शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉचिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
5
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
7
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
8
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
9
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
10
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
11
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
12
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
13
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
14
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
15
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
16
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
17
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
19
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
20
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा

निधीअभावी रखडले

By admin | Updated: April 6, 2015 00:41 IST

इंदिरा आवास योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात २०१४-१५ या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार ६७४ घरकूल मंजूर करण्यात आले

इंदिरा आवास योजना : २,६७४ पैकी १११ बांधकाम पूर्णदेवानंद नंदेश्वर भंडाराइंदिरा आवास योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात २०१४-१५ या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार ६७४ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७०० व अनुसूचित जातीसाठी १९७४ घरकुलाचा समावेश आहे. आर्थिक वर्ष संपले असतानाही केवळ १११ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून केवळ १५५ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. वाढत्या महागाईमध्ये सामान्य नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. परिणामी कित्येक नागरिकांना झोपडीतच आपले आयुष्य घालवावे लागते. तर काही नागरिकांना उघड्यावरच संसार थाटावा लागतो. यापासून नागरिकांची मुक्तता होऊन प्रत्येकाला स्वत:चे घर बांधता यावे, यासाठी केंद्र शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला एक लाख रूपयांचे अनुदान दिले जाते. घरकुलाची रक्कम तीन हफ्यात दिली जाते. घरकूल मंजूर झाल्याबरोबर पहिला हप्ता वितरित केला जातो. पहिल्या हफ्याच्या पैशाचा वापर करून जवळपास पाच फुटापर्यंत घराचे बांधकाम झाल्यानंतर दुसरा हप्ता दिल्या जातो व घर पूर्ण झाल्यानंतर तिसरा हप्ता वितरित केला जातो.यापध्दतीनुसार आजपर्यंत दोन हजार ६२६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता, एक हजार ३१६ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता व केवळ १५५ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे.अनेक लाभार्थ्यांनी स्वत: जवळचे पैसे वापरून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र तिसरा हप्ता मिळत नसल्याने लाभार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. तिसरा हप्ता देण्यात यावा, याबाबत लाभार्थी अनेकवेळा पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे खेटे मारत आहेत. तरीही प्रशासन मात्र हलण्यास तयार नाही. त्यामुळे घरकूल लाभार्थी त्रस्त झाले आहेत. हप्ता वितरणाची पध्दती आहे किचकटप्रशासनाकडून घरकूल मंजूर झाल्यानंतर अनेक महिने निधीच प्राप्त होत नाही. पावसाळ्यामध्ये निधी प्राप्त होते. मात्र या कालावधीत शेतीचा हंगाम सुरू राहत असल्याने लाभार्थी बांधकामाला सुरूवात करीत नाही. निधी मिळाल्यानंतर पहिला हप्ता ३७ हजार रुपये दिल्या जातो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत काम झाल्यानंतर दुसरा हप्ता ३७ हजार रुपयांचा मिळतो. मात्र घराचे पूर्ण बांधकाम झाल्याशिवाय तिसरा हप्ता २६ हजार रुपये दिला जात नाही. अनेक लाभार्थ्यांचे घर बांधकाम पूर्ण होऊनही अधिकारी पाहणी करीत नसल्याने तिसऱ्या हफ्याची रक्कम रखडते.