शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

भंडारा : पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढत चाललेले अनुकरण व आधुनिकीकरणामुळे अनेक मुली स्वतःच्या लग्नाचा निर्णय आता स्वतः घेऊ लागल्या ...

भंडारा : पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढत चाललेले अनुकरण व आधुनिकीकरणामुळे अनेक मुली स्वतःच्या लग्नाचा निर्णय आता स्वतः घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा आहे हे आजच्या मुलीच आपल्या वडिलांना सांगत आहेत. त्यामुळे होणारा पती हा डॉक्टर, इंजिनिअर, एखादा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा मोठा कंत्राटदार असावा, अशीच अनेक मुलींची अपेक्षा दिसून येते. त्यामुळे शेतकरी मुलांना मुलींचा बापच नव्हे, तर मुलीही नकार देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक समाजात आजही डॉक्टर मुलांनाच सर्वांत जास्त पसंती आहे. मात्र, असे असले तरी डॉक्टर मुलांचे प्रमाणही आज कमी आहे. बारावीनंतर एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागाही कमी असल्याने तेथेही अतोनात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे अनेक सधन घरातील मुलांची इच्छा असूनही अनेकांना मेडिकलला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे अनेक श्रीमंत मध्यमवर्गीय घरातील मुलींना डॉक्टर नवरा पाहिजे असला तरी प्रत्येकाचीच अपेक्षा पूर्ण होत नाही. जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय असला तरी आजही शेतकरी माणूस असतानाही स्वतःची मुलगी मात्र एखाद्या खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर असणाऱ्या मुलाला देण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र, शेतकरी नवरा नको गं बाई म्हणत नवरी मुलीचे वडीलही विचार करीत आहेत.

बॉक्स

माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही

शेतकरी नवरा असलाच तर माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही, असे मुलीचे वडील आधी ठरवून घेतात. मुलाची चांगली बागायती शेती, शेतीसोबत जोडधंदा, चांगले घर असेल तरच शेतकरी मुलांकडे पाहिले जाते. यासोबतच घरात कुटुंबात कोणकोण आहे, तसेच मुलगा निर्व्यसनी आहे का, घरातील लोक शिकले आहेत का, सोबतच मुलाचे शिक्षण, नोकरी या गोष्टीही पाहिल्या जातात. नोकरी असली तरीही शेती आहे का, हा अट्टहास मात्र अनेकांकडून धरला जातो.

बॉक्स

सर्वाधिक मागणी शासकीय नोकरीवरील मुलांनाच

१ मुलगा शासकीय नोकरीला आहे का, स्वतःचे घर आहे का, ग्रामीण भागातील मुलगी देताना मुलाला खाजगी का असेना, पण नोकरी आहे का, त्याचे फक्त शिक्षण कामाचे नाही तर तो किती कमावतो, स्वतःच्या घरालाही मुलीचे वडील प्राधान्य देत आहेत.

२ लग्नानंतर तो नागपूर, पुणे, मुंबई अशा शहरात नोकरी करताना स्वतंत्र राहणार का, आई-वडील नको, भविष्याच्या दृष्टीने मुलीच्या नावावर घर, शेती करणार का अशीही चौकशी अनेक जण करीत असल्याची माहिती वधू-वर सूचक केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

३ मुलीच्या शिक्षणाप्रमाणे पालकांची अपेक्षा वाढतच आहे. मात्र, काळानुसार बदल करण्याची गरज आता पालकांसमोर निर्माण झाली आहे. कमीत कमी अपेक्षा दोन्ही बाजूकडील वऱ्हाडी मंडळींनी ठेवल्यास मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढणार नाही.

कोट

मुलगा सरकारी किंवा खाजगी कंपनीत नोकरदार किंवा शेतकरी असला तरी चालेल. मात्र, मुलावर असणारे संस्कार, त्याची पार्श्वभूमी पाहूनच मुलांच्या लग्नाचा पालकांनी विचार करावा. आजच्या काळात प्रत्येकानेच सरकारी नोकरदाराची अपेक्षा करणे ही चुकीची गोष्ट आहे. मी तरी या मताविरोधात आहे.

तानाजी गायधने, महाराज, चिखली

कोट

माझा मुलगा व मुलगी दोघेही एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. मुलांच्या शिक्षणाप्रमाणेच त्यांच्या जोडीदाराचेही उच्च शिक्षण पाहूनच मुलांच्या लग्नाचा विचार करणार आहोत. मात्र, भौतिक सुखसुविधांपेक्षा मुलगा, त्याचे कुटुंब, सुसंस्कृतपणा पाहूनच योग्य निर्णय घेईन.

चुडामान हटवार, सहा. शिक्षक, मोहाडी.