शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

भंडारा : पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढत चाललेले अनुकरण व आधुनिकीकरणामुळे अनेक मुली स्वतःच्या लग्नाचा निर्णय आता स्वतः घेऊ लागल्या ...

भंडारा : पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढत चाललेले अनुकरण व आधुनिकीकरणामुळे अनेक मुली स्वतःच्या लग्नाचा निर्णय आता स्वतः घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा आहे हे आजच्या मुलीच आपल्या वडिलांना सांगत आहेत. त्यामुळे होणारा पती हा डॉक्टर, इंजिनिअर, एखादा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा मोठा कंत्राटदार असावा, अशीच अनेक मुलींची अपेक्षा दिसून येते. त्यामुळे शेतकरी मुलांना मुलींचा बापच नव्हे, तर मुलीही नकार देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक समाजात आजही डॉक्टर मुलांनाच सर्वांत जास्त पसंती आहे. मात्र, असे असले तरी डॉक्टर मुलांचे प्रमाणही आज कमी आहे. बारावीनंतर एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागाही कमी असल्याने तेथेही अतोनात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे अनेक सधन घरातील मुलांची इच्छा असूनही अनेकांना मेडिकलला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे अनेक श्रीमंत मध्यमवर्गीय घरातील मुलींना डॉक्टर नवरा पाहिजे असला तरी प्रत्येकाचीच अपेक्षा पूर्ण होत नाही. जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय असला तरी आजही शेतकरी माणूस असतानाही स्वतःची मुलगी मात्र एखाद्या खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर असणाऱ्या मुलाला देण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र, शेतकरी नवरा नको गं बाई म्हणत नवरी मुलीचे वडीलही विचार करीत आहेत.

बॉक्स

माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही

शेतकरी नवरा असलाच तर माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही, असे मुलीचे वडील आधी ठरवून घेतात. मुलाची चांगली बागायती शेती, शेतीसोबत जोडधंदा, चांगले घर असेल तरच शेतकरी मुलांकडे पाहिले जाते. यासोबतच घरात कुटुंबात कोणकोण आहे, तसेच मुलगा निर्व्यसनी आहे का, घरातील लोक शिकले आहेत का, सोबतच मुलाचे शिक्षण, नोकरी या गोष्टीही पाहिल्या जातात. नोकरी असली तरीही शेती आहे का, हा अट्टहास मात्र अनेकांकडून धरला जातो.

बॉक्स

सर्वाधिक मागणी शासकीय नोकरीवरील मुलांनाच

१ मुलगा शासकीय नोकरीला आहे का, स्वतःचे घर आहे का, ग्रामीण भागातील मुलगी देताना मुलाला खाजगी का असेना, पण नोकरी आहे का, त्याचे फक्त शिक्षण कामाचे नाही तर तो किती कमावतो, स्वतःच्या घरालाही मुलीचे वडील प्राधान्य देत आहेत.

२ लग्नानंतर तो नागपूर, पुणे, मुंबई अशा शहरात नोकरी करताना स्वतंत्र राहणार का, आई-वडील नको, भविष्याच्या दृष्टीने मुलीच्या नावावर घर, शेती करणार का अशीही चौकशी अनेक जण करीत असल्याची माहिती वधू-वर सूचक केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

३ मुलीच्या शिक्षणाप्रमाणे पालकांची अपेक्षा वाढतच आहे. मात्र, काळानुसार बदल करण्याची गरज आता पालकांसमोर निर्माण झाली आहे. कमीत कमी अपेक्षा दोन्ही बाजूकडील वऱ्हाडी मंडळींनी ठेवल्यास मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढणार नाही.

कोट

मुलगा सरकारी किंवा खाजगी कंपनीत नोकरदार किंवा शेतकरी असला तरी चालेल. मात्र, मुलावर असणारे संस्कार, त्याची पार्श्वभूमी पाहूनच मुलांच्या लग्नाचा पालकांनी विचार करावा. आजच्या काळात प्रत्येकानेच सरकारी नोकरदाराची अपेक्षा करणे ही चुकीची गोष्ट आहे. मी तरी या मताविरोधात आहे.

तानाजी गायधने, महाराज, चिखली

कोट

माझा मुलगा व मुलगी दोघेही एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. मुलांच्या शिक्षणाप्रमाणेच त्यांच्या जोडीदाराचेही उच्च शिक्षण पाहूनच मुलांच्या लग्नाचा विचार करणार आहोत. मात्र, भौतिक सुखसुविधांपेक्षा मुलगा, त्याचे कुटुंब, सुसंस्कृतपणा पाहूनच योग्य निर्णय घेईन.

चुडामान हटवार, सहा. शिक्षक, मोहाडी.