शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

तुमसर-मोहाडी तालुक्यातील कारखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्यातील सुमारे ३ ते ४ हजार कामगार सध्या बेरोजगार आहेत.

ठळक मुद्देहजारो कामगार बेरोजगार : युनिव्हर्सल व एलोरा पेपर मिलचा समावेश

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यातील दोन मोठे कारखाने कायम बंद असून दोन्ही तालुक्यातील एमआयडीसीकडे उद्योगपतींनी पाठ फिरविली आहे. वीज, रस्ते, पाणी मुबलक असूनही कारखाने बंद आहेत. लोकप्रतिनिधींचे येथे कायम दुर्लक्ष हेच प्रमुख कारण दिसत आहे. नागपूर अधिवेशनात सदर गंभीर प्रश्नांची चर्चा बेरोजगारांना अपेक्षित आहे.रेल्वेमार्ग व राष्ट्रीय तथा राज्य मार्गावर तुमसर व मोहाडी तालुके आहेत. तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्यातील सुमारे ३ ते ४ हजार कामगार सध्या बेरोजगार आहेत. तुमसर एमआयडीसीतील उद्योगधंदे बोटावर मोजण्याइतकेच सुरु आहेत.रुग्णालयाच्या सुविधादेव्हाडी एमआयडीसी राष्ट्रीय महामार्गावर आहे. रेल्वे स्थानकही आहे. परंतु येथे कारखाने सुरु झाले नाही. मात्र जागा बळकाविण्यात आली आहे. आजही येथे भूखंड मोठ्या प्रमाणात रिकामे आहे. त्याकडे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे कायम दुर्लक्ष दिसत आहे. केवळ अहवाल मागविणे व चौकशी करण्यातच सुमारे अडीच दशकांचा कालखंड येथे वाया गेला आहे. पाणी, वीज येथे उपलब्ध असूनही उद्योगपतींनी येथे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. भाजप सेनेच्या कार्यकाळात येथील भूखंडाची चौकशी झाली होती हे विशेष. तीन वर्षपर्यंत उद्योग स्थापित न केल्यास सदर भूखंड शासनजमा करण्याचा नियम आहे.युनिव्हर्सल कायम चर्चेतमॅग्नीज शुद्धीकरण कारखाना मागील दीड दशकापासून कायम चर्चेत आहे. २०० कोटींचे वीज बिल सदर कारखान्यावर थकीत होते. अक्षय योजनेंतर्गत ते शासनाने माफ केले. परंतु कारखाना आजपर्यंत सुरु झाला नाही. अधिवेशनात सदर प्रकरणावर चर्चा अपेक्षित आहे. एलोरा पेपर मिल कागद निर्मिती करणारा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. सुमारे ३५ वर्ष हा कारखाना सुरु होता. येथील ४५० ते ५०० कामगार बेरोजगार झाले. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी