शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

शेतकऱ्याने २० गुंठ्यात पिकविला ७५ क्विंटल कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST

मुरलीधर वंजारी हे मागील २० वर्षांपासून कांदा पिकाची लागवड करीत आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने लागवड करीत असल्याने व ...

मुरलीधर वंजारी हे मागील २० वर्षांपासून कांदा पिकाची लागवड करीत आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने लागवड करीत असल्याने व वाणाची योग्य निवड केली नसल्याने त्यांना आतापर्यंत कांद्याचे फारसे उत्पादन हाती येत नव्हते. अशातच भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड व तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने यांची भेट झाली. वंजारी यांना भीमाशंकर शुभ्र या वाणाची माहिती झाली. मात्र हे बियाणे बाजारात उपलब्ध होत नव्हते यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा यांनी पुणे येथील कांदा व लसूण अनुसंधान, केंद्राशी संपर्क साधून जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांना कांदा बियाणे मिळवून दिले. भीमाशंकर शुभ्र हा कांद्याने वान जिल्ह्यातील हवामानाशी सुसंगत तसेच कांदा हा टिकाऊ, चमकदार व कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारा असून, तिन्ही ऋतूमध्ये रोगाला बळी न पडणारा असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना हे बियाणे मिळवून दिले. त्यानुसार वंजारी यांनी कांदा पिकाची लागवड अर्ध्या एकरात केली. त्यांना आतापर्यंत अर्ध्या एकर कांदा लागवडीसाठी तीन हजार, निंदन खर्च ५००, खत २५००, कीटकनाशक फवारणी ३०००, पिकाची काढणी दोन हजार व इतर एक हजार असा एकूण ११,००० रुपये खर्च आला. त्यांना एकूण ७५ क्विंटल कांद्याला ९५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. त्यांना एकूण ७१ हजार दोनशे पन्नास रुपयांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये त्यांना साठ हजार दोनशेपन्नास रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यामुळे पारंपरिक धान पट्ट्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पीक पद्धतीत बदल केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते हे पवनी आणि भंडारा तालुक्यातील चिखली येथील तानाजी गायधने या शेतकऱ्यांनी उत्पन्नातून सिद्ध करून दाखवले आहे.

कोट

भीमाशंकर हा कांदा चांगला आहे. केवळ कृषी विभागामुळेच मला हे बियाणे पुणे येथून उपलब्ध होऊ शकले. पारंपरिक पद्धतीने लागवड करीत होतो. मात्र एवढे उत्पन्न कधीच मिळाले नाही. अर्ध्या एकरात मला खर्चवजा जाता ६० हजार रुपयांचा कांदा पिकातून निव्वळ नफा झाला आहे. शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करावा.

मुरलीधर वंजारी, शेतकरी जुनाेना.

कोट

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांदा व लसूण अनुसंधान केंद्र पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांना कांदा बियाणे उपलब्ध करून दिले. अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा लागवड केल्यास शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी कृषी विभागाच्या कांदा चाळ योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. पीक पद्धतीत बदल ही काळाची गरज बनली आहे.

शांतिलाल गायधने, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा