शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

शाळा बंद, तरी ७५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

गोंदिया : एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू असून, यातूनच सक्तीने शिक्षणाचा अधिकार उदयास आला ...

गोंदिया : एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू असून, यातूनच सक्तीने शिक्षणाचा अधिकार उदयास आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशही उपलब्ध करवून दिले जात आहे. आता नवीन शिक्षण सत्र सुरू होणार असून, यासाठी सर्व शिक्षा विभागाने ७५,४१६ विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ या म्हणीची प्रचिती कित्येकांच्या जीवनात आली असून, त्यामुळेच शासन या म्हणीला आपले ब्रीद माणून कार्य करीत आहे. शासनाने प्रत्येक वर्गातील मुलांना शिक्षण मिळावे, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अंमलात आणला आहे. त्यानुसार, शिक्षण विभागाकडून एकही मूल सुटू नये यासाठी प्रयत्न केले जातात. मुले शाळेपर्यंत पोहोचली की त्यांच्यात शाळेप्रति आवड निर्माण व्हावी, म्हणून शासनाकडून त्यांना नवीन पुस्तके, गणवेश, शालेय साहित्य व पोषण आहार यासारख्या सुविधा पुरविल्या जात आहेत.

आता सन २०२० पासून प्रत्यक्ष शाळा भरल्या नसल्या तरीही शासनाकडून प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा घरपोहोच दिल्या जात आहेत. त्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने शिक्षण विभाग पुन्हा कामाला लागला आहे. शासनाकडून सर्व मुली, अनु. जमाती (एसटी) मुले, अनु. जाती (एससी) मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांनाच गणवेश दिले जात असून, यंदा शिक्षण विभागाने गणवेशासाठी ७५,४१६ विद्यार्थ्यांची नोंद केली असून, तसा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना गणवेशासाठी आरक्षणाची अट असल्याने त्यानुसारच गणवेशाची पूर्तता केली जाते.

विद्यार्थ्यांना गणवेश वाटपात दुजाभाव नकोच

जिल्ह्यात इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत यंदा ९५ हजार ७८८ विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियानाकडून पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून पुस्तके दिली जातात. गणवेश वाटप करताना कसल्याही प्रकारचा दुजाभाव नको.

अशी आहे गणवेशासाठी वर्गवारी...

सर्व शिक्षा अभियानांतर्गत ७५,४१६ विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या गणवेशाच्या नियोजनात ३७,७५० मुली, ७१४० अनु. जमाती मुले, ४०४५ अनु. जाती मुले, तर २६४८१ दारिद्र्‌य रेषेखालील मुलांचा समावेश आहे. यानुसार, जिल्ह्यात गणवेश वाटपासाठी सर्व शिक्षा अभियानाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र उरलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशापासून मुकावे लागणार आहे.