शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

तुमसर-मोहाडी तालुक्यातील कारखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्यातील सुमारे ३ ते ४ हजार कामगार सध्या बेरोजगार आहेत.

ठळक मुद्देहजारो कामगार बेरोजगार : युनिव्हर्सल व एलोरा पेपर मिलचा समावेश

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यातील दोन मोठे कारखाने कायम बंद असून दोन्ही तालुक्यातील एमआयडीसीकडे उद्योगपतींनी पाठ फिरविली आहे. वीज, रस्ते, पाणी मुबलक असूनही कारखाने बंद आहेत. लोकप्रतिनिधींचे येथे कायम दुर्लक्ष हेच प्रमुख कारण दिसत आहे. नागपूर अधिवेशनात सदर गंभीर प्रश्नांची चर्चा बेरोजगारांना अपेक्षित आहे.रेल्वेमार्ग व राष्ट्रीय तथा राज्य मार्गावर तुमसर व मोहाडी तालुके आहेत. तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्यातील सुमारे ३ ते ४ हजार कामगार सध्या बेरोजगार आहेत. तुमसर एमआयडीसीतील उद्योगधंदे बोटावर मोजण्याइतकेच सुरु आहेत.रुग्णालयाच्या सुविधादेव्हाडी एमआयडीसी राष्ट्रीय महामार्गावर आहे. रेल्वे स्थानकही आहे. परंतु येथे कारखाने सुरु झाले नाही. मात्र जागा बळकाविण्यात आली आहे. आजही येथे भूखंड मोठ्या प्रमाणात रिकामे आहे. त्याकडे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे कायम दुर्लक्ष दिसत आहे. केवळ अहवाल मागविणे व चौकशी करण्यातच सुमारे अडीच दशकांचा कालखंड येथे वाया गेला आहे. पाणी, वीज येथे उपलब्ध असूनही उद्योगपतींनी येथे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. भाजप सेनेच्या कार्यकाळात येथील भूखंडाची चौकशी झाली होती हे विशेष. तीन वर्षपर्यंत उद्योग स्थापित न केल्यास सदर भूखंड शासनजमा करण्याचा नियम आहे.युनिव्हर्सल कायम चर्चेतमॅग्नीज शुद्धीकरण कारखाना मागील दीड दशकापासून कायम चर्चेत आहे. २०० कोटींचे वीज बिल सदर कारखान्यावर थकीत होते. अक्षय योजनेंतर्गत ते शासनाने माफ केले. परंतु कारखाना आजपर्यंत सुरु झाला नाही. अधिवेशनात सदर प्रकरणावर चर्चा अपेक्षित आहे. एलोरा पेपर मिल कागद निर्मिती करणारा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. सुमारे ३५ वर्ष हा कारखाना सुरु होता. येथील ४५० ते ५०० कामगार बेरोजगार झाले. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी