शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

प्रकल्प भरले तरीही सिंचनासाठी पाणी नाही

By admin | Updated: August 4, 2016 00:32 IST

तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे तीन मोठे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.

सिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा : १६ तासांच्या भारनियमनाने शेतकरी हवालदिलसंजय साठवणे साकोली तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय करणारे तीन मोठे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. हे तिन्ही प्रकल्प तुडूंब भरले असले तरी या पाण्याचा सिंचनासाठी काही एक उपयोग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे शेतकरी १६ तासाच्या भारनियमनामुळे त्रस्त आहेत. आता शेतकऱ्यांनी जगाव तरी कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.साकोली तालुक्यात तीन मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात चुलबंद नदीवरील निम्न चुलबंद प्रकल्प, दुसरा वडेगाव येथील भीमलकसा प्रकल्प व तिसरा घानोड येथील भुरेजंगी प्रकल्प यातील निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम मागील वीस वर्षापासून सुरु असून आतापर्यंत या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असून या प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. मात्र ज्या कालव्याच्या माध्यमातून या प्रकल्पाचे पाणी तलावात जावू शेतात जाणार आहे. ते कालवेच अपूर्ण आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचे पूर्ण दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे आलेले संपूर्ण पाणी वाया गेले ही या प्रकल्पाची शोकांतिका आहे.साकोलीपासून अवघ्या पंधरा किलोेमिटर अंतरावर असलेल्या भिमलकसा प्रकल्प हा वनराईने नटलेला असून या प्रकल्पाच्या चारही बाजूने पहाड्या आहेत. या प्रकल्पात दरवर्षीच मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. मात्र शासनाच्या अपूर्ण कामामुळे या प्रकल्पाची पाळ दोन तीन वर्षातून एकदा तरी फुटून संपूर्ण परिसरातील पाणी शेतात घुसून धानपिकाची नासाडी करते. मग गावकरीच लोकवर्गणी करून त्याची डागडुजी करतात. यावर्षी हाही तलाव तुडूंब भरला असून जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याही प्रकल्पाच्या कालवे तयार नसल्याने हे पाणी सिंचनासाठी उपयोगातच आणता येत नाही. ही सुद्धा एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. तिसरा भुरेजंगी प्रकल्प निसर्गाच्या सानिध्यात असून हाही प्रकल्प भरला आहे. मात्र या प्रकल्पाचे काम अपूर्ण असल्यामुळे हे याही प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी वापरता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यासमोर सिंचनासाठी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.भारनियमनाने शेतकरी त्रस्ततालुक्यातील सिंचनाची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेवून किंवा जसे जमेल तशी जुळवाजुळव करून विहिरी व बोअरवेल केल्या. मात्र यावर्षी ऐन पावसाळ्यात १६ तासाचे भारनियमन सुरु असल्यामुळे या विहिरी व बोअरवेलचाही सिंचनासाठी उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षनिवडणुकीच्या वेळी मतांचे जोगवे मागणाऱ्या लोकप्रतिनिधी आता शेतकऱ्यांचे हाल दिसत नाही का? न भुतो न भविष्यती असे पावसाळ्यात भारनियमन यावर्षी सुरु झाले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी जरी दुर्लक्ष केले तरी लोकप्रतिनिधी तरी दुर्लक्ष करू नये अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.