शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

प्रकल्प भरले तरीही सिंचनासाठी पाणी नाही

By admin | Updated: August 4, 2016 00:32 IST

तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे तीन मोठे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.

सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा : १६ तासांच्या भारनियमनाने शेतकरी हवालदिलसंजय साठवणे साकोली तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे तीन मोठे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. हे तिन्ही प्रकल्प तुडूंब भरले असले तरी या पाण्याचा सिंचनासाठी काही एक उपयोग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे शेतकरी १६ तासाच्या भारनियमनामुळे त्रस्त आहेत. आता शेतकऱ्यांनी जगाव तरी कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.साकोली तालुक्यात तीन मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात चुलबंद नदीवरील निम्न चुलबंद प्रकल्प, दुसरा वडेगाव येथील भीमलकसा प्रकल्प व तिसरा घानोड येथील भुरेजंगी प्रकल्प यातील निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम मागील वीस वर्षापासून सुरु असून आतापर्यंत या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असून या प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. मात्र ज्या कालव्याच्या माध्यमातून या प्रकल्पाचे पाणी तलावात जावू शेतात जाणार आहे. ते कालवेच अपूर्ण आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे पूर्ण दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे आलेले संपूर्ण पाणी वाया गेले ही या प्रकल्पाची शोकांतिका आहे.साकोलीपासून अवघ्या पंधरा किलोेमिटर अंतरावर असलेल्या भिमलकसा प्रकल्प हा वनराईने नटलेला असून या प्रकल्पाच्या चारही बाजूने पहाड्या आहेत. या प्रकल्पात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. मात्र शासनाच्या अपूर्ण कामामुळे या प्रकल्पाची पाळ दोन तीन वर्षातून एकदा तरी फुटून संपूर्ण परिसरातील पाणी शेतात घुसून धानपिकाची नासाडी करते. मग गावकरीच लोकवर्गणी करून त्याची डागडुजी करतात. यावर्षी हाही तलाव तुडूंब भरला असून जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याही प्रकल्पाच्या कालवे तयार नसल्याने हे पाणी सिंचनासाठी उपयोगातच आणता येत नाही. ही सुद्धा एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. तिसरा भुरेजंगी प्रकल्प निसर्गाच्या सानिध्यात असून हाही प्रकल्प भरला आहे. मात्र या प्रकल्पाचे काम अपूर्ण असल्यामुळे हे याही प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी वापरता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यासमोर सिंचनासाठी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.भारनियमनाने शेतकरी त्रस्ततालुक्यातील सिंचनाची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेवून किंवा जसे जमेल तशी जुळवाजुळव करून विहिरी व बोअरवेल केल्या. मात्र यावर्षी ऐन पावसाळ्यात १६ तासाचे भारनियमन सुरु असल्यामुळे या विहिरी व बोअरवेलचाही सिंचनासाठी उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षनिवडणुकीच्या वेळी मतांचे जोगवे मागणाऱ्या लोकप्रतिनिधी आता शेतकऱ्यांचे हाल दिसत नाही का? न भुतो न भविष्यती असे पावसाळ्यात भारनियमन यावर्षी सुरु झाले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी जरी दुर्लक्ष केले तरी लोकप्रतिनिधी तरी दुर्लक्ष करू नये अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.