शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST

या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे व समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. राज्यासह जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत ...

या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे व समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.

राज्यासह जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने खरीप हंगाम २०२१ मध्ये बियाणे, खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठाबाबत शेतकरी, उत्पादक, वाहतूकदार व वितरक, विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष कंट्रोल रूम स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या अडचणी, तक्रारी देता येणार आहेत. दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नियंत्रण कक्ष सुरू असणार आहे. यामध्ये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप म्हसकर, तंत्र अधिकारी नामदेव धांडे यांच्याकडे शेतकऱ्यांना थेट भेटून अथवा कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयाच्या मेलवर ऑनलाईन तक्रार नोंदविता येणार आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारीबाबत प्रत्येकाच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या नावासह तक्रार नोंदविण्याची गरज असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले आहे.

बॉक्स

नियंत्रण कक्षातील हे आहेत अधिकारी, कर्मचारी

गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर कृषी विभागाच्या वतीने नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत शेतकऱ्यांना संपर्क साधता येणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप म्हसकर, तंत्र अधिकारी नामदेव धांडे, तंत्र अधिकारी मनीषा पाटील, व्ही. ए. चौधरी, जे. बी. उबाळे, चंद्रकांत कापगते, कृषी सहायक सुनीता मंचरे, एस. टी. पुडके, व्ही. .आर. कापगते, एस. पी. थुलकर असे दहा अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.