शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

निधीअभावी रखडले

By admin | Updated: April 6, 2015 00:41 IST

इंदिरा आवास योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात २०१४-१५ या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार ६७४ घरकूल मंजूर करण्यात आले

इंदिरा आवास योजना : २,६७४ पैकी १११ बांधकाम पूर्णदेवानंद नंदेश्वर भंडाराइंदिरा आवास योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात २०१४-१५ या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार ६७४ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत. यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७०० व अनुसूचित जातीसाठी १९७४ घरकुलाचा समावेश आहे. आर्थिक वर्ष संपले असतानाही केवळ १११ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून केवळ १५५ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. वाढत्या महागाईमध्ये सामान्य नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही. परिणामी कित्येक नागरिकांना झोपडीतच आपले आयुष्य घालवावे लागते. तर काही नागरिकांना उघड्यावरच संसार थाटावा लागतो. यापासून नागरिकांची मुक्तता होऊन प्रत्येकाला स्वत:चे घर बांधता यावे, यासाठी केंद्र शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला एक लाख रूपयांचे अनुदान दिले जाते. घरकुलाची रक्कम तीन हफ्यात दिली जाते. घरकूल मंजूर झाल्याबरोबर पहिला हप्ता वितरित केला जातो. पहिल्या हफ्याच्या पैशाचा वापर करून जवळपास पाच फुटापर्यंत घराचे बांधकाम झाल्यानंतर दुसरा हप्ता दिल्या जातो व घर पूर्ण झाल्यानंतर तिसरा हप्ता वितरित केला जातो.यापध्दतीनुसार आजपर्यंत दोन हजार ६२६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता, एक हजार ३१६ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता व केवळ १५५ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे.अनेक लाभार्थ्यांनी स्वत: जवळचे पैसे वापरून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र तिसरा हप्ता मिळत नसल्याने लाभार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. तिसरा हप्ता देण्यात यावा, याबाबत लाभार्थी अनेकवेळा पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे खेटे मारत आहेत. तरीही प्रशासन मात्र हलण्यास तयार नाही. त्यामुळे घरकूल लाभार्थी त्रस्त झाले आहेत. हप्ता वितरणाची पध्दती आहे किचकटप्रशासनाकडून घरकूल मंजूर झाल्यानंतर अनेक महिने निधीच प्राप्त होत नाही. पावसाळ्यामध्ये निधी प्राप्त होते. मात्र या कालावधीत शेतीचा हंगाम सुरू राहत असल्याने लाभार्थी बांधकामाला सुरूवात करीत नाही. निधी मिळाल्यानंतर पहिला हप्ता ३७ हजार रुपये दिल्या जातो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत काम झाल्यानंतर दुसरा हप्ता ३७ हजार रुपयांचा मिळतो. मात्र घराचे पूर्ण बांधकाम झाल्याशिवाय तिसरा हप्ता २६ हजार रुपये दिला जात नाही. अनेक लाभार्थ्यांचे घर बांधकाम पूर्ण होऊनही अधिकारी पाहणी करीत नसल्याने तिसऱ्या हफ्याची रक्कम रखडते.