकरणामुळे अनेक मुली स्वतःच्या लग्नाचा निर्णय आता स्वतः घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा आहे हे आजच्या मुलीच आपल्या वडिलांना सांगत आहेत. त्यामुळे होणारा पती हा डॉक्टर, इंजिनिअर, एखादा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा मोठा कंत्राटदार असावा, अशीच अनेक मुलींची अपेक्षा दिसून येते. त्यामुळे शेतकरी मुलांना मुलींचा बापच नव्हे, तर मुलीही नकार देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक समाजात आजही डॉक्टर मुलांनाच सर्वांत जास्त पसंती आहे. मात्र, असे असले तरी डॉक्टर मुलांचे प्रमाणही आज कमी आहे. बारावीनंतर एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागाही कमी असल्याने तेथेही अतोनात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे अनेक सधन घरातील मुलांची इच्छा असूनही अनेकांना मेडिकलला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे अनेक श्रीमंत मध्यमवर्गीय घरातील मुलींना डॉक्टर नवरा पाहिजे असला तरी प्रत्येकाचीच अपेक्षा पूर्ण होत नाही. जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय असला तरी आजही शेतकरी माणूस असतानाही स्वतःची मुलगी मात्र एखाद्या खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर असणाऱ्या मुलाला देण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र, शेतकरी नवरा नको गं बाई म्हणत नवरी मुलीचे वडीलही विचार करीत आहेत.

बॉक्स

माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही

शेतकरी नवरा असलाच तर माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही, असे मुलीचे वडील आधी ठरवून घेतात. मुलाची चांगली बागायती शेती, शेतीसोबत जोडधंदा, चांगले घर असेल तरच शेतकरी मुलांकडे पाहिले जाते. यासोबतच घरात कुटुंबात कोणकोण आहे, तसेच मुलगा निर्व्यसनी आहे का, घरातील लोक शिकले आहेत का, सोबतच मुलाचे शिक्षण, नोकरी या गोष्टीही पाहिल्या जातात. नोकरी असली तरीही शेती आहे का, हा अट्टहास मात्र अनेकांकडून धरला जातो.

बॉक्स

सर्वाधिक मागणी शासकीय नोकरीवरील मुलांनाच

१ मुलगा शासकीय नोकरीला आहे का, स्वतःचे घर आहे का, ग्रामीण भागातील मुलगी देताना मुलाला खाजगी का असेना, पण नोकरी आहे का, त्याचे फक्त शिक्षण कामाचे नाही तर तो किती कमावतो, स्वतःच्या घरालाही मुलीचे वडील प्राधान्य देत आहेत.

२ लग्नानंतर तो नागपूर, पुणे, मुंबई अशा शहरात नोकरी करताना स्वतंत्र राहणार का, आई-वडील नको, भविष्याच्या दृष्टीने मुलीच्या नावावर घर, शेती करणार का अशीही चौकशी अनेक जण करीत असल्याची माहिती वधू-वर सूचक केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

३ मुलीच्या शिक्षणाप्रमाणे पालकांची अपेक्षा वाढतच आहे. मात्र, काळानुसार बदल करण्याची गरज आता पालकांसमोर निर्माण झाली आहे. कमीत कमी अपेक्षा दोन्ही बाजूकडील वऱ्हाडी मंडळींनी ठेवल्यास मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढणार नाही.

कोट

मुलगा सरकारी किंवा खाजगी कंपनीत नोकरदार किंवा शेतकरी असला तरी चालेल. मात्र, मुलावर असणारे संस्कार, त्याची पार्श्वभूमी पाहूनच मुलांच्या लग्नाचा पालकांनी विचार करावा. आजच्या काळात प्रत्येकानेच सरकारी नोकरदाराची अपेक्षा करणे ही चुकीची गोष्ट आहे. मी तरी या मताविरोधात आहे.

तानाजी गायधने, महाराज, चिखली

कोट

माझा मुलगा व मुलगी दोघेही एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. मुलांच्या शिक्षणाप्रमाणेच त्यांच्या जोडीदाराचेही उच्च शिक्षण पाहूनच मुलांच्या लग्नाचा विचार करणार आहोत. मात्र, भौतिक सुखसुविधांपेक्षा मुलगा, त्याचे कुटुंब, सुसंस्कृतपणा पाहूनच योग्य निर्णय घेईन.

चुडामान हटवार, सहा. शिक्षक, मोहाडी.