शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नवरा नको गं बाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

भंडारा : पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढत चाललेले अनुकरण व आधुनिकीकरणामुळे अनेक मुली स्वतःच्या लग्नाचा निर्णय आता स्वतः घेऊ लागल्या ...

भंडारा : पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढत चाललेले अनुकरण व आधुनिकीकरणामुळे अनेक मुली स्वतःच्या लग्नाचा निर्णय आता स्वतः घेऊ लागल्या आहेत. त्यामुळे माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा आहे हे आजच्या मुलीच आपल्या वडिलांना सांगत आहेत. त्यामुळे होणारा पती हा डॉक्टर, इंजिनिअर, एखादा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा मोठा कंत्राटदार असावा, अशीच अनेक मुलींची अपेक्षा दिसून येते. त्यामुळे शेतकरी मुलांना मुलींचा बापच नव्हे, तर मुलीही नकार देत असल्याचे दिसून येत आहे. अनेक समाजात आजही डॉक्टर मुलांनाच सर्वांत जास्त पसंती आहे. मात्र, असे असले तरी डॉक्टर मुलांचे प्रमाणही आज कमी आहे. बारावीनंतर एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागाही कमी असल्याने तेथेही अतोनात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे अनेक सधन घरातील मुलांची इच्छा असूनही अनेकांना मेडिकलला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अनेकांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे अनेक श्रीमंत मध्यमवर्गीय घरातील मुलींना डॉक्टर नवरा पाहिजे असला तरी प्रत्येकाचीच अपेक्षा पूर्ण होत नाही. जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय असला तरी आजही शेतकरी माणूस असतानाही स्वतःची मुलगी मात्र एखाद्या खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर असणाऱ्या मुलाला देण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र, शेतकरी नवरा नको गं बाई म्हणत नवरी मुलीचे वडीलही विचार करीत आहेत.

बॉक्स

माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही

शेतकरी नवरा असलाच तर माझी मुलगी लग्नानंतर बांधावर जाणार नाही, असे मुलीचे वडील आधी ठरवून घेतात. मुलाची चांगली बागायती शेती, शेतीसोबत जोडधंदा, चांगले घर असेल तरच शेतकरी मुलांकडे पाहिले जाते. यासोबतच घरात कुटुंबात कोणकोण आहे, तसेच मुलगा निर्व्यसनी आहे का, घरातील लोक शिकले आहेत का, सोबतच मुलाचे शिक्षण, नोकरी या गोष्टीही पाहिल्या जातात. नोकरी असली तरीही शेती आहे का, हा अट्टहास मात्र अनेकांकडून धरला जातो.

बॉक्स

सर्वाधिक मागणी शासकीय नोकरीवरील मुलांनाच

१ मुलगा शासकीय नोकरीला आहे का, स्वतःचे घर आहे का, ग्रामीण भागातील मुलगी देताना मुलाला खाजगी का असेना, पण नोकरी आहे का, त्याचे फक्त शिक्षण कामाचे नाही तर तो किती कमावतो, स्वतःच्या घरालाही मुलीचे वडील प्राधान्य देत आहेत.

२ लग्नानंतर तो नागपूर, पुणे, मुंबई अशा शहरात नोकरी करताना स्वतंत्र राहणार का, आई-वडील नको, भविष्याच्या दृष्टीने मुलीच्या नावावर घर, शेती करणार का अशीही चौकशी अनेक जण करीत असल्याची माहिती वधू-वर सूचक केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

३ मुलीच्या शिक्षणाप्रमाणे पालकांची अपेक्षा वाढतच आहे. मात्र, काळानुसार बदल करण्याची गरज आता पालकांसमोर निर्माण झाली आहे. कमीत कमी अपेक्षा दोन्ही बाजूकडील वऱ्हाडी मंडळींनी ठेवल्यास मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढणार नाही.

कोट

मुलगा सरकारी किंवा खाजगी कंपनीत नोकरदार किंवा शेतकरी असला तरी चालेल. मात्र, मुलावर असणारे संस्कार, त्याची पार्श्वभूमी पाहूनच मुलांच्या लग्नाचा पालकांनी विचार करावा. आजच्या काळात प्रत्येकानेच सरकारी नोकरदाराची अपेक्षा करणे ही चुकीची गोष्ट आहे. मी तरी या मताविरोधात आहे.

तानाजी गायधने, महाराज, चिखली

कोट

माझा मुलगा व मुलगी दोघेही एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. मुलांच्या शिक्षणाप्रमाणेच त्यांच्या जोडीदाराचेही उच्च शिक्षण पाहूनच मुलांच्या लग्नाचा विचार करणार आहोत. मात्र, भौतिक सुखसुविधांपेक्षा मुलगा, त्याचे कुटुंब, सुसंस्कृतपणा पाहूनच योग्य निर्णय घेईन.

चुडामान हटवार, सहा. शिक्षक, मोहाडी.