शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अखेर वनविकास महामंडळाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:02 IST

गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती.

ठळक मुद्देदणका लोकमतचा : आता जिल्ह्यात होणार मिश्र रोपवन

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती. म्हणजे कापणी शंभर प्रकारची आणि वृक्ष लावायचे झाल्यास मोजक्या जातीचे असा प्रकार जिल्ह्यात या आधी ठिकठिकाणी हजारो हेक्टरमध्ये पहायला मिळेल. परंतु आता मात्र या मिश्र रोपवनाची लागवड व्हावी आणि करावी म्हणून तिर्री ग्रामवासीयांनी चक्क वनविकास महामंडळाचे लाकूड भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य असल्याचे पत्रही ग्रामपंचायतला पाठविले. परंतु हा प्रश्न केवथ तिर्री गावातील जंगलाचा नसून संपूर्ण जिल्ह्यातील जंगलाचा असल्याचे मत माजी सरपंच नरेंद्र आयतुलवार यांनी मांडले होते.विभागीय व्यवस्थापक वनप्रकल्प विभाग, भंडारा डी.एस. इंगळे यांना मित्र रोपवनाविषयी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले असता जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी वनविकास महामंडळ वृक्षतोड करत आहे त्या त्या ठिकाणी आता जिल्हाभरात मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी प्रश्न असा पडतो की हे शहाणपण जे तिर्री ग्रामवासीयांनी वनविकास महामंडळाच्या लक्षात आणून दिले ते यांना आधीच का आले नाही? की लक्षात येवून सुद्धा जसा तसाच चालवायचा असा तर कदाचित होत नसावा हाही एक प्रश्नच आहे.काय आहे सागवन आणि बांबू वृक्ष लावण्यामागचे कारण. तर एका प्राप्त माहितीनुसार सागवन वृक्ष जडी तसेच बांबूचे रोप एकदा लावले की हिशोबच संपतो आणि यामुळे मात्र सर्वात जास्त त्रास जर होत असेल तर जंगलात राहणाºया वन्यप्राण्यांना. या दोन्ही वृक्षामुळे जंगलातील वन्यप्राणी जसे माकड, अस्वल, हरिण, बिबट इत्यादी वन्यप्राण्यांची घरटी मात्र उजाडली हेही तेवढेच सत्य.शासन ग्लोबल वार्र्मिंगचा दाखला देतो. दरवर्षाला वृक्ष लागवड योजना राबवितो. त्यावर लाखो रुपये संवर्धनासाठी खर्च करते आणि पुन्हा दुसरीकडे तयार ताजे टवटवीत निसर्गरम्य शेकडो प्रकारची वनसंपदा मात्र याचा त्याचा दाखला देऊन जप्त करायला तयार होते. करपलेली जंगले पुन्हा होणार का? आणि तशाप्रकारची तरी होणार का? महत्वाचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उभी जंगले तोडण्यामागचे कारण तरी काय असू शकते. यामुळे कुणाला फायदा होतो हे माहित नसले तरी यामुळे नुकसान मात्र कुठल्याही एका समाज अथवा व्यक्तीचे होत नसून सर्वांचेच होत आहे. वन्यप्राणी, पशूपक्षी, जीवजंतू आणि मानव या सर्वांचेच नुकसान जर एकामुळे होत आहे याचेही कुणाला देणे घेणे असावे की नसावे, असा सवाल उपस्थित होत आहे.तिर्री ग्रामवासीयांची गावाशेजारील जंगलात रोज भटकंती असते. मोठमोठ्या शहराची जशी परिस्थिती गंभीर झाली तशी गंभीर परिस्थिती आम्ही तरी होऊ देणार नाही. यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गाव आमचा आणि जंगलही आमचाच असे हृदयस्पर्शी शब्द ऐकून आलेली अधिकारीही काही क्षणासाठी गहीवरले होते.