शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

तणसापासून इथेनॉल व सीएनजी प्रकल्प दोन वर्षात सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:31 IST

तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून दीड हजार कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत सुरू करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपरिणय फुके : मकरधोकडा येथे जागेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून दीड हजार कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत सुरू करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सोमवारी भंडारा तालुक्यातील मकरधोकडा येथील इथेनॉल व सीएनजी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होेते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, जे.बी. संगीतराव, कार्यकारी अभियंता डी.एम. नंदनवार, तहसीलदार अक्षय पोयाम, बीपीसीएलचे संजीव पोळ उपस्थित होते. भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मिती प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत मकरधोकडा येथील जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन एमआयडीसीला हस्तांतरीत करून ती जमीन प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतला आहे.धानाचे तणस यापुढे शेतकऱ्यांनी जाळू नये, असे आवाहन करत पालकमंत्री डॉ. फुके म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दोन ते तीन लाख टन तणस या प्रकल्पासाठी लागणार आहे. त्यातून शेतकºयांना हेक्टरी सात ते आठ हजार रूपये मोबदला मिळू शकतो.हा प्रकल्प दीड हजार कोटींचा असून शंभर एकर जमीन लागणार आहे. यासाठी सर्व सहकार्य एमआयडीसी करणार आहे. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान भारत पेट्रोलियम भारत उपलब्ध करुन देणार आहे. शेल व प्राज टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन इतरही कृषी व वने यातून उत्पन्न होणाºया वेष्टपासून इथेनॉल निर्मिती केल्यास इथेनॉल कमी किंमतीत उपलब्ध होईल असे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.तरुणांना रोजगार मिळणारधानापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचे देशात १२ प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी चार प्रकल्प कार्यान्वीत होत आहे. या प्रकल्पास जनावरांचा चारा वगळून मोठ्या प्रमाणात तणस उपलब्ध आहे. भंडारा जिल्ह्यात तीन लाख ८४ टन आणि गोंदिया जिल्ह्यात तीन लाख ४६ लाख टन तणस उपलब्ध आहे. इथेनॉल व गॅसची निर्मिती होणार आहे. तणस बांधणी करणे, मशीनच्या सहायाने होणार असून त्या अनुषंगाने उद्योग उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले असून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील १५ हजार तरूणांना रोजगार प्राप्त होईल, असेही त्यांनी सांगितले.