शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:40 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : मर्यादेपेक्षा कुठलीही वस्तू अधिक झाली तर ती हानिकारक होते. असेच मानवी आरोग्याबाबतही आहे. अधिक आहार ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : मर्यादेपेक्षा कुठलीही वस्तू अधिक झाली तर ती हानिकारक होते. असेच मानवी आरोग्याबाबतही आहे. अधिक आहार घेतल्याने ‘बुलीमिया’ हा आजार होतो. तसेच शरीरात वाजवीपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास आरोग्याला अपायकारक होऊ शकते. एखादवेळी किंवा दिवसाकाठी अधिक पाणी प्यायल्यास अडचण नाही मात्र ती सवय झाली तर शरीरावर परिणाम जाणवू लागताे. यात व्यक्ती प्राथमिक स्वरूपात चिडचिड करणे, अंधुक दिसणे किंवा वेळ प्रसंगी पक्षाघाताची शक्यता असते. त्यामुळे दिवसाकाठी प्रत्येक व्यक्तीने चार ते पाच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र त्यापेक्षा अधिक पाणी पिणे योग्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

बॉक्स

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीरात पाण्याची मात्रा कमी होऊ देऊ नये. शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेला पाण्याची फार आवश्यकता असते. याशिवाय पाचनशक्तीसाठी पाणी आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणे ही अत्यंत गरजेचे आहे.

बॉक्स

शरीरात पाणी जास्त झाले तर...

मानवी शरीरात वाजवीपेक्षा अधिक पाणी प्यायल्यास त्याचा फटका ब्रेनला होऊ शकतो. याशिवाय मसलमध्ये क्रॅम्प येणे, अंधूक दिसणे आदी प्रकार किंवा लक्षणे दिसू लागतात.

बॉक्स

तज्ज्ञ काय म्हणतात...

मानवी आरोग्य सुदृढ राहणे हे कुणालाही अपेक्षित बाब वाटते. त्यासाठी शरीरातील कुठलीही मात्रा संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे. पाण्याची ही तेवढेच महत्त्व आहे. पाणी हे जीवन असून प्रत्येकाने दिवसाकाठी चार ते पाच लिटर पाणी पिणे अपेक्षित आहे. मात्र त्यापेक्षा जास्त पाणी पीत असल्यास सावधान होण्याची गरज आहे. एखादवेळी जास्तीचे पाणी प्यायल्यास हरकत नाही मात्र ती सवय होऊ नये. अधिकचे पाणी पिण्याची सवय पडल्यास याचा परिणाम ब्रेनवर होऊ शकतो. व्यक्तीत चिडचिडेपणा, ओरडणे, अंधूक दिसणे, मसलमध्ये क्रॅम्प येणे आदी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे संतुलित आहार व पाण्याची मात्रा शरीरात योग्य राहावी याची काळजी घेणे आवश्यक आहे.

-डॉ. अमित कावळे, भंडारा.