शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वनविकास महामंडळाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:02 IST

गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती.

ठळक मुद्देदणका लोकमतचा : आता जिल्ह्यात होणार मिश्र रोपवन

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती. म्हणजे कापणी शंभर प्रकारची आणि वृक्ष लावायचे झाल्यास मोजक्या जातीचे असा प्रकार जिल्ह्यात या आधी ठिकठिकाणी हजारो हेक्टरमध्ये पहायला मिळेल. परंतु आता मात्र या मिश्र रोपवनाची लागवड व्हावी आणि करावी म्हणून तिर्री ग्रामवासीयांनी चक्क वनविकास महामंडळाचे लाकूड भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य असल्याचे पत्रही ग्रामपंचायतला पाठविले. परंतु हा प्रश्न केवथ तिर्री गावातील जंगलाचा नसून संपूर्ण जिल्ह्यातील जंगलाचा असल्याचे मत माजी सरपंच नरेंद्र आयतुलवार यांनी मांडले होते.विभागीय व्यवस्थापक वनप्रकल्प विभाग, भंडारा डी.एस. इंगळे यांना मित्र रोपवनाविषयी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले असता जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी वनविकास महामंडळ वृक्षतोड करत आहे त्या त्या ठिकाणी आता जिल्हाभरात मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी प्रश्न असा पडतो की हे शहाणपण जे तिर्री ग्रामवासीयांनी वनविकास महामंडळाच्या लक्षात आणून दिले ते यांना आधीच का आले नाही? की लक्षात येवून सुद्धा जसा तसाच चालवायचा असा तर कदाचित होत नसावा हाही एक प्रश्नच आहे.काय आहे सागवन आणि बांबू वृक्ष लावण्यामागचे कारण. तर एका प्राप्त माहितीनुसार सागवन वृक्ष जडी तसेच बांबूचे रोप एकदा लावले की हिशोबच संपतो आणि यामुळे मात्र सर्वात जास्त त्रास जर होत असेल तर जंगलात राहणाºया वन्यप्राण्यांना. या दोन्ही वृक्षामुळे जंगलातील वन्यप्राणी जसे माकड, अस्वल, हरिण, बिबट इत्यादी वन्यप्राण्यांची घरटी मात्र उजाडली हेही तेवढेच सत्य.शासन ग्लोबल वार्र्मिंगचा दाखला देतो. दरवर्षाला वृक्ष लागवड योजना राबवितो. त्यावर लाखो रुपये संवर्धनासाठी खर्च करते आणि पुन्हा दुसरीकडे तयार ताजे टवटवीत निसर्गरम्य शेकडो प्रकारची वनसंपदा मात्र याचा त्याचा दाखला देऊन जप्त करायला तयार होते. करपलेली जंगले पुन्हा होणार का? आणि तशाप्रकारची तरी होणार का? महत्वाचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उभी जंगले तोडण्यामागचे कारण तरी काय असू शकते. यामुळे कुणाला फायदा होतो हे माहित नसले तरी यामुळे नुकसान मात्र कुठल्याही एका समाज अथवा व्यक्तीचे होत नसून सर्वांचेच होत आहे. वन्यप्राणी, पशूपक्षी, जीवजंतू आणि मानव या सर्वांचेच नुकसान जर एकामुळे होत आहे याचेही कुणाला देणे घेणे असावे की नसावे, असा सवाल उपस्थित होत आहे.तिर्री ग्रामवासीयांची गावाशेजारील जंगलात रोज भटकंती असते. मोठमोठ्या शहराची जशी परिस्थिती गंभीर झाली तशी गंभीर परिस्थिती आम्ही तरी होऊ देणार नाही. यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गाव आमचा आणि जंगलही आमचाच असे हृदयस्पर्शी शब्द ऐकून आलेली अधिकारीही काही क्षणासाठी गहीवरले होते.