शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

अखेर वनविकास महामंडळाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:02 IST

गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती.

ठळक मुद्देदणका लोकमतचा : आता जिल्ह्यात होणार मिश्र रोपवन

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत चार पाच वर्षांपासून वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यातील ठिकठिकाणी बिनधास्तपणे लहान मोठे वृक्षांची कापणी करून त्या ठिकाणी सागवन आणि बांबूची रोपे लावून मोकळी होत होती. म्हणजे कापणी शंभर प्रकारची आणि वृक्ष लावायचे झाल्यास मोजक्या जातीचे असा प्रकार जिल्ह्यात या आधी ठिकठिकाणी हजारो हेक्टरमध्ये पहायला मिळेल. परंतु आता मात्र या मिश्र रोपवनाची लागवड व्हावी आणि करावी म्हणून तिर्री ग्रामवासीयांनी चक्क वनविकास महामंडळाचे लाकूड भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य असल्याचे पत्रही ग्रामपंचायतला पाठविले. परंतु हा प्रश्न केवथ तिर्री गावातील जंगलाचा नसून संपूर्ण जिल्ह्यातील जंगलाचा असल्याचे मत माजी सरपंच नरेंद्र आयतुलवार यांनी मांडले होते.विभागीय व्यवस्थापक वनप्रकल्प विभाग, भंडारा डी.एस. इंगळे यांना मित्र रोपवनाविषयी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले असता जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी वनविकास महामंडळ वृक्षतोड करत आहे त्या त्या ठिकाणी आता जिल्हाभरात मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी प्रश्न असा पडतो की हे शहाणपण जे तिर्री ग्रामवासीयांनी वनविकास महामंडळाच्या लक्षात आणून दिले ते यांना आधीच का आले नाही? की लक्षात येवून सुद्धा जसा तसाच चालवायचा असा तर कदाचित होत नसावा हाही एक प्रश्नच आहे.काय आहे सागवन आणि बांबू वृक्ष लावण्यामागचे कारण. तर एका प्राप्त माहितीनुसार सागवन वृक्ष जडी तसेच बांबूचे रोप एकदा लावले की हिशोबच संपतो आणि यामुळे मात्र सर्वात जास्त त्रास जर होत असेल तर जंगलात राहणाºया वन्यप्राण्यांना. या दोन्ही वृक्षामुळे जंगलातील वन्यप्राणी जसे माकड, अस्वल, हरिण, बिबट इत्यादी वन्यप्राण्यांची घरटी मात्र उजाडली हेही तेवढेच सत्य.शासन ग्लोबल वार्र्मिंगचा दाखला देतो. दरवर्षाला वृक्ष लागवड योजना राबवितो. त्यावर लाखो रुपये संवर्धनासाठी खर्च करते आणि पुन्हा दुसरीकडे तयार ताजे टवटवीत निसर्गरम्य शेकडो प्रकारची वनसंपदा मात्र याचा त्याचा दाखला देऊन जप्त करायला तयार होते. करपलेली जंगले पुन्हा होणार का? आणि तशाप्रकारची तरी होणार का? महत्वाचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उभी जंगले तोडण्यामागचे कारण तरी काय असू शकते. यामुळे कुणाला फायदा होतो हे माहित नसले तरी यामुळे नुकसान मात्र कुठल्याही एका समाज अथवा व्यक्तीचे होत नसून सर्वांचेच होत आहे. वन्यप्राणी, पशूपक्षी, जीवजंतू आणि मानव या सर्वांचेच नुकसान जर एकामुळे होत आहे याचेही कुणाला देणे घेणे असावे की नसावे, असा सवाल उपस्थित होत आहे.तिर्री ग्रामवासीयांची गावाशेजारील जंगलात रोज भटकंती असते. मोठमोठ्या शहराची जशी परिस्थिती गंभीर झाली तशी गंभीर परिस्थिती आम्ही तरी होऊ देणार नाही. यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गाव आमचा आणि जंगलही आमचाच असे हृदयस्पर्शी शब्द ऐकून आलेली अधिकारीही काही क्षणासाठी गहीवरले होते.