शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतरही लागेना ‘जय’चा शोध

By admin | Updated: April 19, 2017 00:25 IST

अवघ्या देशाला भुरळ घातलेला ‘जय’ नामक वाघ वर्षभरानंतरही बेपत्ताच असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.

बेपत्ता होण्याचे गुढ कायम : आता उरल्या ‘जय’च्या केवळ आठवणी पवनी : अवघ्या देशाला भुरळ घातलेला ‘जय’ नामक वाघ वर्षभरानंतरही बेपत्ताच असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. १८ एप्रिल २०१६ रोजी त्याचा शेवटचा अधिवास दिसल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. या घटनेला आज वर्ष झाले. वन विभाग, व्याघ्र प्रकल्प, राज्य शासनातर्फे ‘जय’ला शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. परंतु ‘जय’चा शोध लागला नाही. जय विषयी वनविभागानेही मौन बाळगले आहे. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून शेकडो किलोमिटरचे अंतर कापून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाहुणगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये ‘जय’ आला होता. तेव्हा तो तीन वर्षाचा होता. काही दिवसातच ‘जय’ या अभयारण्याचा हिरो ठरला होता. मोठ्या संख्येने पर्यटक ‘जय’ला पाहण्यासाठी येत होते. दहा दिवसापर्यंत आॅनलाईन बुकींग राहत होती. शेकडो पर्यटकांना प्रतीक्षा यादीवर राहावे लागत होते. ‘जय’ला पाहण्यासाठी अनेक सेलीब्रीटींनीही हजेरी लावली होती. भारदस्त शरीरयष्टी, देखणेपण, विलक्षण चपळाई आदी गुणांमुळे ‘जय’ हा पर्यटकांना येथे भुरळ घालत होता. अल्पावधीतच ‘जय’ने या अभयारण्यात साम्राज्य निर्माण केले होते. येथे ‘जय’चा दरारा होता कोणताही वाघ हा १०० चौ.कि. मी परिसरात फिरतो. पण ‘जय’ हा अभयारण्याच्या १८९ किलोमिटर व प्रादेशिक वनविभागाच्या १०० कि.मी. वर अशा २५० कि.मी. जंगलात फिरत होता. ‘जय’ला अभयारण्याच्या पवनी वनपरिक्षेत्रात आठ दिवस तर आठ दिवस अभयारण्याच्या भिवापूर, उमरेड, कऱ्हांडलाच्या जंगलात राहात होता. गोसीखुर्द धरणाच्या जलस्तर वाढल्यामुळे मरू नदी पूर्णपणे भरलेली असताना ‘जय’नदीत पोहून जात होता. ‘जय’ने अभयारण्याच्या जंगलाशिवाय आपले फिरण्याचे क्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या नागभिड, ब्रम्हपुरीपर्यंत वाढविले होते. ‘जय’ने माणसांवर कधीही हल्ला केला नाही.पण ‘जय’ २०१६ मध्ये अचानक बेपत्ता झाल्याची माहिती बाहेर येऊ लागली. ‘जय’च्या पाऊलखुणा पवनीजवळील बेटाळा शिवारात आढळून आल्या. ‘जय’ला लावण्यात आलेल्या कॉलर आयडीची ही अखेरची नोंद ठरली. तो कुठे गेला? त्याचे काय झाले? यावर तर्क वितर्क लावू लागले होते. दुसरीकडे वनविभागाने मिशन ‘जय’ सर्च मोहिमेवर सर्व लक्ष केंद्रीत केले होते. जीपीएस अनुसार ‘जय’ १८ एप्रिल २०१६ ला आढळून आला होता. विशेष म्हणजे जय हा आपला नेहमीचा मार्ग सोडून निघाला होता. ज्या शेतात ‘जय’च्या पायाचे ठसे आढळून आले होते. तेथून दोनशे फुटावर पवनी नागपूर डांबरीकरणाचा रस्ता आहे. याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल २०१६ ला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रातील डोंगर महादेव परिसरातील जंगलातील शेळ्या पिपरी बोडीत गरमीपासून थंडावा मिळण्याकरिता पाण्यात आनंद घेताना पर्यटकांना दिसला. तो शेवटचा. त्यानंतर जय कधीही दिसला नाही. ‘जय’चा प्रवेश झाला तो पवनीच्या जंगलातून जय नाहीसा झाला तो पवनीच्या जंगलातून. ‘जय’ बेपत्ता होण्याचे गुढ एक वर्षापर्यंत वनविभागाला उकलता आले नाही. ‘जय’ बेपत्ता होण्याचा परिणाम पर्यटनावर झाला. आता ‘जय’च्या केवळ आठवणी उरल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)